शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

माजलगावात उद्दिष्ट पूर्ततेसाठी उभारलेल्या सार्वजनिक शौचालयांची दोनच महिन्यात दुरावस्था 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 19:38 IST

शासनाने अनेक प्रकारचे निधी हे केवळ शौचालयांचे टार्गेट पूर्ण करण्याच्या आधारावरच ठेवले आहेत. यामुळे कोंडीत सापडलेल्या नगर पालिका प्रशासनाने केवळ सोपस्कर पार पाडण्यापुरते सार्वजनिक शौचालयांचे बांधकामे पूर्ण केले. मात्र घाईगडबडीत उभारलेल्या या शौचालयांना अवघ्या दोन महिन्यांच्या आतच अवकळा आली आहे असून वापर सुरु होण्याआधीच ते मोडकळीस आले आहेत. 

- पुरूषोत्तम करवा

माजलगाव (बीड ) : शासनाने अनेक प्रकारचे निधी हे केवळ शौचालयांचे टार्गेट पूर्ण करण्याच्या आधारावरच ठेवले आहेत. यामुळे कोंडीत सापडलेल्या नगर पालिका प्रशासनाने केवळ सोपस्कर पार पाडण्यापुरते सार्वजनिक शौचालयांचे बांधकामे पूर्ण केले. मात्र घाईगडबडीत उभारलेल्या या शौचालयांना अवघ्या दोन महिन्यांच्या आतच अवकळा आली आहे असून वापर सुरु होण्याआधीच ते मोडकळीस आले आहेत. 

राज्यातील नगर परिषदांना विविध योजनांसाठी निधी देतांना शौचालयांचे दिलेले उद्दिष्टे पूर्ण करण्याची अट घालण्यात आली आहे. दोन वर्षांपासून माजलगांव नगर पालिकेचे शौचालयांचे उददीष्ठ पुर्ण झालेले नसल्यामुळे सर्व प्रकारचा निधी शासनाने अडवुन धरला होता. तसेच नगर पालिकेची सर्व खाती ही गोठविण्यात आली. ही बाब विद्यमान पदाधिका-यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी झपाटयाने हे शौचालयांचे उद्दिष्ट  गाठण्यासाठी व्यक्तिगत व सार्वजनिक शौचालयांची निर्मिती सुरु केली. शौचालयांचे बांधकामे होत असतांनाच त्यात मोठया उणिवा लक्षात येत होत्या मात्र निधी थांबविला असल्याचे कारण पुढे करीत थातुर मातुर पध्दतीने काम तसेच सुरु ठेवण्यात आले. त्यातही एका प्रभागात शौचालयाचे बांधकाम चालु असतांनाच एकाच दिवसात स्लॅब कोसळण्याची घटना देखील घडली होती.  

माजलगांव शहरात एकुण व्यक्तिगत 2900 शौचालये तर 22 ठिकाणी सार्वजनिक शौचालये उभारण्यात आले. व्यक्तिगत शौचालयांचे गुणनियंत्रण प्रक्रिया अजुनही बाकी असली तरी सार्वजनिक शौचालयांनी मात्र माना टाकण्यास सुरुवात केली असुन विविध प्रभागांमध्ये उभारण्यात आलेल्या जवळपास ८० टक्के शौचालयांमध्ये पाण्याची व्यवस्था होणे अजूनही बाकी आहे. तर कांही ठिकाणच्या शौचालयांची वापरा आधीच मोडके दरवाजे, नळांना तोटया नसणे अशी दयनीय अवस्था आहे. शौचालयांची ही परिस्थिती पाहता केवळ टार्गेट पूर्ण करुन नगर पालिकेला निधी मिळविण्यासाठीच घाईगडबडीत काम उरकल्याचा परिणाम दिसून येत आहे. प्रत्येक सार्वजनिक शौचालयावर जवळपास 5 ते 7 लाख रुपयांचा निधी नगर पालिकेकडुन करण्यात आलेला असुन हा सर्व निधी वाया जातो की काय अशी शंका उपस्थित होण्या इतपत गंभिर अवस्था या शौचालयांची झाली आहे. 

नागरिकांनी योग्य रितीने वापर करावासार्वजनिक ठिकाणी उभारण्यात आलेल्या शौचालयांचा वापर नागरिक व्यवस्थित करत नाहीत. या ठिकाणच्या साहित्याची तोडफोड करणे, साहित्य चोरी करणे असे प्रकार घडत आहेत. त्यामुळे नव्यानेच बांधण्यात आलेल्या शौचालयांची दुरवस्था झाली आहे. नागरिकांनी शौचालयांचा वापर योग्य रितीने करावा. - सुर्यकांत सुर्यवंशी, कार्यालयीन अधिक्षक, नगर परिषद माजलगांव 

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानBeedबीड