शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
फार्महाऊसवर सीक्रेट बैठक, असीम मुनीरचा तगडा प्लॅन; पुढील १० वर्ष पाकिस्तानवर करणार 'राज्य'
3
बस फक्त पेट्रोल, डिझेल तेवढे जीएसटीमध्ये आणायचे राहिले...; तिजोरीत फक्त २० रुपयेच आले असते...
4
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
5
मुंबई उपनगरात ईद-ए-मिलाद निमित्त सुट्टीच्या तारखेत बदल, ५ सप्टेंबरची सुट्टी कधी? जाणून घ्या
6
Delhi Flood: खवळलेल्या यमुनेचं भयावह रुप, पुराचं पाणी मंत्रालयाच्या उंबरठ्यावर, फोटो पहा
7
“हैदराबाद गॅझेटला सरकार अनुकूल, तेलंगणाप्रमाणे ४२ टक्के आरक्षण देणार का?”: हर्षवर्धन सपकाळ
8
GST च्या उत्साहानंतर बाजारात नफावसुली! सेन्सेक्स-निफ्टी उच्च पातळीवरून खाली, सर्वाधिक घसरण कुठे?
9
देवाची प्रत्यक्ष भेट! उपेंद्र लिमये यांना भेटले सुपरस्टार रजनीकांत, थलायवाला पाहून अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
10
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
11
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
12
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
13
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
14
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
15
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
16
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
17
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
18
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
19
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
20
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट

सकारात्मक बातमी; ५० हजार रुग्ण कोरोनामुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:54 IST

बीड : जिल्ह्यात सोमवारी कोरोनाने एक सकारात्मक बातमी दिली. कोराेनाबाधितांची संख्या वाढत असली तरी आतापर्यंत ५० हजार रुग्णांनी कोरोनावर ...

बीड : जिल्ह्यात सोमवारी कोरोनाने एक सकारात्मक बातमी दिली. कोराेनाबाधितांची संख्या वाढत असली तरी आतापर्यंत ५० हजार रुग्णांनी कोरोनावर मातही केली आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. बाधित आढळले तरी घाबरून न जाता योग्य उपचार घेऊन कोरोनामुक्त होऊ शकतो. सोमवारी नव्या १२५६ रुग्णांची भर पडली आहे. तसेच ११ जणांच्या मृत्यूची नोंद झाली असून, १०६५ जणांनी कोरोनावर मात केली.

जिल्ह्यात रविवारी तीन हजार ७४५ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. यापैकी दोन हजार ४८९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले, तर १२५६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे उघड झाले. बाधितांमध्ये बीड तालुक्यात सर्वाधिक २७९ रुग्ण आढळले. अंबाजोगाई २३७, आष्टी १०१, धारुर ६४, गेवराई ५५, केज १४३, माजलगाव ८८, परळी १२२, पाटोदा ६५, शिरुर ४७, वडवणी तालुक्यातील ५५ रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, ११ जणांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाच्या पोर्टलवर झाली. यात बीड शहरातील आसेफनगरातील ७० वर्षीय पुरुष, गजानन नगरातील ६१ वर्षीय महिला, तालुक्यातील जैताळवाडी येथील ६० वर्षीय महिला, येळंबघाट येथील ४१ वर्षीय महिला, खाडेवाडी येथील ५० वर्षीय महिला, शिरुर तालुक्यातील पाडळी येथील ६२ वर्षीय महिला, जरेवाडी (ता. धारूर) येथील ५५ वर्षीय महिला, माजलगाव तालुक्यातील गुंजवाडी येथील ७० वर्षीय महिला, माळेवाडी येथील ५५ वर्षीय पुरुष, परळी तालुक्यातील सिरसाळा येथील ५८ वर्षीय पुरुष यांचा समावेश आहे.

दरम्यान, आता एकूण रुग्णसंख्या ५८ हजार १२४ झाली आहे. पैकी ९५९ मृत्यू झाले असून, ५० हजार ६०६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. ही माहिती जि. प. सीईओ अजित कुंभार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. पी. के. पिंगळे यांनी दिली.

जिल्ह्यात १५२ आरोग्य संस्था

जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी शासकीय व खासगी अशा मिळून १५२ आरोग्य संस्था कार्यान्वित करण्यात आलेल्या आहेत. येथे ११ हजार ५६६ खाटांची क्षमता असून, ११ हजार ३८० मंजूर आहेत. सध्या जिल्ह्यात ६ हजार ५५९ रुग्ण उपचाराखाली असून, ५ हजार ७ खाटा अद्यापही रिक्त आहेत.

...

कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे, हे खरे आहे. परंतु, कोरोनामुक्तही होत आहेत. सध्या जिल्ह्याचा रिकव्हरी रेट ८७.६ टक्के एवढा आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. काळजी घ्यावी. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी उपाययोजना व नियोजन केले जात असून, लवकरच याला यश मिळेल, असा विश्वास आहे.