शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
4
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
5
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?
6
उद्धव ठाकरेंची सोडली साथ, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच राजन तेली म्हणाले, "दुर्दैवाने तिथे..."
7
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
8
एआयपासून बनलेली जगातील पहिली अभिनेत्री, ओळखून दाखवणं कठीण; कलाकारांकडून तीव्र निषेध!
9
सकाळी रुग्णालयात... संध्याकाळी जिंकलं गोल्ड मेडल; रोझा कोझाकोव्स्काच्या जिद्दीला सॅल्यूट!
10
"मला त्याची गरज आहे...", घटस्फोटानंतर एकटीच करतेय मुलाचा सांभाळ; अभिनेत्री म्हणाली...
11
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
12
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
13
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
14
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
15
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
16
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
17
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
18
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
19
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
20
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी

निकृष्ट कामांमुळे रस्त्यांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:24 IST

दुर्गम भागात मोबाईल रेंजची समस्या अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील दुर्गम भागात मोबाईल रेंजची समस्या आजही ...

दुर्गम भागात मोबाईल रेंजची समस्या

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील दुर्गम भागात मोबाईल रेंजची समस्या आजही मोठ्या प्रमाणात आहे. खाजगी व बी.एस.एन.एल. कंपनीची सेवा चांगल्या पद्धतीने मिळत नाही. त्यामुळे तक्रार नेमकी कुठे व कोणाकडे करायची. ही समस्या कोण सोडवणार असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.

शहरातील अंतर्गत रस्ते खराब

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील अनेक अंतर्गत रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांवर गतिरोधक व खड्डे अधिक असल्याने वाहनचालकांना मोठा त्रास होत आहे. लहान मोठ्या अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. शहरातील अनेक भागात रस्त्यांची दुरवस्था असल्याने परिसरातील नागरिकांना व वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. या अंतर्गत रस्त्यांची दुरूस्ती करावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उमाकांत राऊत यांनी केली आहे.

पेरू स्वस्त

अंबाजोगाई : कडाक्याच्या थंडीत खोकला, सर्दी वगैरेंचे दुखणे टाळण्यासाठी शहरवासीयांनी पेरू खरेदी टाळल्याने पेरूचे भाव कोसळले आहेत. अंबाजोगाईच्या बाजारपेठेत पेरूची आवक वाढली. मात्र ग्राहक पेरू खरेदीसाठी तयार नाहीत. २० रुपये किलोपर्यंत चांगले पेरू बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत.

सुधारित किमान वेतनाची प्रतीक्षा

अंबाजोगाई : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुधारित वेतनात वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तरीही अजूनही या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतन कधी लागू होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या काळात अनेक कामे करून गावाला स्वच्छता दिली. अनेक समाजोपयोगी कामे करूनही त्यांची उपेक्षाच होत आहे.

रासायनिक खतांची मागणी वाढली

अंबाजोगाई : सध्या रब्बी हंगामातील पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात झाली. हरभरा, गहू, ज्वारी, करडई, कांदा, बटाटा यांच्याबरोबरच ऊस लागवडही मोठ्या प्रमाणात झाली. पेरणी होऊन दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटला. पिकांची खुरपणी, कोळपणी झाली. आता ऊस व इतर पिकांना खतांचा डोस देण्याची तयारी शेतकऱ्यांकडून सुरू आहे. रासायनिक खतांची मागणी वाढल्याने अंबाजोगाई परिसरात कृषी सेवा केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी दिसू लागली आहे.

भारनियमनामुळे रब्बी हंगाम धोक्यात

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात रब्बी हंगामातील हरभरा, गहू, ज्वारी, व ऊस लागवड आटोपली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पिके चांगली बहरली. यावर्षी चांगल्या झालेल्या पावसामुळे सर्वत्र पाण्याची मोठ्या प्रमाणात मुबलकता झाली आहे. मात्र, महावितरणकडून पाहिजे त्या प्रमाणात सहकार्य होत नाही. भारनियमन कमी दाबाने होणारा विद्युत पुरवठा, रात्रीची वीज या अनेक समस्यांमुळे विद्युत पंप चालत नाही. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.