शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आष्टी आणि तुळजापूर येथील ‘सैराट’ जोडपी बीड पोलिसांच्या ताब्यात 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 17:12 IST

उस्मानाबादच्या तुळजापूरमधून आणि बीडच्या आष्टी तालुक्यातून पलायन केलेल्या सैराट जोडप्याला ताब्यात घेण्यात आले आहे.

ठळक मुद्दे बीडच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाची कारवाई

बीड : उस्मानाबादच्या तुळजापूरमधून आणि बीडच्या आष्टी तालुक्यातून पलायन केलेल्या सैराट जोडप्याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना आष्टी आणि तुळजापूर पोलिसांच्या स्वाधीन केले. ही कारवाई बीडच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने तुळजापूर आणि कर्जतमध्ये केली.

आष्टी तालुक्यातील कडा येथील चैताली (नाव बदललेले) हिला तिच्याच बहिणीचा दिर गणेश लक्ष्मण लोंढे (२२ रा.डिकसळ ता.कर्जत) याने पळवून नेले. ही घटना सप्टेंबर २०१७ रोजी घडली होती. आष्टी पोलिसांना याचा तपास न लागल्याने हे प्रकरण २६ जानेवारी २०१९ रोजी बीडच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे आले. कक्षाने अवघ्या चार तीन दिवसांत या प्रकरणाचा छडा लावला. दोघांनाही मिरजगाव येथून ताब्यात घेतले. त्यांना आष्टी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

दरम्यान, चैताली व गणेश हे सुरूवातीला पुण्यात राहिले. गणेश हा प्लंबरचे काम करीत होता. मात्र त्यावर त्यांचा खर्च भागला नाही. म्हणून ते मिरजगावला आले होते. हीच माहिती पोलिसांना मिळाली. बातमीदारामार्फत त्यांनी त्याच्या मित्राला गाठले. त्यांच्या माध्यमातून ते या जोडप्यापर्यंत पोहचले. रात्रीच्या वेळी जेवण सुरू असतानाच त्यांनी या जोडप्याला ताब्यात घेतले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि भारत माने, सफौ. शिवाजी भारती, प्रताप वाळके, सुरेखा उगले, सिंधू उगले, निलावती खटाणे, मिना घोडके, शेख शमिम, सतीश बहिरवाळ, विकास नेवडे आदींनी केली.

तुळजापुरच्या पीडितेची सुटकाएप्रिल २०१८ रोजी तुळजापुरमध्ये शेजारीच राहणाऱ्या नंदिनीला (नाव बदललेले) महेश तुळशीराम लोंढे (२२) याने पळवून नेले होते. तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता. हा गुन्हा बीडच्या एएचटीयू विभागाकडे येताच त्यांनी याचा तपास लावला. तुळजापुरमधूनच नंदिनीची सुटका केली. मात्र महेशने आगोदरच पलायन केले. पीडितेला पोलीस, नातेवाईकांच्या स्वाधीन केले. या गुन्ह्यात महेशच्या आई-वडिलांना अटक केली होती.

टॅग्स :PoliceपोलिसArrestअटकBeedबीड