शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

राज्यातील ३५२ आरोग्य संस्थांचा झाला ‘कायाकल्प’; राज्य सरकार देणार ५० लाखांपर्यंत बक्षिस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2020 15:02 IST

५० हजार ते ५० लाख रुपयांपर्यंत हा बक्षीसरूपी निधी  २५ आॅक्टोबरला वाटप केला जाणार आहे.

ठळक मुद्देजिल्हा रुग्णालय गटात नाशिक  राज्यात अव्वल राहिलेग्रामीण रुग्णालय गटात श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालय अव्वल

- सोमनाथ खताळ बीड : उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या राज्यातील ३५२ आरोग्य संस्थांना ‘कायाकल्प पुरस्कार’ देण्यात येणार आहे. ५० हजार ते ५० लाख रुपयांपर्यंत हा बक्षीसरूपी निधी  २५ आॅक्टोबरला वाटप केला जाणार आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानचे सहायक संचालक डॉ. विजय कंदेवाड यांनी हा निकाल जाहीर केला आहे.

राज्यात प्रत्येक वर्षी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, महिला रुग्णालय, कुटीर रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांना कायाकल्प पुरस्कार आरोग्य विभागाच्या वतीने दिला जातो. वर्षाच्या सुरूवातीला याची तपासणी करण्यात आली होती. याचा निकाल सोमवारी घोषित झाला असून जिल्हा रुग्णालय गटात नाशिक  राज्यात अव्वल राहिले आहे. त्यांना ५० लाखांचे बक्षिस दिले जाणार असून द्वितीय मालेगाव रुग्णालयाला २० लाख रुपये दिले जाणार आहेत. उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय गटात श्रीरामपूर ग्रामीण रुग्णालय अव्वल राहिले असून त्यांना १५ लाख रुपये तर द्वितीय तिरोरा उपजिल्हा व कसबाबावडा यांनी बाजी मारली आहे. त्यांना प्रत्येकी ५ लाख रुपये बक्षिस दिले जाणार आहे. इतर उत्तेजनार्थ संस्थांना प्रत्येकी १ लाख रुपये दिले जाणार आहेत.  

आरोग्य केंद्र गटात यांची बाजी राज्यातील २६९ आरोग्य केंद्रांना कायाकल्प पुरस्कार मिळाला आहे. यात प्रथम असणाऱ्यांना २ लाख, तर इतरांना ५० हजार रुपये पारितोषिक दिले आहे. प्रथममध्ये कान्हूर पठार (जि. अहमदनगर), बाभूळगाव (अकोला), चापानेर (जि. औरंगाबाद), सालेभाटा (भंडारा), कडा (बीड), किन्होळा (बुलडाणा), दुर्गापूर (चंद्रपूर), कासारे (धुळे), माळेवाडा (गडचिरोली), छोपा (गोंदिया), पांगरा शिंदे (हिंगोली), शेंदुर्णी (जळगाव), अलाटे (कोल्हापूर), हालगारा (लातूर), बेला (नागपूर), तुपा (नांदेड), लहान शहादा (नंदुरबार), तळेगाव दिंडोरी (नाशिक), दहिफळ (उस्मानाबाद), तलवाडा (पालघर), महातपुरी (परभणी), पोयनाद (रायगड), कुंबळे (रत्नागिरी), चिंचाणी (सांगली), रेठारे बीके (सातारा), पडेल (सिंधुदुर्ग), कामटी (सोलापूर), शेनवा (ठाणे), अलीपूर (वर्धा), मनभा (वाशिम), आरली (यवतमाळ) यांचा समावेश आहे. इतर सर्वांना उत्तेजनार्थ बक्षिसे दिली जातील.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलState Governmentराज्य सरकारfundsनिधी