शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

पोस्ट कोविडही घातक; रक्त गोठल्याने येतोय अटॅक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : कोरोनामुक्त झाल्यानंतरही ज्येष्ठांना अधिक धोका असल्याचे समोर आले आहे. कोरोनामुळे रक्त गोठण्याची प्रक्रिया सुरू ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : कोरोनामुक्त झाल्यानंतरही ज्येष्ठांना अधिक धोका असल्याचे समोर आले आहे. कोरोनामुळे रक्त गोठण्याची प्रक्रिया सुरू होते. यामुळेच अटॅक येतो आणि रुग्णाचा जीव जात आहे. आतापर्यंत जिल्हा रुग्णालयात २०० पेक्षा जास्त रुग्णांवर उपचार झाले असून यात अनेकांचा जीव गेल्याचे सांगण्यात आले. परंतु याची वेगळी नोंद नसल्याने आकडा समोर आला नाही.

जिल्ह्यात आतापर्यंत ९० हजार ५२१ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. पैकी ८६ हजार ७७३ जण कोरोनामुक्त झाले असून २ हजार ४५३ जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये ६० वर्षांपेक्षा जास्त असलेल्या रुग्णांची संख्या १५३६ एवढी आहे. कोरोनात तर धोका पोहचलाच परंतु कोरोनामुक्त होऊन घरी गेल्यावरही त्यांना त्रास झाल्याचे समोर आले आहे. यासाठी जिल्हा रुग्णालयात स्वतंत्र ओपीडी तयार केलेली आहे. यात आतापर्यंत २०० पेक्षा जास्त रुग्णांनी उपचार घेतल्याचे सांगण्यात आले. परंतु पोस्ट काेविडनंतर किती लोकांचा मृत्यू झाला, किती लोकांना कोणते आजार झाले, किती लोक ठणठणीत झाले, याची वेगळी नोंद जिल्हा रुग्णालयात नसल्याचे सांगण्यात आले.

...

कोरोनामुक्तीनंतर काय त्रास होतो

कोरोनामुळे रक्त गोठून अटॅक येतो. तसेच पॅरालिसिस होऊ शकतो. पायातील रक्तवाहिन्यांमध्ये गाठ होण्याची शक्यता असते. जास्त दिवस रुग्णालयात राहिल्यावर त्यांना म्युकरमायकोसिस, ॲस्परजिलॉसिससारखे आजार होण्याची दाट शक्यता असते. रुग्ण डिप्रेशनमध्ये जातो. घरी गेल्यावर धाप लागणे, थकवा येणे, छाती दुखणे, दम लागणे अशी लक्षणे आणि त्रास होत असल्याचे सांगण्यात आले. फुफ्फुसाचे आजार असलेल्यांना धोका असतो.

कोरोनामुक्त झाल्यावर लगेच कामाला लागू नये. आराम करावा. आहार पौष्टिक असावा. पाणी भरपूर प्यावे. यामुळे गोठलेले रक्त पातळ होते. अवजड काम करू नये. ब्रीदिंग एक्झरसाईज करावी. रक्त पातळ होण्यासाठी दिलेली औषधी वेळेवर घ्यावीत. थोडाही त्रास जाणवत असल्यास डॉक्टरांना दाखवावे, दुखणे अंगावर काढू नये.

---

कोरोनामुक्त झाल्यावरही गाफील राहू नये. कोरोनामुळे रक्त गोठते, यामुळे अटॅक येतो. यात अनेकांचा जीव जात आहे. पॅरालिसिस, पायांतील वाहिन्यांमध्ये रक्ताची गाठ होण्याची शक्यता असते. त्यामुळे थोडीही लक्षणे जाणवली तर तत्काळ डॉक्टरांना दाखवावे. अंगावर दुखणे काढणे घातक ठरू शकते. ५० वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्यांना पोस्ट कोविडनंतरही अधिक त्रास होत असल्याचे दिसते.

-डॉ. विशाल कोटेचा, फिजिशियन, जिल्हा रुग्णालय, बीड.

===Photopath===

200621\20_2_bed_14_20062021_14.jpeg

===Caption===

डॉ.विशाल कोटेचा, फिजिशियन, जिल्हा रूग्णालय बीड