शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांच्या ‘कृषी’समोर रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 23:55 IST

बीड : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, बाजरी, मका यासह इतर पिकांचे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. या पिकांची ...

ठळक मुद्देनुकसान झाल्यापासून ७२ तासांत द्यावा अर्ज : ग्रामपंचायत सदस्यांनी शेतकऱ्यांना मदत करावी

बीड : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, बाजरी, मका यासह इतर पिकांचे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. या पिकांची नुकसानभरपाई मिळावी यासाठी ७२ तासाच्या आत विहित नमुन्यासह अर्ज तालुका कृषी कार्यालय, संबंधित विमा कंपनी व तहसील कार्यालयात जमा करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. याला प्रतिसाद देत प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी तालुका कृषी कार्यालयात शेतकºयांनी रांगा लावल्या आहेत. तसेच कृषी कार्यालयाकडून देखील शेतकºयांकडून अर्ज स्वीकारले जात आहेत.खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाने दडी मारल्यामुळे पेरणी उशिरा झाली होती. दरम्यान त्यानंतर थोड्या-थोड्या पावसावर पिकांची चांगली वाढ झाली होती. मात्र, सोयबीन, बाजरी हे पिक काढणीला आलेले असताना व कापूस देखील फुटत होता. मात्र, त्याच वेळी जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोराचा पाऊस झाला त्यामुळे काढणी झालेल्या बाजरी पिकाचे तसेच सोयबीन व उभ्या कापसाचे नुकसान झाले आहे. तसेच काढणीला आलेल्या उभ्या पिकात पाणी साठून राहिल्यामुळे देखील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पिकांचे पंचनामे करुन मदत करण्याची मागणी शेतक-यांमधून केली जात होती.त्यानुसार संबंधित शेतकºयांनी विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाले असेल किंवा काढणी झालेल्या पिकांचे नुकसान झाले असेल, तर नुकसानग्रस्त शेतकºयांनी वैयक्तिक पंचनामे करण्याचे आदेश शासनाने काढले आहेत. त्यानुसार शेतकºयांनी तक्रार अर्ज विहित नमुन्यासह तालुका कृषी कार्यालयात किंवा विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडे जमा करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांनी केले आहे. तसेच गावातील ग्रामपंचायत सदस्य व तरुणांनी शेतकºयांना हा अर्ज भरण्यासाठी व आवश्यक कागदपत्राची पुर्तता करण्यासाठी मदत करावी, असे आवाहन विविध संघटनांकडून करण्यात आले आहे.टोल फ्री क्रमांक नावालाचनुकसानग्रस्त शेतक-यांनी झालेल्या नुकसानीची माहिती देण्यासाठी एक टोल फ्री नंबर देण्यात आला आहे. यावर नुकसान झाल्यापासून ४८ तासाच्या आत माहिती विमा कंपनीला देण्याचे गरजेचे आहे.तक्रारीसाठी असलेल्या हेल्पलाईन नंबरवरती प्रतिसाद मिळत नसल्यामुळे शेतकºयांच्या चिंतेत भर पडली आहे. तसेच हा हेल्पलाईन क्रमाक हा सायंकाळी ६ वाजेपर्यंत कार्यरत असल्याचे देखील सांगितले जाते, त्यामुळे शेतक-यांच्या अडचणीत वाढ होत आहे.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी