शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक शौचलयांची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:35 IST

------------- महिला बचत गट आर्थिक संकटात अंबाजोगाई : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील अनेक महिलांनी बचत गटांची स्थापना ...

-------------

महिला बचत गट आर्थिक संकटात

अंबाजोगाई : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील अनेक महिलांनी बचत गटांची स्थापना केली. परंतु आर्थिक पाठबळ उपलब्ध होत नसल्याने स्वयंरोजगार उभारण्यासाठी महिला बचत गटांना विविध अडचणींचा मोठा सामना करावा लागत आहे. महिला बचत गटांच्या माध्यमातून काही वस्तू तयार करण्यात आल्या. तर त्या वस्तूंना योग्य बाजारपेठही उपलब्ध होत नसल्याने वस्तूंची विक्री रखडते व मोठ्या प्रमाणात भांडवल अडकून पडते. यामुळे महिला बचत गट आर्थिक संकटात सापडले आहे.

---------------

शेतकरी कर्ज माफीच्या लाभापासून वंचित

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील शेकडो शेतकरी अद्यापही शासनाच्या कर्जमाफी योजनेपासून वंचित आहेत. दोन लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रतीक्षा आहे. २७ डिसेंबर २०१९ रोजी राज्य शासनाने राज्यातील शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेची घोषणा केली होती. यामध्ये शेतकऱ्यांना टप्याटप्याने कर्जमाफी मिळणार होती. परंतु कोरोनाच्या उद्भवलेल्या संकटामुळे ही योजना लांबली. याचा मोठा फटका अंबाजोगाई तालुक्यातील शेतकऱ्यांना बसला आहे. या वंचित शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ लवकर मिळावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अॅड. संतोष लोमटे यांनी केली आहे.

------------

तंटामुक्त गाव समित्या कागदावरच

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यातील अनेक गावांना महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम पुरस्कार प्राप्त झाला आहे. मात्र, पुरस्कार प्राप्त झालेल्या गावांमध्ये अनेक वाद विवाद उद्भवत आहेत. तसेच तालुक्यातील अनेक गावांमध्ये अवैध धंदे सुरू असल्याने तंटामुक्त समितीचा बोझवारा उडत आहे. तंटामुक्त समितीमध्ये निवड होण्यासाठी चढाओढ लागते. परंतु प्रत्यक्ष कामाकडे मात्र, या समितीतील सदस्यांचे दुर्लक्ष होत आहे.

-------------------------------

कीटकनाशक फवारणीबाबत जनजागृती सुरू

अंबाजोगाई : पिकांवर फवारणीसाठी कीटकनाशकांचा वापर करताना घ्यावयाची काळजी यासंदर्भात कृषी विभागामार्फत जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेत पिकांवर फवारणीसाठी कीटकनाशकांचा वापर करताना विषबाधा होऊ नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून कोणकोणत्या प्रकारची काळजी घेणे आवश्यक आहे. यासंदर्भात गावावांगावात शेतकऱ्यांना माहिती देण्याची मोहीम गेल्या आठवडाभरापासून राबविण्यात येत आहे.

--------------------------------

प्लास्टिक पिशव्यांचा वापर वाढल्याने प्रदूषणात भर

अंबाजोगाई : शहरासह जिल्ह्यात प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून, सगळीकडे प्लास्टिकचा कचरा दिसत असून, शासनाच्या आदेशाला तिलांजली मिळत आहे. प्रदूषणात होणारी वाढ थांबविण्यासाठी प्लास्टिक पिशव्या बंद करण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला.

--------------------------------------

गढूळ पाण्याने नागरिक हैराण

अंबाजोगाई : शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून जलशुद्धीकरण केंद्र तयार करण्यात आले आहे. मात्र शहरातील विविध वॉर्डात आजही गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने आरोग्य धोक्यात आहे. शहरवासीयांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या सुलभा सोळंके यांनी केली आहे.