शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांच्या ‘कृषी’समोर रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 23:55 IST

बीड : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, बाजरी, मका यासह इतर पिकांचे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. या पिकांची ...

ठळक मुद्देनुकसान झाल्यापासून ७२ तासांत द्यावा अर्ज : ग्रामपंचायत सदस्यांनी शेतकऱ्यांना मदत करावी

बीड : जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, बाजरी, मका यासह इतर पिकांचे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. या पिकांची नुकसानभरपाई मिळावी यासाठी ७२ तासाच्या आत विहित नमुन्यासह अर्ज तालुका कृषी कार्यालय, संबंधित विमा कंपनी व तहसील कार्यालयात जमा करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते. याला प्रतिसाद देत प्रधानमंत्री पिक विमा योजनेचा लाभ मिळण्यासाठी तालुका कृषी कार्यालयात शेतकºयांनी रांगा लावल्या आहेत. तसेच कृषी कार्यालयाकडून देखील शेतकºयांकडून अर्ज स्वीकारले जात आहेत.खरीप हंगामाच्या सुरुवातीला पावसाने दडी मारल्यामुळे पेरणी उशिरा झाली होती. दरम्यान त्यानंतर थोड्या-थोड्या पावसावर पिकांची चांगली वाढ झाली होती. मात्र, सोयबीन, बाजरी हे पिक काढणीला आलेले असताना व कापूस देखील फुटत होता. मात्र, त्याच वेळी जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोराचा पाऊस झाला त्यामुळे काढणी झालेल्या बाजरी पिकाचे तसेच सोयबीन व उभ्या कापसाचे नुकसान झाले आहे. तसेच काढणीला आलेल्या उभ्या पिकात पाणी साठून राहिल्यामुळे देखील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पिकांचे पंचनामे करुन मदत करण्याची मागणी शेतक-यांमधून केली जात होती.त्यानुसार संबंधित शेतकºयांनी विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाले असेल किंवा काढणी झालेल्या पिकांचे नुकसान झाले असेल, तर नुकसानग्रस्त शेतकºयांनी वैयक्तिक पंचनामे करण्याचे आदेश शासनाने काढले आहेत. त्यानुसार शेतकºयांनी तक्रार अर्ज विहित नमुन्यासह तालुका कृषी कार्यालयात किंवा विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडे जमा करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून तसेच जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांनी केले आहे. तसेच गावातील ग्रामपंचायत सदस्य व तरुणांनी शेतकºयांना हा अर्ज भरण्यासाठी व आवश्यक कागदपत्राची पुर्तता करण्यासाठी मदत करावी, असे आवाहन विविध संघटनांकडून करण्यात आले आहे.टोल फ्री क्रमांक नावालाचनुकसानग्रस्त शेतक-यांनी झालेल्या नुकसानीची माहिती देण्यासाठी एक टोल फ्री नंबर देण्यात आला आहे. यावर नुकसान झाल्यापासून ४८ तासाच्या आत माहिती विमा कंपनीला देण्याचे गरजेचे आहे.तक्रारीसाठी असलेल्या हेल्पलाईन नंबरवरती प्रतिसाद मिळत नसल्यामुळे शेतकºयांच्या चिंतेत भर पडली आहे. तसेच हा हेल्पलाईन क्रमाक हा सायंकाळी ६ वाजेपर्यंत कार्यरत असल्याचे देखील सांगितले जाते, त्यामुळे शेतक-यांच्या अडचणीत वाढ होत आहे.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी