शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
3
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
4
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
5
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
6
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
7
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
8
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
9
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
10
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
11
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
12
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
13
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
14
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
15
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
16
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
17
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
18
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
19
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
20
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...

बीडची वैद्यनाथ बँक अडचणीत, न्यायालयाने संचालक मंडळाचा अर्ज फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 18:33 IST

बँकेच्या संचालक मंडळाचा अर्ज न्यायालयाने फेटाळला

अंबाजोगाई -  परळी येथील वैद्यनाथ बँकेच्या अध्यक्षासह संचालक मंडळावर बँकेच्या कर्जवितरण व व्यवहारात आर्थिक गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरून दाखल झालेले गुन्हे रद्द करावे असा अर्ज अंबाजोगाईच्या अपर सत्र न्यायालयात दाखल झाला होता. मात्र दि. ५ सप्टेंबर रोजी  अंबाजोगाई येथील दुसरे जिल्हा सत्र न्यायाधीश धनंजय देशपांडे यांनी सदरील अर्ज फेटाळून लावत परळी न्यायालयाचे आदेश कायम ठेवले आहेत. त्यांच्या या आदेशामुळे संचालकांच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. 

बीड जिल्ह्यातील मोठी आर्थिक व नावाजलेली आर्थिक संस्था असलेल्या वैद्यनाथ सहकारी बँकेच्या अडचणीमध्ये पुन्हा वाढ झाली आहे. मार्च - २०१७ मध्ये वैद्यनाथ बँकेचे अध्यक्ष व संचालक यांनी बँकेच्या कर्जवितरण व व्यवहारात संगनमत करून आर्थिक गैरव्यवहार करणे, बनावट दस्तऐवज तयार करून ते खरे असल्याचे भासवणे तसेच मालमत्ता तारण न करता विनातारण कर्ज देणे, ऑडीट रिपोर्टच्या नियमांचे उल्लंघन करणे अशा विविध कारणांमुळे व गैरप्रकारांमुळे बँकेचे तत्कालीन अध्यक्ष व संचालक मंडळ अश्या २६ जणाविरुद्ध परळी न्यालायालाच्या आदेशाने पोलिसात गुन्हा नोंद झाला होता. यापैकी तत्कालीन अध्यक्ष अशोक जैन, विनोद सामत, विकास डुबे, नारायण सातपुते, डॉ. राजाराम मुंडे, पुरुषोत्तम भन्साळी, जयसिंग चव्हाण, नितीन कोटेचा, प्रवीण देशपांडे, दासू वाघमारे, अनिल तांदळे, रमेश कराड, प्रकाश जोशी, शालिनीताई कराड, विनोद खर्चे, बँकेचे अधिकारी महेशचंद्र कवठेकर, प्रकाश मराठे, मुकुल देशपांडे, यांनी अंबाजोगाई येथील न्यायालयाकडे गुन्हे रद्द करावे असा अर्ज दाखल केला होता. या अर्जावर दि. ५ सप्टेंबर रोजी दुसरे अपर सत्र न्या. धनंजय देशपांडे यांनी तो अर्ज रद्द ठरवत परळीच्या न्यायालयाचे आदेश कायम ठेवले. त्यामुळे दाखल गुन्ह्यात पुढील कायदेशीर कार्यवाहीचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाच्या या आदेशामुळे बँकेच्या संचालकांची डोकेदुखी वाढली असून त्यांच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. बँकेच्या या संचालकाविरुद्ध सुभाष निर्मळ यांनी न्यायालयाकडे पाठपुरावा केला होता. याप्रकरणी फिर्यादी सुभाष निर्मळ यांच्या वतीने ॲड. अशोक कवडे यांनी बाजू मांडली. 

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे प्रकरण राज्यभर गाजत असतानाच तसेच जिल्हा बँकेच्या प्रकरणात सर्वच राजकीय पक्षांचे पुढारी न्यायालयीन प्रक्रियेत गुंतलेले आहेत. अद्यापही पोलीस तपास व न्यायालयाच्या कचाट्यातून सुटका न होताच वैद्यनाथ बँकेचे हे प्रकरण पुन्हा ऐरणीवर आल्याने राजकीय गोटात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :BeedबीडbankबँकCourtन्यायालय