शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

परळी-नगर रेल्वे काम अपु-या निधीमुळे रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 00:41 IST

अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी केंद्र शासनाच्या तुलनेत राज्य सरकारची तरतूद अत्यंत कमी असल्यामुळे हे काम रखडलेले आहे. या मार्गासाठी राज्य शासनाकडून २५० कोटी रुपये देणे बाकी आहेत. हा निधी मिळाला तर या कामास गती मिळेल, अशी मागणी आ. अमरसिंह पंडित यांनी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे केली.

ठळक मुद्देसोलापूर-बीड-जळगाव रेल्वेमार्गाचे पुन:सर्वेक्षण करा - अमरसिंह पंडित

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी केंद्र शासनाच्या तुलनेत राज्य सरकारची तरतूद अत्यंत कमी असल्यामुळे हे काम रखडलेले आहे. या मार्गासाठी राज्य शासनाकडून २५० कोटी रुपये देणे बाकी आहेत. हा निधी मिळाला तर या कामास गती मिळेल, अशी मागणी आ. अमरसिंह पंडित यांनी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे केली.

नागपूर येथे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी या रेल्वेमार्गाच्या संदर्भात बैठक झाली. या बैठकीस दिवाकर रावते, आ.अमरसिंह पंडित, मध्य रेल्वेचे मुख्य अभियंता विरेंद्रकुमार अग्रवाल, कार्यकारी अभियंता एम.के. सिरोलिया, गृह विभागाचे सचिव, परिवहन विभागाचे सचिव, सभापती कार्यालयाचे सचिव आदी अधिकारी उपस्थित होते.

यावेळी मध्य रेल्वेचे मुख्य अभियंता विरेंद्रकुमार अग्रवाल यांनी अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गात येणाºया अडचणी आणि राज्य शासनाकडून निधी उपलब्धतेसाठी होणारी दिरंगाई याविषयी चिंता व्यक्त केली. २०१२ मध्ये सोलापूर-बीड-जळगाव रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करण्यात आले असून, त्यासाठी ३२६७ कोटी रुपये अंदाजित खर्च असून, हा मार्ग किफायतशीर नसल्याचा अहवाल प्राप्त झाल्याचे अग्रवाल यांनी सांगितले.

यावेळी सोलापूर- बीड- जळगाव रेल्वेमार्गासाठी आग्रह धरीत तो कसा फायदेशीर आहे, हे आ. पंडित यांनी बैठकीत सांगत या मार्गाचे पुन:सर्वेक्षण करण्याची मागणी केली. मुख्य अभियंता अग्रवाल यांनी तीन महिन्यात नवीन सर्वेक्षण पूर्ण करण्यात येऊन, याबाबतचा अहवाल सादर करण्यात येईल, असे आश्वासन दिले. सोलापूर-बीड-जळगाव रेल्वेमार्गासाठी आ. पंडित यांनी वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे. या सततच्या पाठपुराव्यामुळे पुन्हा एकदा या मार्गांचे सर्वेक्षण होऊन त्यास मंजुरी मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. अहमदनगर- बीड- परळी रेल्वेमार्गाचे १२ किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून, नारायणडोह ते सोलापूरवाडी या दुस-या टप्प्याचे काम प्रगतिपथावर असल्याची माहिती यावेळी रावते यांनी दिली.