शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्रपुर्व काळातील शिरूर ग्रामपंचायत निवडणूक चावडीत झाली होती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:27 IST

विजयकुमार गाडेकर लोकमत न्यूज नेटवर्क शिरूर कासार : १९३७ साली स्थापना असलेल्या शिरूर ग्रामपंचायतीची पहिली निवडणूक ही स्वातंत्रपूर्व काळात ...

विजयकुमार गाडेकर

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरूर कासार : १९३७ साली स्थापना असलेल्या शिरूर ग्रामपंचायतीची पहिली निवडणूक ही स्वातंत्रपूर्व काळात झाली होती. त्या निवडणुकीचा निकाल लिखित स्वरूपात गावच्या चावडीत तत्कालिन महालदार यांनी वाचून जाहीर केला होता. सरपंच म्हणून राहिलेल्या पाटलाचा रूबाबही काही न्याराच असल्याचा त्यांच्या फोटोकडे पाहिल्यानंतर लक्षात आल्याशिवाय राहात नाही.

ग्रामपंचायतीमध्ये महिला सदस्य म्हणून उमेदवारच नसल्याने महिला सदस्यपद रिक्त असल्याचे निकाल पत्रावरून दिसून येते. त्याही काळी गावगाडा कारभारी निवडताना सर्वसमावेशकता असल्याचे दिसून येते. १९४१मध्ये शिरूर ग्रामपंचायत निवडणूक पार पडली. या प्रक्रियेसाठी मतदान घेतले की, एकविचाराने गावकारभारी निवडले गेले हे उमगत नसले तरी जवळपास ८० वर्षांपूर्वीदेखील गाव कारभारात सर्वसमावेशकता दिसून येते. त्याकाळात उपलब्ध समाजाला स्थान दिले गेले होते.

स्वातंत्र्यपूर्व काळापासून काही नंतरच्या कालावधीपर्यंत गाव कारभारी म्हणून गावचे पोलीस पाटलांना प्रथम मानकरी समजले जात होते. पाटलांची शब्दरेषा कोणी ओलांडण्याचे धाडस करत नसायचे. त्याशिवाय मालेपाटील आणि कारभारी पाटील हे सुध्दा तोलामोलाचे मानले जात होते. त्याकाळच्या परिस्थितीचा अंदाज लक्षात घेता, ही निवडणूक मतदानावर आधारित नसावी बहुधा ती सर्वसंमतीनेच पार पडून निवडणूक प्रक्रिया कायद्याच्या चौकटीत बसवली असावी, असा अंदाज बांधला जातो.

दिनांक २० जानेवारी १९४१ यादिवशी साध्या कागदावर निवडून आलेल्या इसमाचे नाव शाईपेन आधारे लिहून दोन रकान्यात निकाल जाहीर केला होता. त्यात प्रथम एक राखीव जागा महिलांसाठी होती. मात्र, स्त्री उमेदवार कोणी उभा नाही, असे लिहिले. पुढे मुस्लिम, हरिजन प्रत्येकी एक आणि नंतर इतर सर्वसाधारणमध्ये आठ असे अकरा सदस्य निवडले गेले होते. शिरूर हे गाव त्यावेळी कोणत्या तालुक्यात होते, याचा संदर्भ यात दिसून येत नसला तरी ते नगर जिल्ह्यात होते, असे जुने लोक सांगतात.

शिरूर ग्रामपंचायत निवडणूक २० जानेवारी ४१

निवडून आलेल्या इसमाचे नाव शेख बसीर जाणूभाई, महादू येदू बोराडे तर इतर सर्वसाधारणमध्ये भाऊ व्यंकोजी गाडेकर, मारूती नारायण तळेकर, धोंडीराम नामदेव तळेकर, सखाराम रामचंद्र गाडेकर, दत्तात्रय पंढरीनाथ कुलकर्णी, बन्सीलाल हरकचंद, लखिचंद रामचंद लोढा व भगवान रंगनाथ काटकर असे उमेदवार निवडून आल्याचे चावडीत महालकरी यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आले होते.

पहिले सरपंच म्हणून भाऊराव पाटील राहिले होते. लखिचंद रामचंद लोढा व भगवान रंगनाथ काटकर हे देखील सरपंच राहिले असल्याचे सांगितले जाते. स्वातंत्र्यपूर्व काळातील निवडणूक, त्याकाळच्या गावकारभाऱ्यांचा रुबाब व गावकारभार सांभाळण्याचे कसब यात आणि आताच्या निवडणूक व कार्यशैलीत भरपूर अंतर असल्याचे जाणवल्याशिवाय राहात नाही.