शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
3
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
4
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
5
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
6
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
7
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
8
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
9
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
10
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
11
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
12
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
14
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
15
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
16
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
18
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
19
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
20
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  

बीडचा अभिमान! शेतकरी पुत्र अक्षय मुंडेंचे यूपीएससीतील यशानंतर गावात जल्लोषात स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2025 13:00 IST

कोणत्याही कोचिंग क्लासशिवाय अभ्यास, सहाव्या प्रयत्नांनंतर मेहनतीवर आले यश

- संजय खाकरेपरळी (बीड) : बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील पांगरी या छोट्याशा गावातील सामान्य शेतकरी कुटुंबातील सुपुत्र डॉ. अक्षय संभाजी मुंडे यांनी यूपीएससी परीक्षेत यश मिळवून गावाचे नाव उज्ज्वल केले.  24 एप्रिल गुरुवारी रात्री त्यांचे पांगरी येथे आगमन झाल्यानंतर ग्रामस्थांनी भव्य मिरवणुकीद्वारे त्यांचे उत्साहात स्वागत केले.

डॉ. मुंडे दिल्लीहून रात्री आठ वाजता पांगरीत पोहोचले. गावात आल्यावर त्यांनी सर्वप्रथम आपल्या आई इंदुबाई मुंडे आणि वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर गोपीनाथ गडावर जाऊन लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या समाधीस्थळाला अभिवादन केले. गावकऱ्यांनी आपापसात वर्गणी गोळा करून त्यांच्या स्वागतासाठी मिरवणुकीचे आयोजन केले. गोपीनाथ गड ते पांगरी कॅम्पपर्यंत उघड्या जीपमधून ढोल-ताशांच्या गजरात आणि पुष्पवृष्टीत मिरवणूक काढण्यात आली. श्री हनुमान मंदिरात झालेल्या कार्यक्रमात त्यांचा  सत्कार करण्यात आला.

या वेळी व्यासपीठावर त्यांच्या आई इंदुबाई मुंडे उपस्थित होत्या. ॲड. श्रीनिवास मुंडे, ज्ञानोबा मुंडे पाटील, विनायक मुंडे, श्रीकांत तिडके, दत्तात्रय तिडके, महादेव मुंडे, सुमंत पांचांगे, माणिक मुंडे, किशन मुंडे, वसंतराव तिडके, गोविंद मुंडे, नंदकिशोर मुंडे, अभिमान मुंडे, डॉ. संतोष मुंडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ, तरुण वर्ग उपस्थित होते.

गावकऱ्यांच्या मदतीला सदैव तत्पर असेन"गावकऱ्यांनी माझे जसे स्वागत केले, तसंच त्यांना गरज भासेल तेव्हा मीही त्यांच्या मदतीला तत्पर असेन," असे भावनिक उद्गार डॉ. अक्षय मुंडे यांनी काढले. त्यांनी सांगितले की, सहा प्रयत्नांनंतर स्वतःच्या मेहनतीवर हे यश संपादन केले. कोणत्याही कोचिंग क्लासशिवाय अभ्यास केला. आर्थिक अडचणींमुळे काही क्लासेसमध्ये बसता आलं नाही. तरीही प्रयत्न सुरू ठेवले. "यशानंतर एका कोचिंग क्लासेसनी माझा फोटो लावला, पण मी त्यांना विनंती केली की फोटो काढा, कारण चुकीचा संदेश जाऊ नये. आणि स्वतःच्या अभ्यासावर विश्वास ठेवूनही यश मिळवता येते," असेही त्यांनी नमूद केले.

आईने शेतीत कष्ट करून मुलांना शिकवलेडॉ. अक्षय यांनी डेंटिस्ट म्हणून काही काळ सेवा केली आणि शिष्यवृत्ती मिळवून पुढील शिक्षण पूर्ण केले.  आईने शेतीत कष्ट करून त्यांना शिकवले. त्यांच्या यशात बहिणी अक्षता हिचेही मोठे योगदान आहे. "अक्षयने फोन करून 'आई, मी यूपीएससीत पास झालो' असे सांगितले, तेव्हा माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू आले," असे इंदुबाई मुंडे भावूकपणे म्हणाल्या. "पांगरी गावाचा डॉ. अक्षयमुळे अभिमान वाढला आहे," असे मत ॲड. श्रीनिवास मुंडे यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगBeedबीड