शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

अंबाजोगाई-वाघाळा रस्त्याची दुर्दशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2021 04:07 IST

रस्ता निसरडा झाल्याने अपघात सुरूच अंबाजोगाई - अंबाजोगाई ते वाघाळा हा अंबाजोगाई शहरातील वर्दळीचा रस्ता. गेल्या चार वर्षांपासून ...

रस्ता निसरडा झाल्याने अपघात सुरूच

अंबाजोगाई - अंबाजोगाई ते वाघाळा हा अंबाजोगाई शहरातील वर्दळीचा रस्ता. गेल्या चार वर्षांपासून कामाविना रखडला असल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत . याचा मोठा त्रास या परिसरातील रहिवाशांना निमूटपणे सहन करावा लागत आहे. आता पावसाने या रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साठल्याने व रस्ता निसरडा झाल्याने या रस्त्यावर दररोज लहान मोठे अपघात होत आहेत.

अंबाजोगाई ते वाघाळा या रस्त्यावर शहरात नव्याने झाल्याने अनेक वसाहती आहेत. योगेश्वरी नगरी पासून पाच किमी अंतरावर मोठ्या प्रमाणात घरांची संख्या वाढली. मात्र या परिसरात रस्त्यांचा मोठा अभाव आहे. मुख्य असणारा अंबाजोगाई ते वाघाळा रस्त्याचे काम गेल्या चार वर्षांपासून रखडले आहे. शेतकऱ्यांसाठी ही हा रस्ता महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे या रस्त्यावरील रहदारी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे. त्यातच पडणारा पाऊस याचा मोठा त्रास या परिसरातील रहिवाशांना सहन करावा लागत आहे. वृद्ध, महिला, लहान मुले व नागरिकांना आपला जीव मुठीत धरून रस्ता पार करावा लागतो. पावसामुळे होत असलेला चिखल व निसरडा रस्ता यामुळे लहान-मोठे अपघात या परिसरात नित्याचेच झाले आहेत. चार वर्षांपूर्वी या रस्त्याचे काम झाले होते. मात्र, काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने हा रस्ता पुन्हा खराब झाला. सध्या तर या रस्त्याची मोठी दुर्दशा झाली आहे. या परिसरातील नागरिकांनी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही त्याची दखल घेण्यात आली नाही. रहदारीचा असणारा हा रस्ता बांधकाम विभागाने तत्काळ सुरू करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नरसिंग दरगड,मिलींद बाबजे,सतीश दहातोंडे,गणेश शिंदे यांनी केली आहे.

या संदर्भात जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता यांच्याकडे विचारणा केली असता. या रस्त्याच्या कामासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

120721\img-20210603-wa0122.jpg

अंबाजोगाई-वाघाळा रस्त्याची मोठी दुर्दशा झाली आहे