शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
3
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
4
"रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?" मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
5
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
6
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
7
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
8
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
10
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती
11
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
12
25 वर्षांच्या प्रियकराकडून 36 वर्षीय प्रेयसीची हत्या; दोन दिवसांनंतर हॉटेलमध्ये सापडला मृतदेह
13
आपल्याच कंपनीत अधिकाऱ्यांपेक्षाही कमी सॅलरी घेतात गौतम अदानी, पाहा किती आहे त्यांचं वेतन?
14
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
15
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
16
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
17
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
18
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
19
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
20
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!

राष्ट्रीय महामार्गावर खडी टाकून गुत्तेदार पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:35 IST

धारूर : खामगाव पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावर अरणवाडी साठवण तलावालगत पाचशे फूट रस्ता उंचीचे काम सुरू आहे. या ...

धारूर : खामगाव पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गावर अरणवाडी साठवण तलावालगत पाचशे फूट रस्ता उंचीचे काम सुरू आहे. या रस्त्यावर मागील दहा दिवसांपूर्वी गुत्तेदाराने कोरडी खडी टाकली आहे. मात्र, खडी टाकल्यानंतर यावर काहीच न करता गुत्तेदार पसार झाला आहे. यामुळे येथील वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.

खामगाव - पंढरपूर हा राष्ट्रीय मार्ग धारूर येथील घाटातून जात आहे. येथील घाटालगत अरणवाडी आठवण तलावाचे काम सुरू आहे. हा रस्ता तलावाबाहेरून काढण्यात आला आहे. रस्त्याचा पाचशे फूट अंतराचा भाग हा तलावात येत आहे. तलावाची धार कोंडल्यास या रस्त्यावर भविष्यात पाणी येण्याची शक्यता असल्याने, मागील काही महिन्यांपासून सदरील रस्त्याची उंची वाढविण्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. सदरील रस्त्याचे कामही सुरू करण्यात आले होते. रस्त्यावर मुरुम टाकून उंची वाढविली आहे. उंची वाढविताना काही भागांत अर्धवट मुरुम टाकण्यात आला होता. रस्त्यावर मुरुम टाकल्यानंतर मागील अनेक महिन्यांपासून काम बंद होते. काही ठिकाणी रुंद तर काही ठिकाणी अगदी अरुंद असे काम करण्यात आले आहे. ऐन वळणाच्या ठिकाणी रस्ता अरुंद करण्यात आल्याने भविष्यात अपघाचा धोका निर्माण होणार होता. तलावाचे पाणी रस्त्यावर येऊ नये, म्हणून रस्त्याची उंची वाढविली आहे. मात्र, उंची वाढवितांना वळणाच्या ठिकाणी रस्ता रुंद करण्याची गरज होती. यामुळे दोन वाहने जाण्यास अडचण येणार आहे. रस्ता तलावातून जात आहे आणि अरुंद असल्याने भविष्यात धोका आहे. त्यातच मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे दोन ते तीन ठिकाणी हा रस्ता खचून गेला होता. त्यावर गुत्तेदाराने खचलेल्या जागी मुरुम टाकला आहे. सध्या तलावाचे धार कोंडण्याचे काम वेगाने सुरू आहे. यामुळे तलावाच्या कामाबरोबरच रस्ता उंच करण्याचे कामही गतीने होणे गरजेचे होते, परंतु हे काम मागील अनेक महिन्यांपासून धिम्या गतीने सुरू आहे. याकडे संबंधित रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे, त्यांची प्रतिक्रिया घेण्यासाठी फोन केला, तर संपर्क होऊ शकला नाही.

----

पावसाळ्याआधी काम गरजेचे

दहा पंधरा दिवसांपूर्वी मुरुम टाकलेल्या ठिकाणावर कोरडी खडी टाकण्यात आली असून, ती रस्त्यावर पसरवली आहे. त्यावर मुरुम अथवा डांबरही टाकण्यात आलेले नाही. खडी टाकल्यानंतर, त्यावर काहीच न करता गुत्तेदार मात्र पसार झालेला आहे. यामुळे येथे वाहतुकीस अडथळा येत आहे. सध्या या रस्त्याच्या बाजूने वाहतूक अडवली असली, तरी पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करणे गरजेचे आहे, परंतु गुत्तेदार मात्र खडी टाकून प्रसार झाल्यामुळे हे काम वेळेत होणार की नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

===Photopath===

080521\img-20210508-wa0110_14.jpg