शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

सकारात्मक बातमी; ५० हजार रुग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:54 IST

बीड : जिल्ह्यात सोमवारी कोरोनाने एक सकारात्मक बातमी दिली. कोराेनाबाधितांची संख्या वाढत असली तरी आतापर्यंत ५० हजार रुग्णांनी कोरोनावर ...

बीड : जिल्ह्यात सोमवारी कोरोनाने एक सकारात्मक बातमी दिली. कोराेनाबाधितांची संख्या वाढत असली तरी आतापर्यंत ५० हजार रुग्णांनी कोरोनावर मातही केली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. बाधित आढळले तरी घाबरून न जाता योग्य उपचार घेऊन कोरोनामुक्त होऊ शकतो. सोमवारी नव्या १२५६ रुग्णांची भर पडली आहे. तसेच ११ जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून, १०६५ जणांनी कोरोनावर मात केली.

जिल्ह्यात रविवारी तीन हजार ७४५ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यापैकी दोन हजार ४८९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले, तर १२५६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले. बाधितांमध्ये बीड तालुक्यात सर्वाधिक २७९ रुग्ण आढळले. अंबाजोगाई २३७, आष्टी १०१, धारुर ६४, गेवराई ५५, केज १४३, माजलगाव ८८, परळी १२२, पाटोदा ६५, शिरुर ४७, वडवणी तालुक्यातील ५५ रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, ११ जणांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली. यात बीड शहरातील आसेफनगरातील ७० वर्षीय पुरुष, गजानन नगरातील ६१ वर्षीय महिला, तालुक्यातील जैताळवाडी येथील ६० वर्षीय महिला, येळंबघाट येथील ४१ वर्षीय महिला, खाडेवाडी येथील ५० वर्षीय महिला, शिरुर तालुक्यातील पाडळी येथील ६२ वर्षीय महिला, जरेवाडी (ता. धारूर) येथील ५५ वर्षीय महिला, माजलगाव तालुक्यातील गुंजवाडी येथील ७० वर्षीय महिला, माळेवाडी येथील ५५ वर्षीय पुरुष, परळी तालुक्यातील सिरसाळा येथील ५८ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

दरम्यान, आता एकूण रुग्णसंख्या ५८ हजार १२४ झाली आहे. पैकी ९५९ मृत्यू झाले असून, ५० हजार ६०६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ही माहिती जि. प. सीईओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांनी दिली.

जिल्ह्यात १५२ आरोग्य संस्था

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय व खासगी अशा मिळून १५२ आरोग्य संस्था कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत. येथे ११ हजार ५६६ खाटांची क्षमता असून, ११ हजार ३८० मंजूर आहेत. सध्या जिल्ह्यात ६ हजार ५५९ रुग्ण उपचाराखाली असून, ५ हजार ७ खाटा अद्यापही रिक्त आहेत.

...

कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे, हे खरे आहे. परंतु, कोरोनामुक्तही होत आहेत. सध्या जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ८७.६ टक्के एवढा आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. काळजी घ्यावी. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना व नियोजन केले जात असून, लवकरच याला यश मिळेल, असा विश्वास आहे.