शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

२२ जणांच्या बंदोबस्तामध्ये आणले पैठणचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 00:27 IST

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शहागड येथील बंधाऱ्यातील पाणी गेल्या काही दिवसांपुर्वी संपले होते. मात्र नगर परिषदेने जायकवाडी धरणातून पाणी सोडावे अशी मागणी केली होती. त्याला यश आले व नगर परिषद, पाटबंधारे विभाग तसेच पोलीस बंदोबस्तात उजव्या कालव्यातून पाणी तीन दिवसात शहगड बंधा-यात पोहचले व गेवराईचा पाणी पुरवठा सुरळीत झाल्याची माहिती मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी दिली.

ठळक मुद्देगेवराईसह ग्रामीण भागाला दिलासा : गुरुवारपासून पाणीपुरवठा सुरळीत

सखाराम शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शहागड येथील बंधाऱ्यातील पाणी गेल्या काही दिवसांपुर्वी संपले होते. मात्र नगर परिषदेने जायकवाडी धरणातून पाणी सोडावे अशी मागणी केली होती. त्याला यश आले व नगर परिषद, पाटबंधारे विभाग तसेच पोलीस बंदोबस्तात उजव्या कालव्यातून पाणी तीन दिवसात शहगड बंधा-यात पोहचले व गेवराईचा पाणी पुरवठा सुरळीत झाल्याची माहिती मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी दिली.शहराला पाणीपुरवठा करणाºया शहागड येथील गोदावरी नदी पात्रातील बंधाºयातील पाणी गेल्या बारा दिवसा पुर्वी संपले होते.त्यामुळे शहरा बरोबर ग्रामीण भागातील पाणी पुरवठा बंद झाला होता. नागरिकांना पाणीटंचाईला तोड द्यावे लागले होते. मात्र, नगर परिषदेच्या वतीने जायकवाडी धरण प्रकल्पाकडे पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्याला यश आले.रविवारी ५ द.ल.घ.मी पाणी पैठण येथून सोडले होते. ते पाणी उजव्या कालव्याद्वारे सोडून तीन दिवसात बुधवार रोजी शहगड येथे पाणी पोहचले. मात्र हे पाणी आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. यात उजव्या कालव्यावरील तब्बल ६० किलोमीटर अंतरावरून हे पाणी आले.जायकवाडी धरणातून सोडलेले पाणी शहागड बंधाºयात पोहचण्यासाठी व पाणी चोरी होऊ नये म्हणून उजव्या कालव्यावर शेतकऱ्यांनी लावलेल्या मोटारी काढून घेत पाणी बंधाºयात सोडण्यात आले.या कामावर नगर परिषदेचे १२ कर्मचारी, पाटबंधारे विभागाचे ८ कर्मचारी तसेच २ पोलीस नियुक्त करण्यात आले होते.२२ कर्मचाºयांच्या निगराणीमुळे त्यामुळे सर्व पाणी बंधाºयात पोहचत असून गेवराई शहर व ग्रामीण भागातील पाणीपुरवठा गुरूवारपासून सुरळीत झाला असल्याचे नगर परिषदेचे मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Beedबीडwater shortageपाणीटंचाईJayakwadi Damजायकवाडी धरण