शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
2
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
3
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
4
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
5
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
6
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
7
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
8
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
9
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
10
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
11
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
12
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
13
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
16
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
17
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
18
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
19
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
20
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या

बीडची वैद्यनाथ बँक अडचणीत, न्यायालयाने संचालक मंडळाचा अर्ज फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 18:33 IST

बँकेच्या संचालक मंडळाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

अंबाजोगाई -  परळी येथील वैद्यनाथ बँकेच्या अध्यक्षासह संचालक मंडळावर बँकेच्या कर्जवितरण व व्यवहारात आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरून दाखल झालेले गुन्हे रद्द करावे असा अर्ज अंबाजोगाईच्या अपर सत्र न्यायालयात दाखल झाला होता. मात्र दि. ५ सप्टेंबर रोजी  अंबाजोगाई येथील दुसरे जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय देशपांडे यांनी सदरील अर्ज फेटाळून लावत परळी न्यायालयाचे आदेश कायम ठेवले आहेत. त्यांच्या या आदेशामुळे संचालकांच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. 

बीड जिल्ह्यातील मोठी आर्थिक व नावाजलेली आर्थिक संस्था असलेल्या वैद्यनाथ सहकारी बँकेच्या अडचणीमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. मार्च - २०१७ मध्ये वैद्यनाथ बँकेचे अध्यक्ष व संचालक यांनी बँकेच्या कर्जवितरण व व्यवहारात संगनमत करून आर्थिक गैरव्यवहार करणे, बनावट दस्तऐवज तयार करून ते खरे असल्याचे भासवणे तसेच मालमत्ता तारण न करता विनातारण कर्ज देणे, ऑडीट रिपोर्टच्या नियमांचे उल्लंघन करणे अशा विविध कारणांमुळे व गैरप्रकारांमुळे बँकेचे तत्कालीन अध्यक्ष व संचालक मंडळ अश्या २६ जणाविरुद्ध परळी न्यालायालाच्या आदेशाने पोलिसात गुन्हा नोंद झाला होता. यापैकी तत्कालीन अध्यक्ष अशोक जैन, विनोद सामत, विकास डुबे, नारायण सातपुते, डॉ. राजाराम मुंडे, पुरुषोत्तम भन्साळी, जयसिंग चव्हाण, नितीन कोटेचा, प्रवीण देशपांडे, दासू वाघमारे, अनिल तांदळे, रमेश कराड, प्रकाश जोशी, शालिनीताई कराड, विनोद खर्चे, बँकेचे अधिकारी महेशचंद्र कवठेकर, प्रकाश मराठे, मुकुल देशपांडे, यांनी अंबाजोगाई येथील न्यायालयाकडे गुन्हे रद्द करावे असा अर्ज दाखल केला होता. या अर्जावर दि. ५ सप्टेंबर रोजी दुसरे अपर सत्र न्या. धनंजय देशपांडे यांनी तो अर्ज रद्द ठरवत परळीच्या न्यायालयाचे आदेश कायम ठेवले. त्यामुळे दाखल गुन्ह्यात पुढील कायदेशीर कार्यवाहीचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाच्या या आदेशामुळे बँकेच्या संचालकांची डोकेदुखी वाढली असून त्यांच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. बँकेच्या या संचालकाविरुद्ध सुभाष निर्मळ यांनी न्यायालयाकडे पाठपुरावा केला होता. याप्रकरणी फिर्यादी सुभाष निर्मळ यांच्या वतीने ॲड. अशोक कवडे यांनी बाजू मांडली. 

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रकरण राज्यभर गाजत असतानाच तसेच जिल्हा बँकेच्या प्रकरणात सर्वच राजकीय पक्षांचे पुढारी न्यायालयीन प्रक्रियेत गुंतलेले आहेत. अद्यापही पोलीस तपास व न्यायालयाच्या कचाट्यातून सुटका न होताच वैद्यनाथ बँकेचे हे प्रकरण पुन्हा ऐरणीवर आल्याने राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :BeedबीडbankबँकCourtन्यायालय