शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
4
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
5
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'
6
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
7
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
8
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
9
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
10
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
11
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
12
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
13
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
14
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
15
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
16
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
17
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
18
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
19
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
20
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी

निकृष्ट कामांमुळे रस्त्यांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:24 IST

दुर्गम भागात मोबाईल रेंजची समस्या अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील दुर्गम भागात मोबाईल रेंजची समस्या आजही ...

दुर्गम भागात मोबाईल रेंजची समस्या

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील दुर्गम भागात मोबाईल रेंजची समस्या आजही मोठ्या प्रमाणात आहे. खाजगी व बी.एस.एन.एल. कंपनीची सेवा चांगल्या पद्धतीने मिळत नाही. त्यामुळे तक्रार नेमकी कुठे व कोणाकडे करायची. ही समस्या कोण सोडवणार असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला आहे.

शहरातील अंतर्गत रस्ते खराब

अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील अनेक अंतर्गत रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांवर गतिरोधक व खड्डे अधिक असल्याने वाहनचालकांना मोठा त्रास होत आहे. लहान मोठ्या अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. शहरातील अनेक भागात रस्त्यांची दुरवस्था असल्याने परिसरातील नागरिकांना व वाहनचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. या अंतर्गत रस्त्यांची दुरूस्ती करावी. अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते उमाकांत राऊत यांनी केली आहे.

पेरू स्वस्त

अंबाजोगाई : कडाक्याच्या थंडीत खोकला, सर्दी वगैरेंचे दुखणे टाळण्यासाठी शहरवासीयांनी पेरू खरेदी टाळल्याने पेरूचे भाव कोसळले आहेत. अंबाजोगाईच्या बाजारपेठेत पेरूची आवक वाढली. मात्र ग्राहक पेरू खरेदीसाठी तयार नाहीत. २० रुपये किलोपर्यंत चांगले पेरू बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत.

सुधारित किमान वेतनाची प्रतीक्षा

अंबाजोगाई : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या सुधारित वेतनात वाढ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तरीही अजूनही या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतन कधी लागू होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी कोरोनाच्या काळात अनेक कामे करून गावाला स्वच्छता दिली. अनेक समाजोपयोगी कामे करूनही त्यांची उपेक्षाच होत आहे.

रासायनिक खतांची मागणी वाढली

अंबाजोगाई : सध्या रब्बी हंगामातील पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात झाली. हरभरा, गहू, ज्वारी, करडई, कांदा, बटाटा यांच्याबरोबरच ऊस लागवडही मोठ्या प्रमाणात झाली. पेरणी होऊन दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधी लोटला. पिकांची खुरपणी, कोळपणी झाली. आता ऊस व इतर पिकांना खतांचा डोस देण्याची तयारी शेतकऱ्यांकडून सुरू आहे. रासायनिक खतांची मागणी वाढल्याने अंबाजोगाई परिसरात कृषी सेवा केंद्रावर शेतकऱ्यांची गर्दी दिसू लागली आहे.

भारनियमनामुळे रब्बी हंगाम धोक्यात

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात रब्बी हंगामातील हरभरा, गहू, ज्वारी, व ऊस लागवड आटोपली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पिके चांगली बहरली. यावर्षी चांगल्या झालेल्या पावसामुळे सर्वत्र पाण्याची मोठ्या प्रमाणात मुबलकता झाली आहे. मात्र, महावितरणकडून पाहिजे त्या प्रमाणात सहकार्य होत नाही. भारनियमन कमी दाबाने होणारा विद्युत पुरवठा, रात्रीची वीज या अनेक समस्यांमुळे विद्युत पंप चालत नाही. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.