शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

दरवर्षी पर्जन्यमान घटत चालल्याने गेवराई तालुक्यात पांढऱ्या सोन्याचे उत्पादन घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 00:40 IST

गेवराई तालुका हा पांढ-या सोन्यासाठी म्हणजे कापसाच्या उत्पन्नात जिल्ह्यात नंबर एकवर होता. तालुक्यात जवळपास २९ कापूस जिनिंगमार्फत कापूस खरेदीतून करोडो रुपयांची उलाढाल होऊन हजारो स्थानिक व परराज्यातील नागरिकांना रोजगार मिळत होता.

ठळक मुद्देपाच-सहा वर्षांपासून उत्पादन कमी । २९ जिनिंगपैकी मोजक्याच सुरू राहणार

गेवराई : गेवराई तालुका हा पांढ-या सोन्यासाठी म्हणजे कापसाच्या उत्पन्नात जिल्ह्यात नंबर एकवर होता. तालुक्यात जवळपास २९ कापूस जिनिंगमार्फत कापूस खरेदीतून करोडो रुपयांची उलाढाल होऊन हजारो स्थानिक व परराज्यातील नागरिकांना रोजगार मिळत होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून तालुक्यात कमी पाऊस पडत असल्याने व पिकेच चांगली येत नसल्याने या दुष्काळामुळे येथील कापूस जिनिंग व्यवसाय डबघाईला आल्याने हजारो बेरोजगाराला कामे नाहीत तर अनेक जिनिंग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.बीड जिल्ह्यात पांढरे सोने म्हणून ओळखल्या जाणा-या कापूस उत्पन्नात गेवराई तालुका हा नेहमी बीड जिल्ह्यात आघाडीवर होता. तालुक्यात जवळपास २९ जिनिंग असून, या जिनिंगमार्फत तालुक्यातील व बाहेरील तालुक्यातील शेतकऱ्यांचा कापूस मोठ्या प्रमाणात खरेदी केला जात होता. त्यामुळे शेतकºयाला शासनाने ठरवून दिलेल्या हमी भावाप्रमाणे पैसे मिळत होते. यात गेल्या वर्षी तालुक्यातील जवळपास १५ जिनिंगमार्फत कापूस खरेदी झाली. याची किमंत कोटीच्या घरात होत होती. मात्र हे उत्पन्न गेल्या पाच ते सहा वर्षांत घटत चालले असल्याने यात निम्म्यापेक्षा जिनिंग अनेक वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी होत असल्याने व कापूस पिके निघत नसल्याने बंद आहेत. या सर्व जिनिंगवर तालुक्यातील व बाहेरील तालुक्यातील तसेच राजस्थान, मध्यप्रदेश राज्यातील हजारो नागरिकांच्या कुटंबाला येथे सात ते आठ महिने रोजगार मिळत होता. आता दरवर्षी पावसाचे प्रमाण कमी होत चालले आहे. या दुष्काळी परिस्थितीमुळे कापूस देखील निघणे कठीण होवून बसले आहे. त्यामुळे यावर्षी सुध्दा काही ठराविक जिनिंग चालु होतील. तसेच अजून काही भागात चांगला पाऊस पडला नसल्याने कापसाची पिके इतभर देखील वाढली नाहीत, त्यामुळे या वर्षी देखील कापूस उत्पन्नात मोठी घट तर होईलच मात्र मोजक्याच कापूस जिनिंग चालू राहिल्यास स्थानिक व बाहेरील राज्यातील नागरिकांचा रोजगाराचा प्रश्न आ करून उभा राहणार आहे. तो कसा सोडवता येईल, असा प्रश्न कामगारांपुढे पडला असल्याचे खळेगाव येथील शेतकरी मनोज शेंबडे यांनी सांगितले आहे. परराज्यातील तसेच स्थानिक व्यापाºयांनी येथे गेल्या अनेक वर्षांपासून करोडो रूपये खर्च करून कापूस जिनिंग उद्योग सुरू केला. मात्र दुष्काळी परिस्थितीमुळे जिनिंग तसेच कापूस उत्पादनावर आधारित व्यवसाय डबघाईला आल्या असल्याचे चित्र आहे. यात गेल्या अनेक वर्षांपासून १० ते १२ जिनिंग चालुच झाल्या नाही, त्या आजही बंद आहेत.यात करोडो रूपये गुंतले असल्याचे येथील व्यापारी यांनी सांगितले.

टॅग्स :BeedबीडFarmerशेतकरीcottonकापूस