शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

माजलगावात तीन कृषी केंद्रांचे परवाने कायम रद्द; तिघांवर निलंबनाची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 17:45 IST

किंमतीपेक्षा जास्त दराने रासायनिक खतांची विक्री केल्याचे आढळुन आल्यास होणार कारवाई

माजलगाव : शहरातील तीन कृषी सेवा केंद्रावर अनियमितता आढळुन आल्याने त्यांचे परवाने कायमस्वरुपी रद्द करण्यात आले आहेत. तर इतर तीन केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

तालुक्यातील काही कृषी सेवा केंद्राची तपासणी खत निरीक्षक तथा कृषी  अधिकारी पंचायत समिती यांनी केली. यावेळी केंद्रात रासायनीक खताचा साठा फलक ग्राहकास स्पष्ट दिसेल अशा ठिकाणी न लावणे, विक्री बिलामध्ये आवश्यक सर्व मजकुर तसेच विक्रेता व खरेदीदाराची स्वाक्षरी नसणे, साठा पुस्तक प्रमाणीत नसणे , साठा पुस्तक जुळत नसणे , नोंदणी प्रमाणपत्रामध्ये दुकानात विक्रीस ठेवण्यात आलेल्या उत्पादकाच्या स्त्रोतांचा समावेश नसणे या त्रुटी आढळुन आल्या.

यामुळे सदरील कृषी सेवा केंद्रावर कारवाई करण्यासाठी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांना शिफारस करण्यात आली होती. यांमध्ये सुनावणी घेऊन सुमित अॅग्रो एजन्सी, मोरेश्वर बीज भांडार  व सदगुरु कृषी सेवा केंद्र  यांचे परवाने दिनांक १५ जून २०२० पासून कायमस्वरुपी रद्द करण्यात आले आहेत. तसेच दिपक बिज भांडार , ज्ञानेश्वर बीज भांडार व नमन कृषी  सेवा केंद्र ( सर्व माजलगाव ) यांचे परवाने दि. १५ जून २०२० पासून पुढील आदेशापर्यंत कृषी अधिकारी बीड यांनी निलबिंत केले आहेत. 

सर्व कृषी सेवा केंद्र चालकांनी बियाणे, रासायनिक खते व किटकनाशके कायदा- अधिनियमानुसार सर्व अभिलेख अद्यावत व परिपूर्ण ठेवावेत. तसेच किंमतीपेक्षा जास्त दराने रासायनिक खतांची विक्री केल्याचे आढळुन आल्यास कारवाई करण्यात येईल अशी माहिती तालुका कृषि अधिकारी शिवप्रसाद संगेकर यांनी दिली आहे.

टॅग्स :suspensionनिलंबनagricultureशेतीBeedबीड