शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
4
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
5
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
6
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
7
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
8
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
9
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
10
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
12
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
13
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
14
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
15
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
16
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
17
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
18
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
20
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू

२२ जणांच्या बंदोबस्तामध्ये आणले पैठणचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 00:27 IST

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शहागड येथील बंधाऱ्यातील पाणी गेल्या काही दिवसांपुर्वी संपले होते. मात्र नगर परिषदेने जायकवाडी धरणातून पाणी सोडावे अशी मागणी केली होती. त्याला यश आले व नगर परिषद, पाटबंधारे विभाग तसेच पोलीस बंदोबस्तात उजव्या कालव्यातून पाणी तीन दिवसात शहगड बंधा-यात पोहचले व गेवराईचा पाणी पुरवठा सुरळीत झाल्याची माहिती मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी दिली.

ठळक मुद्देगेवराईसह ग्रामीण भागाला दिलासा : गुरुवारपासून पाणीपुरवठा सुरळीत

सखाराम शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शहागड येथील बंधाऱ्यातील पाणी गेल्या काही दिवसांपुर्वी संपले होते. मात्र नगर परिषदेने जायकवाडी धरणातून पाणी सोडावे अशी मागणी केली होती. त्याला यश आले व नगर परिषद, पाटबंधारे विभाग तसेच पोलीस बंदोबस्तात उजव्या कालव्यातून पाणी तीन दिवसात शहगड बंधा-यात पोहचले व गेवराईचा पाणी पुरवठा सुरळीत झाल्याची माहिती मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी दिली.शहराला पाणीपुरवठा करणाºया शहागड येथील गोदावरी नदी पात्रातील बंधाºयातील पाणी गेल्या बारा दिवसा पुर्वी संपले होते.त्यामुळे शहरा बरोबर ग्रामीण भागातील पाणी पुरवठा बंद झाला होता. नागरिकांना पाणीटंचाईला तोड द्यावे लागले होते. मात्र, नगर परिषदेच्या वतीने जायकवाडी धरण प्रकल्पाकडे पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्याला यश आले.रविवारी ५ द.ल.घ.मी पाणी पैठण येथून सोडले होते. ते पाणी उजव्या कालव्याद्वारे सोडून तीन दिवसात बुधवार रोजी शहगड येथे पाणी पोहचले. मात्र हे पाणी आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. यात उजव्या कालव्यावरील तब्बल ६० किलोमीटर अंतरावरून हे पाणी आले.जायकवाडी धरणातून सोडलेले पाणी शहागड बंधाºयात पोहचण्यासाठी व पाणी चोरी होऊ नये म्हणून उजव्या कालव्यावर शेतकऱ्यांनी लावलेल्या मोटारी काढून घेत पाणी बंधाºयात सोडण्यात आले.या कामावर नगर परिषदेचे १२ कर्मचारी, पाटबंधारे विभागाचे ८ कर्मचारी तसेच २ पोलीस नियुक्त करण्यात आले होते.२२ कर्मचाºयांच्या निगराणीमुळे त्यामुळे सर्व पाणी बंधाºयात पोहचत असून गेवराई शहर व ग्रामीण भागातील पाणीपुरवठा गुरूवारपासून सुरळीत झाला असल्याचे नगर परिषदेचे मुख्याधिकारी भागवत बिघोत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

टॅग्स :Beedबीडwater shortageपाणीटंचाईJayakwadi Damजायकवाडी धरण