शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
6
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
7
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
8
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
9
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
10
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
11
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
12
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
13
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
14
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
15
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
16
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
17
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
18
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
19
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
20
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत

प्रवाशांनो तिकीट सांभाळून ठेवा, नसता मोजावे लागेल दुप्पट भाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:40 IST

राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी २२ सप्टेंबर ते ...

राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी २२ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबरदरम्यान राज्यभरात प्रवासी तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत विभागातील मार्ग तपासणी पथकातील व आगारातील सर्व पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांचा समावेश असणार आहे. तपासणी मोहीम राबविताना मार्ग तपासणी पथकातील व आगारातील सर्व पर्यवेक्षकीय कर्मचारी गणवेशात असणार आहेत. आगारातील पर्यवेक्षकांना स्थानकावर उतरणाऱ्या प्रवाशांची तिकीट तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मोहीम राबविताना बसस्थानकावर आलेल्या बीड व इतर विभागांच्या सर्व बसेसची तपासणी हे पथक करत आहे.

...अशी होईल दंडात्मक कारवाई

राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी विनातिकीट प्रवास करू नये, आपली तिकिटे काळजीपूर्वक जपून ठेवावीत, मोटार वाहन कायदा १९८८ नुसार विनातिकीट प्रवास करणाऱ्या व्यक्तीकडून त्याने दिलेल्या भाड्याव्यतिरिक्त प्रवास भाड्याच्या दुप्पट रक्कम रुपये शंभर यापैकी जी अधिक असेल ती रक्कम दंड म्हणून वसूल करण्यात येणार आहे.

तीन हजार बस तपासल्या, १०५ जणांवर कारवाई

रापमच्या वतीने राज्यात ही मोहीम सुरू होण्याआधी बीड विभागात चालविलेल्या मोहिमेत ३ हजार १२५ बसेस तपासण्यात आल्या. दिवसाकाठी शंभर बसेसची तपासणी झाली. यात १०७ प्रकरणे आढळली. कमी भाडे, गहाळ तिकीट, विनातिकीट प्रवासी आढळून आले. त्यांच्याकडून चुकवलेल्या प्रवास भाड्याच्या दुप्पट रक्कम त्यांच्याकडून वसूल करण्यात आली. एकूण ६ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याचे विभाग नियंत्रक अजयकुमार मोरे यांनी सांगितले.

...अशी होणार तपासणी

प्रवास भाडे वसूल करून प्रवाशांना योग्य तिकीट दिले दिले जाते का? विनातिकीट कोणी प्रवास करतोय का? तिकिटांची पुनर्विक्री होते का? तपासरीदरम्यान वाहकाकडे राज्य परिवहन महामंडळाची रक्कम कमी अथवा जास्त आढळते का? याची ग्रामीण लांब व मध्यम लांब पल्ल्याच्या बसेस, तसेच आंतरराज्य बसेसची तपासणी होणार आहे.

तिकीट सांभाळणे हिताचेच

प्रवासादरम्यान प्रवाशांनी त्यांच्याकडील तिकीट सांभाळून ठेवणे महत्त्वाचे आहे. गुंतागुंत निर्माण झालेल्या प्रकरणात तिकीट काढल्याचा व प्रवास केल्याचा पुरावा उपलब्ध होऊ शकतो, तसेच अपघात किंवा आपत्तीच्या प्रसंगात संबंधित प्रवासी हा रापमच्या बसमधून प्रवास करीत होता, हे काढलेल्या तिकिटाच्या आधारे सिद्ध करता येऊ शकते.