शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
2
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
3
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
4
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
5
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
6
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
7
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
8
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
9
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
10
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
11
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
12
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
13
मोहम्मद युनूस यांचा तो एक निर्णय, ज्यामुळे बांगलादेश आज हिंसाचाराच्या आगीत होरपळतोय...
14
कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
15
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
16
कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
17
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
19
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
20
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

वास्तवाचे चित्रण करणाऱ्या कवींना रसिकांची दाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 00:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : ३४ व्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहातील कवी संमेलनाने वास्तववादी विषयांवर प्रकार करीत रंगत आणली. ...

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : ३४ व्या यशवंतराव चव्हाण स्मृती समारोहातील कवी संमेलनाने वास्तववादी विषयांवर प्रकार करीत रंगत आणली. समाजातील वास्तवाचे चित्रण करणाºया कवींना रसिक श्रोत्यांनी भरभरून दाद दिली. महाराष्ट्राच्या कोनाकोप-यातून अतिशय प्रतिभावान व ताकदीचे कवी संमेलनातून अंबाजोगाईकरांना ऐकता आले.कवी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी माजलगाव येथील ज्येष्ठ कवी प्रभाकर साळेगावकर हे होते. या संमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन पवन नालट (अमरावती) यांनी केले.या संमेलनात शामसुंदर सोन्नर (परळी),एजाज शेख (भुसावळ), अंकुश आरेकर (मोहोळ), संगीता कदम-झिंजुरके (बीड), डी.के.शेख (उस्मानाबाद) या कवींनी संमेलनात सहभाग घेतला. सूत्रसंचालन अभिकथाकार विवेक गंगणे राडीकर यांनी केले. प्रास्ताविक अभिजीत जोंधळे यांनी केले. प्रभाकर साळेगावकर यांनी‘बाराच्या भावात आम्हीच विकलेकाल जे पिकले वावरातसोडी नाही पाठ भावाचा उन्हाळाआता आल्या झळा जीवघेण्या’या ओळी सादर करत संमेलनाला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी आत्महत्याग्रस्त शेतक-यांची व्यथा मांडली.यावेळी गजलकार एजाज शेख (भुसावळ) यांनी कवी संमेलनात आपली पहिली रचना सादर केली.‘ठेवले मी जसे ओठ ओठावरीश्वास गंधाळला चिंब झाल्या सरीकाय देणार ते सांत्वना यार होदु:ख माझे निघाले आता भरजरीपाहिजे तर तुझी पूर्णकर वासनापण मला देवून जा एक भाकरी’या सारख्या रचनेमधून उपस्थित रसिक श्रोत्यांना साद घातली. प्रेम, विरह, धर्म, राजकारण, शेती आणि समाजकारण या विषयीचे वास्तववादी भाष्य एजाज शेख यांनी आपल्या मराठी, उर्दू गजलांमधुन पेश केले.शामसुंदर सोन्नर यांनी आपल्या विडंबन कवितांमधून, समाजातील, शासन व्यवस्थेतील विरोधाभास नेमकेपणाने टिपला. ‘शेतकºयांचा हनीमून’ व ‘संपादक साहेब’ या कवितांना रसिक श्रोत्यांनी मनमुराद दाद दिली.‘आला भरात जोंधळाउधाणलं सार रानंअन बांधावरल्या कुपीततुझा माझा हनीमुन’या कवितेसह त्यांनी विदर्भ, मराठवाड्यातील दुष्काळाचे विदारक चित्र मांडले. संगीता कदम झिंजुरके यांनी ‘श्रृंगार मराठीचा’ या कवितेतून मराठीचे सौंदर्य खुलविणारी तसेच दुष्काळावर भाष्य करणारी कविता सादर केली.अंकुश आरेकर या तरूण कवीने आवाज, बहारदार सादरीकरण, चपखल शब्दफेक करत ‘बोचलं म्हणून’ ही कविता सादर केली. चहा विकला असे सांगणा-या पंतप्रधान मोदी यांचा समाचार ‘विकला असेल चहा, म्हणून देश विकायचा असतो का?’ या कवितेतून आरेकर यांनी घेतला. उस्मानाबाद येथील बी.के.शेख यांनी ‘अयं’ या कवितेतून पुढारी व कार्यकर्त्यांमधील दरी दाखविली.‘अयं राजकारण करतोस कायअयं आपलंच घर भरतोस कायआलिशान माडीत राहतोस काय’असा सवाल करून त्यांनी राजकीय नेत्यांचा जगण्यातील विरोधाभास सभागृहासमोर ठेवला. त्यांच्या दख्खणी भाषेतील कवितांनाही रसिक श्रोत्यांनी डोक्यावर घेतले.‘घडी-घडी खुजाता कैकूखुजाकर अपनी सुजाता कैकूएक कोनेमे चुप बैठना सालेगाजर की पुंगी बजाता कैकू’अशी रचना सादर केली. कवि संमेलनाचे सूत्रसंचालन करून पवन नालट यांनी दाद मिळविली.कवि संमेलनास भगवानराव शिंदे, राजपाल लोमटे, प्राचार्य डॉ.कमलाकर कांबळे, दगडू लोमटे, सतीश लोमटे, प्रा.भगवान शिंदे, त्र्यंबक पोखरकर, प्रा.सुधीर वैद्य, डॉ.प्रकाश प्रयाग, प्रा.शर्मिष्ठा लोमटे आदींसह संयोजन समितीचे पदाधिकारी, साहित्य रसिक बहुसंख्येने उपस्थित होते.

टॅग्स :cultureसांस्कृतिकliteratureसाहित्यSocialसामाजिक