शहरं
Join us  
Trending Stories
1
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! 10 कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
2
STने प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज! आगाऊ आरक्षणात मिळणार १५ टक्के सवलत, कधीपासून सुरू?
3
धावपट्टीला स्पर्श करताच एका बाजूला झुकले, नंतर...; बोईंग विमानाचा मोठा अपघात थोडक्यात टळला
4
J-K: भारतीय सैन्याने हाणून पाडला घुसखोरीचा डाव; सीमेजवळ पाकिस्तानी गाईड ताब्यात
5
टॉप अधिकाऱ्यांनी सोडली नोकरी; २०० रुपयांच्या खाली आला दिग्गज बँकेचा शेअर, प्रकरण काय?
6
तरुणीने भेटायला हॉटेलमध्ये बोलावलं, आनंदाने गेला तरुण; पण पुढे जे झालं त्याची कुणी कल्पनाही केली नसेल!
7
पोलिसांनी गाडी अडवल्याने संतापले, ताजमहालजवळ केला गोळीबार; पर्यटकांमध्ये उडाली खळबळ!
8
Astro Tips: मिठाची पुडी जवळ ठेवा, भीती, नैराश्य, नकारात्मक ऊर्जा घालवा; उपाय सविस्तर वाचा!
9
१८ एकर जमिनीवर कब्जा करण्याचा डाव फसला; प्रियकरासोबत मिळून पतीला मधुचंद्राच्या रात्रीचं संपवलं, मग...
10
Jio BlackRock नं लाँच केले तीन म्युच्युअल फंड, सलग पाचव्या दिवशी शेअरमध्ये जोरदार तेजी
11
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
12
'पंचायत'मध्ये सचिव जी अन् रिंकीचा असणार होता किसींग सीन, सानविकाने दिला नकार
13
जय मराठी! ५ जुलैला विजयी मेळावा होईल, पण तो कोणत्याही पक्षाचा नसेल; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं
14
चॉकलेटच्या डब्यात लपवून आणले तब्बल १६ साप अन्...; मुंबई विमानतळावर प्रवाशाला पोलिसांनी घेतले ताब्यात!
15
भारतात राहण्यासाठी काहीही! ५ बांगलादेशी पुरुषांनी निवडला 'विचित्र' मार्ग, कसे सापडले पोलिसांच्या तावडीत?
16
पतीसमोरच पत्नीने प्रियकरासोबत लग्न केले; निळ्या ड्रमची धडकीच मनात भरली, पतीने उलगडलं रहस्य
17
घसरणीनंतर पुन्हा वाढले सोन्याचे दर... खरेदीची संधी गेली का? २४ कॅरेटचा आजचा भाव काय?
18
हिंदी सक्ती : "समिती कोणतीही असू दे, आता सक्ती विषय..."; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारला इशारा 
19
Vastu Tips: श्रीमंतांसारखं आयुष्य जगायचं असेल, तर आजच करा 'हे' सात प्रभावी वास्तू उपाय!
20
ऐकावे ते नवलंच! एकटा दरोडेखोरांशी भिडला; कंबरेत गोळी घुसली, २ km पर्यंत कळालेही नाही...

सत्तेच्या चाव्या आघाडीकडेच !

By admin | Updated: February 24, 2017 00:28 IST

बीड जिल्हा परिषदेत कुठल्याचा पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस २५ जागांसह सत्तेच्या काठावर आहे.

प्रताप नलावडे बीडजिल्हा परिषदेत कुठल्याचा पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस २५ जागांसह सत्तेच्या काठावर आहे. त्यामुळे काकू- नाना आघाडीच्या तीन उमेदवारांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणर आहे. काँग्रेसने ‘घड्याळ’ हातावर बांधलेच तर सत्तेचे ‘चहापान’ करण्यासाठी आघाडीच्या कपबशीचा आधार राकॉला घ्यावा लागणार आहे.पाच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने जि. प. मध्ये वर्चस्व मिळवले होते. मध्यंतरी झालेल्या राजकीय उलथापालथीनंतर राकाँचे संख्याबळ घटले. अडीच वर्षांपूर्वी राकाँ व भाजपकडे समान संख्याबळ झाले. अखेर चिठ्ठीवर अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड झाली. यामध्ये नशीबाचा कौल राकाँ-काँग्रेसच्या बाजूने राहिला. राकाँच्या ताब्यातील जिल्हा परिषद खेचण्यासाठी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. स्व. गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर पहिल्यांदाच होत असलेल्या या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेससोबत सोयीनुसार आघाडी केली. इतर ठिकाणी काँग्रेस स्वबळावर लढले. दुसरीकडे सेना-भाजपनेही स्वतंत्र लढणे पसंत केले. त्यामुळे सर्वत्र तिरंगी - चौरंगी लढती झाल्या. बीडमध्ये आ. जयदत्त क्षीरसागर यांना पुतणे संदीप क्षीरसागर यांनी काकू-नाना आघाडीच्या माध्यमातून कडवे आव्हान निर्माण केले, तर गेवराईमध्ये माजी मंत्री बदामराव पंडित यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर राकाँतून बाहेर पडत ‘धनुष्यबाण’ हाती घेतला. या साऱ्या राजकीय घडामोडींचा परिणाम म्हणून कुठल्याच एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने २५ जागा जिंकून सर्वाधिक संख्याबळ प्राप्त केले. मात्र, त्यांना सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेला ३१ हा जादूई आकडा गाठता आला नाही. दुसरीकडे राज्यात व केंद्रामध्ये सत्तेत असलेल्या भाजपला १९ जागांवर समाधान मानावे लागले. सेनेने गतवर्षीच्या तुलनेत दुप्पट (४) जागा पटकावल्या आहेत. माजी मंत्री बदामराव पंडित यांनी गेवराईमध्ये आपला करिष्मा दाखवून शिवसेनेच्या खात्यात या चार जागा जमा केल्या. बीडमध्ये काकू-नाना विकास आघाडीने पालिकेतील घोडदौड कायम ठेवताना तालुक्यामध्ये तीन ठिकाणी विजयाचा गुलाल लावला. आघाडीचे दोन उमेदवार अल्पशा मतांनी पराभूत झाले. विधानसभा निवडणुकीतील पराभवापासून सुरू झालेली आ. विनायक मेटे यांची पराभवाची मालिका जि. प., पं. स. निवडणुकीत खंडित झाली. शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम परिषदेने बीड तालुक्यात ३ व केज तालुक्यात १ अशा एकूण ४ जागा पटकावत ‘शिट्टी’चा आवाज केला. शिरूर कासार व आष्टी येथे २ अपक्षांनी बाजी मारून जिल्हा परिषद गाठली. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता स्थापनेच्या जवळ पोहचली आहे. मात्र, त्यांना इतरांच्या मदतीशिवाय सत्तेपर्यंत पोहचता येणार नाही. राकाँमध्ये बंडखोरी करून स्वतंत्र चूल मांडणाऱ्या संदीप क्षीरसागर यांच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झाले आहे.