शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मरावाठवाड्यात परभणीचा मृत्यूदर सर्वाधिक ३.९८ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:26 IST

बीड : मराठवाड्यासह राज्यात कोरोनाची स्थिती चिंताजनक बनत चालल्याचे दिसत आहे. आतापर्यंत मराठवाड्यात ४ हजार ३९३ लोकांचा कोरोनामुळे बळी ...

बीड : मराठवाड्यासह राज्यात कोरोनाची स्थिती चिंताजनक बनत चालल्याचे दिसत आहे. आतापर्यंत मराठवाड्यात ४ हजार ३९३ लोकांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. सर्वाधिक मृत्यू हे परभणी जिल्ह्यात झाले असून याचा टक्का ३.९८ एवढा आहे. तसेच एकूण मराठवाड्याचा मृत्यूदर २.९५ टक्के असून रिकव्हरी रेट ९५.७२ टक्के आहे. हिंगोली जिल्ह्याचा सर्वाधिक ९६.६७ टक्के रिकव्हरी रेट आहे.

मराठवाड्यात आतापर्यंत १३ लाख ७५ हजार २३२ लोकांची चाचणी करण्यात आली. पैकी आरटीपीसीआरच्या ५ लाख ४२ हजार ९३५ तर ॲन्टिजनेच्या ८ लाख ३२ हजार ३०७ चाचण्यांचा समावेश आहे. यात १ लाख ४८ हजार ५०५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तसेच आतापर्यंत ४ हजार ३९३ लोकांचा कोरोनाने जीव घेतला आहे. मराठवाड्यात सर्वाधिक मृत्यूदर हा परभणी जिल्ह्याचा आहे. तर सर्वात कमी १.५ टक्के हा हिंगोली जिल्ह्याचा आहे. तसेच रिकव्हरी रेटमध्ये हिंगोली जिल्हा अव्वल आहे. तर सर्वात कमी ९४.९४ टक्के हा बीडचा आहे. आरोग्य विभागासह, प्रशासनाने मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

चार जिल्ह्यांचा मृत्यूदर ३ टक्क्यांपेक्षा जास्त

मराठवाड्यात चार जिल्ह्यांचा मृत्यूदर हा ३ टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे अहवालावरून समोर आले आहे. यात परभणी ३.९८ टक्के, बीड ३.२७, नांदेड ३.१६, उस्मानाबाद ३.४३ यांचा समावेश आहे. तर रिकव्हरी रेट हा मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये ९५ टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

कोट

जिल्ह्याचा मृत्यूदर कमी करण्यासाठी वारंवार प्रयत्न केले जात आहेत. याबाबत आढावाही घेतला जात आहे. यात लवकरच यश येईल.

डॉ. आर. बी. पवार

जिल्हा आराेग्य अधिकारी, बीड

------

अशी आहे मराठवाड्याची आकडेवारी

जिल्हा

चाचणी

पॉझिटिव्ह

मृत्यू (%)

कोरोनामुक्त (%)

औरंगाबाद

४८०३८७

४६१५९

२.६२

९६.३७

जालना

१०३४६४

१३३४४

२.६४

९५.७१

परभणी

९१३८०

७६८०

३.९८

९५.०४

हिंगोली

५०९४६

३५७३

१.५

९६.६७

नांदेड

१८८६९०

२०९४६

३.१६

९५.२४

बीड

१८५०९७

१७०३९

३.२७

९४.९४

लातूर

१६५९८०

२३२५६

२.९२

९५.६९

उस्मानाबाद

१०९२८८

१६५०८

३.४३

९५.४६

एकूण

१३७५२३२

१४८५०५

२.९५

९५.७२