शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

शिवसेना आणि राष्ट्रवादीत पत्रकयुद्ध; नेत्यांच्या समर्थनार्थ पदाधिकारी आमने-सामने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2021 19:14 IST

बीड मतदारसंघात काका-पुतण्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप होत असतात; परंतू आता यात समर्थकांनीही उडी घेतली आहे.

- सोमनाथ खताळबीड : बीड मतदारसंघासह शिरूर तालुक्यातील रस्ताकामांवरून राष्ट्रवादी व शिवसेना पदाधिकाऱ्यांत चांगलीच पत्रकबाजी सुरू झाली आहे. हे रस्ते माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी मंजूर करून आणले असून, त्याचे उद्घाटन करून आ. संदीप क्षीरसागर हे चमकोगिरी करत असल्याचे पत्रक शिवसेना माजी जिल्हाप्रमुखांनी काढले आहे, तर याला राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्षांनी पत्रकातूनच उत्तर देत विकासपुरुषाने दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून बडबड करण्यापेक्षा स्वत: काय दिवे लावले ते सांगावे, असा आरोप केला आहे. दरम्यान, बीड मतदारसंघात काका-पुतण्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप होत असतात; परंतू आता यात समर्थकांनीही उडी घेतली आहे. नगरपंचायत निवडणुकीचे मतदान संपताच दोन्ही पदाधिकाऱ्यांनी पत्रक काढून एकमेकांविराेधात टीका केली आहे.

आमदारांकडून चमकोगिरीचा प्रयत्नआ. संदीप क्षीरसागर यांनी बीड मतदारसंघातील विविध विकासकामांचे उद्घाटन करून चमकोगिरी करण्याचा प्रयत्न केला आहे. वास्तविक पाहता या कामांचे प्रस्ताव ८ जुलै २०१९ रोजी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी दाखल व मंजूर करून घेतले होते. ही कामे आपणच मंजूर करून आणल्याचे सांगून नारळ फोडून टाकले. हा केवळ श्रेय घेण्याचा आणि चमकोगिरी करण्याचा प्रयत्न असून, विद्यमान आमदारांनी जनतेची दिशाभूल करू नये व आयत्या पिठावर रेघोट्या मारू नये, असा टोला शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख अनिल जगताप, कुंडलिक खांडे यांनी पत्रकातून लगावला आहे.

रोजगार हमीवर काम केलेल्या मंत्र्यांनी बोलू नयेस्वतःला विकासपुरुष म्हणून घेणाऱ्या जयदत्त क्षीरसागर यांनी निदान आतातरी आपण सत्तेत नाहीत हे ओळखणे गरजेचे आहे. कारण मागील काही दिवसांपासून आमदार संदीप क्षीरसागर यांनी विकासकामांचा जो धडाका लावला आहे तो बघवत नसल्याने उद्घाटन होत असलेले सर्व विकासकामे मीच खेचून आणले आहेत अशा आविर्भावात रोजगार हमीवर काम केलेल्या माजी मंत्र्यांनी बोलणे योग्य नाही. त्यांनी केवळ पाणंद रस्त्यापुरतेच बोलावे. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर पूर्वीचे सर्व प्रस्तावित कामे कोरोनाला निधी वळवल्याने रद्द केले होते; परंतु बीड तालुक्यातील सर्व कामे आ. संदीप क्षीरसागर यांनी पुनर्जीवित करून घेतली. याचा तरी अभ्यास करावा, असा सल्ला राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष महादेव उबाळे व भाऊसाहेब डावकर यांनी पत्रकातून दिला आहे.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv SenaशिवसेनाBeedबीड