शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

गेवराईतून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:23 IST

गेवराई : शहरातून जाणाऱ्या बीड रोड बायपास ते जालना रोड व बायपासपर्यंतच्या ६ किलोमीटर अंतराच्या राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी ...

गेवराई : शहरातून जाणाऱ्या बीड रोड बायपास ते जालना रोड व बायपासपर्यंतच्या ६ किलोमीटर अंतराच्या राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी लहान-मोठे खड्डे पडल्याने याचा त्रास वाहनधारकांना होत आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे त्वरित बुजवावेत, अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शेख एजाज यांनी केली आहे.

गेवराई, बीड या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या काही वर्षात पूर्ण झाल्याने आता हा रस्ता चांगला झाला. तसेच गेवराई शहराबाहेरून वळण रस्ता झाल्याने वाहनधारकांना सुकर झाले. मात्र पूर्वीचा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून झालेले नाही. बीड रोड बायपास ते जालना रोड बायपास या शहरातून जाणाऱ्या ६ किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे तीन तेरा वाजले आहेत. रस्त्यावर जागोजागी मोठमोठे खड्डे पडल्याने व आता पावसाळा सुरू झाल्याने खड्ड्यात पाणी साचून झालेले खड्डे वाहनधारकांना रात्रीच्या वेळेला दिसत नसल्याने अपघाताला निमंत्रण दिल्यासारखे झाले आहे. हे पडलेले खड्डे एवढे वाढले आहेत की रस्त्याची अक्षरश: चाळणी झाली आहे. तर पाऊस पडल्यावर वाहनधारकांची वाहने अनेक वेळा घसरून पडल्याने अपघात झाले आहेत. तरी रस्त्यावर पडलेले खड्डे प्रशासनाने त्वरित बुजवावे, अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शेख एजाज यांनी केली आहे.

===Photopath===

100621\20210610_142522_14.jpg