शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवण्याची खरी वेळ...!" रशिया-युक्रेन युद्धावर झेलेंस्की यांचं मोठं विधान
2
चीनचा अमेरिकेला आणखी एक झटका; ७ वर्षात पहिल्यांदा असं काही घडलं, डोनाल्ड ट्रम्प चिंतेत पडले
3
OLA कंपनीतील कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, २८ पानी अखेरची चिठ्ठी सापडली; मालकावर FIR दाखल
4
पुढच्या वर्षी 1.60 लाखपर्यंत पोहोचू शकतं सोनं; चांदी कितीपर्यंत वधारणार? जाणून डोळे फिरतील!
5
Bihar Election 2025: लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
6
दिवाळीच्या दिवशी शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Nifty २५,८४३ वर बंद, उद्या मुहूर्त ट्रेडिंग
7
Manu Garg : करून दाखवलं! आठवीत असताना गमावली दृष्टी, आईच्या साथीने रचला इतिहास, झाला अधिकारी
8
पाण्याच्या पाटावरून वाहिले रक्ताचे पाट, भीषण गोळीबार, २ जणांचा मृत्यू, ३ जखमी 
9
मेडिकल कॉलेजमध्ये MBBS च्या जागा वाढल्या, आता एवढ्या विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश, महाराष्ट्रात किती वाढल्या?
10
Laxmi Pujan 2025: स्थिर लक्ष्मी हवी? लक्ष्मीपूजन करताना झाडू आणि खडे मीठाने करा 'हा' खास उपाय!
11
बाथरूममध्ये कॅमेरा लपवला, आंघोळ करताना मेहुणीचा व्हिडीओ बनवला अन्...; भावोजीच्या कृत्याने कुटुंबाला धक्का बसला 
12
रेखा झुनझुनवाला यांनी 'या' शेअरमधून मिनिटांत कमावले ₹६७ कोटी, एक्सपोर्ट म्हणाले ₹२५० रुपयांपर्यंत जाणार भाव!
13
IND vs AUS: रोहित शर्मा दुसऱ्या वनडेत रचणार इतिहास; करणार विराट-सचिनलाही न जमलेला विक्रम
14
Crime: मुलीला तरुणासोबत 'नको त्या अवस्थेत' पाहिलं; संतापलेल्या वडिलांनी जे केलं, त्याची गावभर चर्चा!
15
बॉस असावा तर असा! सलग तिसऱ्या वर्षी दिवाळीला कर्मचाऱ्यांना गिफ्ट केल्या ५१ आलिशान कार
16
‎‘भूपती-रुपेश गद्दार!', माओवाद्यांच्या‎ केंद्रीय समितीची आगपाखड; २७० नक्षलवाद्यांच्या आत्मसमर्पणानंतर चळवळीत खदखद
17
"त्या दोघांचा मृत्यू ट्रेनमधून पडून नाही, तर…"; नाशिकमधील अपघाताचं धक्कादायक कारण समोर, जखमीने दिली माहिती
18
प्रेम, अनैतिक संबंध अन् ३ हत्या! घरात सुरू होती दिवाळीची तयारी, पण पत्नीची एक चूक जीवावर बेतली
19
शेकडो वर्षे जुने जगातील सर्वात मोठे हिंदू मंदिर; जाणून घ्या इतिहास आणि मनोरंजक तथ्ये...
20
अजबच! प्रत्येकजण कॉफीमध्ये का घालतंय मीठ? व्हायरल ट्रेंडमागे लपलंय इन्ट्रेस्टिंग सायन्स

नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांच्या ‘कृषी’समोर रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 23:55 IST

बीड : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, बाजरी, मका यासह इतर पिकांचे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. या पिकांची ...

ठळक मुद्देनुकसान झाल्यापासून ७२ तासांत द्यावा अर्ज : ग्रामपंचायत सदस्यांनी शेतकऱ्यांना मदत करावी

बीड : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, बाजरी, मका यासह इतर पिकांचे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. या पिकांची नुकसानभरपाई मिळावी यासाठी ७२ तासाच्या आत विहित नमुन्यासह अर्ज तालुका कृषी कार्यालय, संबंधित विमा कंपनी व तहसील कार्यालयात जमा करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. याला प्रतिसाद देत प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी तालुका कृषी कार्यालयात शेतकºयांनी रांगा लावल्या आहेत. तसेच कृषी कार्यालयाकडून देखील शेतकºयांकडून अर्ज स्वीकारले जात आहेत.खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाने दडी मारल्यामुळे पेरणी उशिरा झाली होती. दरम्यान त्यानंतर थोड्या-थोड्या पावसावर पिकांची चांगली वाढ झाली होती. मात्र, सोयबीन, बाजरी हे पिक काढणीला आलेले असताना व कापूस देखील फुटत होता. मात्र, त्याच वेळी जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोराचा पाऊस झाला त्यामुळे काढणी झालेल्या बाजरी पिकाचे तसेच सोयबीन व उभ्या कापसाचे नुकसान झाले आहे. तसेच काढणीला आलेल्या उभ्या पिकात पाणी साठून राहिल्यामुळे देखील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पिकांचे पंचनामे करुन मदत करण्याची मागणी शेतक-यांमधून केली जात होती.त्यानुसार संबंधित शेतकºयांनी विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाले असेल किंवा काढणी झालेल्या पिकांचे नुकसान झाले असेल, तर नुकसानग्रस्त शेतकºयांनी वैयक्तिक पंचनामे करण्याचे आदेश शासनाने काढले आहेत. त्यानुसार शेतकºयांनी तक्रार अर्ज विहित नमुन्यासह तालुका कृषी कार्यालयात किंवा विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडे जमा करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांनी केले आहे. तसेच गावातील ग्रामपंचायत सदस्य व तरुणांनी शेतकºयांना हा अर्ज भरण्यासाठी व आवश्यक कागदपत्राची पुर्तता करण्यासाठी मदत करावी, असे आवाहन विविध संघटनांकडून करण्यात आले आहे.टोल फ्री क्रमांक नावालाचनुकसानग्रस्त शेतक-यांनी झालेल्या नुकसानीची माहिती देण्यासाठी एक टोल फ्री नंबर देण्यात आला आहे. यावर नुकसान झाल्यापासून ४८ तासाच्या आत माहिती विमा कंपनीला देण्याचे गरजेचे आहे.तक्रारीसाठी असलेल्या हेल्पलाईन नंबरवरती प्रतिसाद मिळत नसल्यामुळे शेतकºयांच्या चिंतेत भर पडली आहे. तसेच हा हेल्पलाईन क्रमाक हा सायंकाळी ६ वाजेपर्यंत कार्यरत असल्याचे देखील सांगितले जाते, त्यामुळे शेतक-यांच्या अडचणीत वाढ होत आहे.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी