शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

सकारात्मक बातमी; ५० हजार रुग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:54 IST

बीड : जिल्ह्यात सोमवारी कोरोनाने एक सकारात्मक बातमी दिली. कोराेनाबाधितांची संख्या वाढत असली तरी आतापर्यंत ५० हजार रुग्णांनी कोरोनावर ...

बीड : जिल्ह्यात सोमवारी कोरोनाने एक सकारात्मक बातमी दिली. कोराेनाबाधितांची संख्या वाढत असली तरी आतापर्यंत ५० हजार रुग्णांनी कोरोनावर मातही केली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. बाधित आढळले तरी घाबरून न जाता योग्य उपचार घेऊन कोरोनामुक्त होऊ शकतो. सोमवारी नव्या १२५६ रुग्णांची भर पडली आहे. तसेच ११ जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून, १०६५ जणांनी कोरोनावर मात केली.

जिल्ह्यात रविवारी तीन हजार ७४५ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यापैकी दोन हजार ४८९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले, तर १२५६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले. बाधितांमध्ये बीड तालुक्यात सर्वाधिक २७९ रुग्ण आढळले. अंबाजोगाई २३७, आष्टी १०१, धारुर ६४, गेवराई ५५, केज १४३, माजलगाव ८८, परळी १२२, पाटोदा ६५, शिरुर ४७, वडवणी तालुक्यातील ५५ रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, ११ जणांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली. यात बीड शहरातील आसेफनगरातील ७० वर्षीय पुरुष, गजानन नगरातील ६१ वर्षीय महिला, तालुक्यातील जैताळवाडी येथील ६० वर्षीय महिला, येळंबघाट येथील ४१ वर्षीय महिला, खाडेवाडी येथील ५० वर्षीय महिला, शिरुर तालुक्यातील पाडळी येथील ६२ वर्षीय महिला, जरेवाडी (ता. धारूर) येथील ५५ वर्षीय महिला, माजलगाव तालुक्यातील गुंजवाडी येथील ७० वर्षीय महिला, माळेवाडी येथील ५५ वर्षीय पुरुष, परळी तालुक्यातील सिरसाळा येथील ५८ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

दरम्यान, आता एकूण रुग्णसंख्या ५८ हजार १२४ झाली आहे. पैकी ९५९ मृत्यू झाले असून, ५० हजार ६०६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ही माहिती जि. प. सीईओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांनी दिली.

जिल्ह्यात १५२ आरोग्य संस्था

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय व खासगी अशा मिळून १५२ आरोग्य संस्था कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत. येथे ११ हजार ५६६ खाटांची क्षमता असून, ११ हजार ३८० मंजूर आहेत. सध्या जिल्ह्यात ६ हजार ५५९ रुग्ण उपचाराखाली असून, ५ हजार ७ खाटा अद्यापही रिक्त आहेत.

...

कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे, हे खरे आहे. परंतु, कोरोनामुक्तही होत आहेत. सध्या जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ८७.६ टक्के एवढा आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. काळजी घ्यावी. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना व नियोजन केले जात असून, लवकरच याला यश मिळेल, असा विश्वास आहे.