शहरं
Join us  
Trending Stories
1
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
2
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
3
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
4
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
5
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
8
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
9
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
10
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
11
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
12
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
13
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
14
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
20
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा

कुटुंबाच्या मेहनतीने बहरली पेरूची बाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:37 IST

कडा : विनाअनुदानित संस्थेवर नोकरी करताना अल्प मानधन त्यातच कुटुंबातील सदस्यांची जबाबदारी पार पाडताना व आधुनिक शेती करताना ...

कडा : विनाअनुदानित संस्थेवर नोकरी करताना अल्प मानधन त्यातच कुटुंबातील सदस्यांची जबाबदारी पार पाडताना व आधुनिक शेती करताना अडचणींचा डोंगर समोर होता; परंतु वडिलांचे स्वप्न आणि मित्राच्या मार्गदर्शनातून घरात पैसा नसताना उसनवारी करून थेट झारखंड येथून पेरूची रोपे आणून लागवड केली. दिवसरात्र मेहनतीच्या जोरावर कुटुंबातील सदस्यांच्या कष्टाने दीड एकरात फुलवलेल्या पेरूच्या बागेने साथ दिली. पेरूची बाग आणि आंतरपिकाने विस्कटलेली आर्थिक घडी बसविण्याची किमया केली.

आष्टी तालुक्यातील कडा -पैठण -बारामती रोडलगत असलेल्या चोभानिमगांव येथील सचिन वसंतराव गिऱ्हे यांचे शिक्षण बी.एस्सी.बी.एड. झाले. नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात एका खासगी शिक्षण संस्थेत नोकरी मिळाली. विनाअनुदानित संस्था असल्याने अल्प मानधन, घरात आई, वडील, पत्नी, दोन मुले असताना आधुनिक पद्धतीने शेती करताना कुटुंब चालवताना अनंत अडचणी निर्माण व्हायच्या. मेळ लागत नव्हता. मित्राच्या मार्गदर्शनातून फळबाग शेती करण्याचा निर्णय घेतला, पण पैसा नसल्याने अडचणी होत्या. ‘धाडस करून बघू’ म्हणत उसनवारी करून मित्रांना सोबत घेऊन थेट झारखंड गाठले. तेथून ४०० रोपे जांभूळ, ६०० रोपे सीताफळ, १५७ रोपे केसर अंबा, ११०० रोपे पेरू, १२०० रोपे पपईची खरेदी केली. पाच एकर क्षेत्रांत २०२० मध्ये लागवड केली. ठिबक सिंचनच्या साहाय्याने आंतरपीक म्हणून झेंडू, शेवंती फुलपिके घेतली. झेंडूने मागील वर्षात मोठ्या प्रमाणावर आर्थिक उत्पन्न मिळवून दिले. यावर्षी पेरू विक्रीला आले असून ७० रुपये किलोचा भाव मिळाला. अडीच टन उत्पादनातून दीड लाखाचे उत्पन्न मिळाले. आणखी पन्नास हजार रुपये राहिलेल्या पेरूची मिळतील, असा अंदाच सचिन गिऱ्हे यांनी व्यक्त केला.

बाग लावून फुलविली, फळे बहरली, पण विकण्यासाठी बाजारपेठेची गरज होती. विशेष म्हणजे तालुक्यातच बाजारपेठ उपलब्ध केली असून ऑनलाईन घरपोच विक्री करीत बदलत्या विक्री व्यवस्थेची कास धरली. नोकरी करून वडील वसंतराव, आई आशाबाई, पत्नी आश्विनी, मुले आर्यन व अर्णव, चुलत भाऊ तुषार यांच्या मदतीने फुललेल्या फळबागेने कुटुंबाची आर्थिक घडी चांगली बसवली. बाजारपेठ व नवीन तंत्रज्ञान अवगत करून तरुणांनी शेती करायचे धाडस निर्माण करत कृषी विभागाचे सल्ले घेऊन शेती केल्यास आपली परिस्थिती आपणच बदलू शकतो, यासाठी तरुणांनी आधुनिक पद्धतीची शेती करण्याचा सल्ला सचिन गिऱ्हे यांनी दिला.