शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

निकृष्ट कामांमुळे रस्त्यांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:24 IST

दुर्गम भागात मोबाईल रेंजची समस्या अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील दुर्गम भागात मोबाईल रेंजची समस्या आजही ...

दुर्गम भागात मोबाईल रेंजची समस्या

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील दुर्गम भागात मोबाईल रेंजची समस्या आजही मोठ्या प्रमाणात आहे. खाजगी व बी.एस.एन.एल. कंपनीची सेवा चांगल्या पद्धतीने मिळत नाही. त्यामुळे तक्रार नेमकी कुठे व कोणाकडे करायची. ही समस्या कोण सोडवणार असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.

शहरातील अंतर्गत रस्ते खराब

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील अनेक अंतर्गत रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांवर गतिरोधक व खड्डे अधिक असल्याने वाहनचालकांना मोठा त्रास होत आहे. लहान मोठ्या अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. शहरातील अनेक भागात रस्त्यांची दुरवस्था असल्याने परिसरातील नागरिकांना व वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. या अंतर्गत रस्त्यांची दुरूस्ती करावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उमाकांत राऊत यांनी केली आहे.

पेरू स्वस्त

अंबाजोगाई : कडाक्याच्या थंडीत खोकला, सर्दी वगैरेंचे दुखणे टाळण्यासाठी शहरवासीयांनी पेरू खरेदी टाळल्याने पेरूचे भाव कोसळले आहेत. अंबाजोगाईच्या बाजारपेठेत पेरूची आवक वाढली. मात्र ग्राहक पेरू खरेदीसाठी तयार नाहीत. २० रुपये किलोपर्यंत चांगले पेरू बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत.

सुधारित किमान वेतनाची प्रतीक्षा

अंबाजोगाई : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुधारित वेतनात वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तरीही अजूनही या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतन कधी लागू होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या काळात अनेक कामे करून गावाला स्वच्छता दिली. अनेक समाजोपयोगी कामे करूनही त्यांची उपेक्षाच होत आहे.

रासायनिक खतांची मागणी वाढली

अंबाजोगाई : सध्या रब्बी हंगामातील पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात झाली. हरभरा, गहू, ज्वारी, करडई, कांदा, बटाटा यांच्याबरोबरच ऊस लागवडही मोठ्या प्रमाणात झाली. पेरणी होऊन दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटला. पिकांची खुरपणी, कोळपणी झाली. आता ऊस व इतर पिकांना खतांचा डोस देण्याची तयारी शेतकऱ्यांकडून सुरू आहे. रासायनिक खतांची मागणी वाढल्याने अंबाजोगाई परिसरात कृषी सेवा केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी दिसू लागली आहे.

भारनियमनामुळे रब्बी हंगाम धोक्यात

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात रब्बी हंगामातील हरभरा, गहू, ज्वारी, व ऊस लागवड आटोपली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पिके चांगली बहरली. यावर्षी चांगल्या झालेल्या पावसामुळे सर्वत्र पाण्याची मोठ्या प्रमाणात मुबलकता झाली आहे. मात्र, महावितरणकडून पाहिजे त्या प्रमाणात सहकार्य होत नाही. भारनियमन कमी दाबाने होणारा विद्युत पुरवठा, रात्रीची वीज या अनेक समस्यांमुळे विद्युत पंप चालत नाही. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.