शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

परळीत विजेचा लपंडाव; २४ तासात २० वेळा असते वीज गायब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2021 19:09 IST

दुकानदार, वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्यांना येत आहेत अडचणी

ठळक मुद्दे भाजपा व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विचारला जाब

परळी : शहरातील वाढत्या विजेचा लपंडावामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत . एका दिवसात वीस वेळा वीज खंडित होत आहे. त्यामुळे नागरिकांत असंतोष निर्माण झाला. याप्रश्नी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे परळी नगर परिषदेचे शिक्षण सभापती गोपाळ आंधळे यांच्यासह भाजपाचे शहर उपाध्यक्ष राजेंद्र ओझा, महादेव  ईटके,अश्विन मोगरकर, नितीन समशेटे  यांनी  येथील वीज वितरणाच्या परळी उपविभागाचे अतिरिक्त अभियंता प्रकाश आंबाडकर यांची गुरुवारी भेट घेवून वीजप्रश्नी निवेदन सादर केले. यावेळी गणेशपार आणि जुन्या परळी गाव भागातील सतत खंडित होणारा वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. 

गेल्या तीन महिन्यापासून गणेशपार भागातील संत सावता माळी मंदिर परिसर , नांदूरवेस गल्ली, जंगम गल्ली ,आंबेवेस, भिमनगर, साठे नगर, खंडोबा नगर ,किर्ती नगर, कृष्णा नगर , तुळजानगर गंगासागर नगर ,सिद्धेश्वर नगर, खुदबेनगर देशमुख गल्ली गल्ली, धोकटे गल्ली  या भागात वीज पुरवठा खंडित केला जात आहे. दिवसभरात किमान २० वेळेस वीज गायब होते.असे नगरसेवक गोपाळ आंधळे ,आश्विन मोगरकर यांनी  निदर्शनास आणून दिले. दरम्यान, गणेशपार विभागातच वीज गुल होण्याचे प्रमाण का वाढले या मुद्द्यावर शिक्षण सभापती गोपाळ आंधळे ,राजेंद्र ओझा ,आश्विन मोगरकर महादेव ईटके ,नितीन समशेट्टे ,रमेश चौंडे, सचिन स्वामी , हनुमान आगरकर व इतर कार्यकर्ते आक्रमक झाले होते.                                          दुकानदारांची ही गैरसोयशहरातील मोंढा मार्केट, राणी लक्ष्मीबाई टॉवर, नेहरू चौक  आदी विभागातील वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढल्याने दुकानदारांनी व्यवसाय कसा करावा असा प्रश्न यावेळी नितीन समशेट्टे यांनी उपस्थित केला.

ऑनलाइन शिक्षणात अडचण विद्यार्थ्यांचे सध्या ऑनलाइन शिक्षण सुरु आहे. दिवसातून अनेक वेळा वीजपुरवठा खंडित झाल्यास विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा. तसेच काहींचे वर्क र्फॉर्म होम सुरु आहे त्यानाही अडचणी आहेत, त्यांनी काय करावे असा सवाल भाजपाचे शहर उपाध्यक्ष राजेंद्र ओझा यांनी यावेळी महावितरण अधिकाऱ्यांना विचारला.

चार महिन्यात सुरळीत होईल शहरात असलेल्या तीन  ३३ के व्ही सबस्टेशनवर भार येत आहे. लवकरच  ३३ के व्ही  नवीन सब स्टेशन सुरू होणार आहे. त्यामुळे येत्या चार महिन्यात शहरातील वीज पुरवठा सुरळीत होईल -प्रकाश आंबाडकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता

टॅग्स :Beedबीडmahavitaranमहावितरण