शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आधी ॲडव्हान्स भरा, मगच उपचार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:35 IST

बीड : जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने सर्वच भीतीयुक्त वातावरणात जगत आहेत. त्यातच खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची अडवणूक ...

बीड : जिल्ह्यात सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने सर्वच भीतीयुक्त वातावरणात जगत आहेत. त्यातच खासगी रुग्णालयांकडून रुग्णांची अडवणूक केली जात असून, अगोदर ॲडव्हान्स भरा, मगच उपचार, अशी भूमिका बीड शहरातील बहुतांश खासगी डॉक्टर घेत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, दाखल होण्यापूर्वीच ५० हजार ते १ लाख रुपयांची मागणी केली जात आहे. तक्रारी नाहीत, असे सांगत प्रशासनाकडूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

जिल्ह्यात मागील महिन्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दररोज ५०० ते ७०० नवीन रुग्णांची भर पडत असल्याने बाधितांच्या संख्येने २९ हजारांचा आकडाही ओलांडला आहे. तर दुसऱ्या बाजूला होणारा मृत्यूचा आकडाही चिंताजनक आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे शासकीय आरोग्य संस्थांमधील खाटा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. ज्यांना लक्षणे नाहीत अथवा कमी आहेत अशांना कोविड केअर सेंटरमध्ये पाठविले जात आहे. अगोदरच कोरोनाने घाबरलेले लोक सेंटरमध्ये गेल्यावर जास्तच घाबरतात. त्यामुळे आता ते खासगी रुग्णालयांकडे धाव घेतात. येथे त्यांची लाखोंची लुटमार होत असल्याचे समाेर येत आहे.

दरम्यान, सध्या तर बीडसह जिल्ह्यातील बहुतांश खासगी कोविड सेंटरमध्ये बाधित असो वा संशयित अगोदरच ५० हजार ते १ लाख रुपये ॲडव्हान्स भरल्याशिवाय दाखल करून घेत नाहीत. दाखल करून घेतल्यावरही त्यांच्याकडून शासकीय दरापेक्षाही जादा बिल घेतले जात असल्याचे अनेक रुग्णांनी तक्रारी केल्या आहेत. जास्त पैसे घेऊनही त्यांना कसल्याच सुविधा नाहीत, हे देखील खरे असून, जिल्हा आरोग्य विभाग याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. याचा फटका सामान्य रुग्णांना सहन करावा लागत असून, ही लुटमार व अडवणूक थांबवावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे विभागीय अध्यक्ष राहुल वाईकर यांनी केली आहे.

आयसीयू नव्हे जनरल वॉर्ड

ज्या रुग्णाला आयसीयू म्हणून दाखल केले जाते, तेथे जनरल वॉर्डपेक्षाही खराब व्यवस्था असते. शेजारी शेजारी खाटा आणि सर्वत्र गर्दी असते, तसेच शौचालय आणि ऑक्सिजनची व्यवस्थाही व्यवस्थित नसते, व्हेंटिलेटर ठेवायलाही खुर्ची नसते, अशी बिकट परिस्थिती असतानाही शासनाचे दर आहेत, असे सांगून एका खाटेसाठी प्रतिदिन ९ हजार रुपये वसूल केले जात आहेत. खासगी रुग्णालयांतील हे प्रकार दिसत असतानाही आरोग्य विभाग केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत.

रक्त, औषधही बाहेरुनच

एखाद्या रुग्णाला रक्त अथवा औषध लागत असतील तर थेट नातेवाइकांच्या हातात चिठ्ठी देऊन आणण्यास सांगितले जात आहे. अगोदरच नातेवाईक घाबरलेले असतात, त्यात डॉक्टरांकडून हातात चिठ्ठी ठेवली जाते. औषधांचा तुटवडा असल्याने नातेवाइकांना काळ्या बाजारातून खरेदी करावे लागते. यात त्यांची आर्थिक लूट होत आहे. खासगी रुग्णालयात सर्व औषध उपलब्ध असणे आवश्यक आहे; परंतु ते नातेवाइकांचीच धावपळ करतात.

--

जिल्ह्यातील शासकीय कोविड सेंटर २०

खासगी कोविड सेंटर ३३

एकूण खाटांची क्षमता ४२३६

एकूण मंजूर खाटा ३७९६

एवढ्या खाटांवर रुग्ण उपचाराखाली २९०९

एकूण रिक्त खाटा ८८७