शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
6
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
7
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
8
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
9
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
10
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
11
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
12
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
13
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
14
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
15
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
16
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
17
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
18
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
19
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
20
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा

शैक्षणिक अभ्यासक्रम व शेती मशागतीसाठी दिली मुभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:34 IST

जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय : लॉकडाऊनच्या आदेशात अंशत बदल बीड : जिल्ह्यात २५ मार्चच्या मध्यरात्रीपासून ४ एप्रिल २०२१ पर्यंत संचारबंदी लागू ...

जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय : लॉकडाऊनच्या आदेशात अंशत बदल

बीड : जिल्ह्यात २५ मार्चच्या मध्यरात्रीपासून ४ एप्रिल २०२१ पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. यात अंशत: बदल करण्यात आला असून, महाविद्यालय , शालेय, आय टि आय, कृषी महाविदयालय अभियांत्रिकी व इतर शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या परीक्षेस व प्रवेशास नियुक्त अधिकारी, कर्मचारी , प्राध्यापक, विद्यार्थी यांना केवळ परीक्षेस व प्रवेशास उपस्थित राहण्यास मुभा देण्यात येत आहे. तसेच मशागतीसाठी देखील मुभा देण्यात आल्याचा निर्णय जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी घेतला आहे.

विद्यार्थ्यांना व संबंधितांनी सोबत ओळखपत्र ,नियुक्तीपत्र, आधारकार्ड ठेवणे बंधनकारक राहील. तसेच जिल्ह्यातील सर्व औषधालये २४ तास चालू राहतील. याचबरोबर पूर्वीच्या आदेशात ट्रॅक्टर संपूर्णत: बंद राहतील, असे आदेशीत करण्यात आले होते. त्यात अंशत: बदल करण्यात आले असून, केवळ शेती मशागतीसाठीच ट्रॅक्टरला मुभा देण्यात आली आहे. संचारबंदी दरम्यान सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेची कार्यालये शासन नियमाप्रमाणे चालू राहतील. या आदेशाचे पालन न करणारी, उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार येईल, त्यामुळे कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी केलेल्या लॉकडाऊनला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांनी केले आहे.