शहरातील बाजार पेठेत खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची वाहने कोठेही लावली जात असल्याने मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी होत आहे. त्यामुळे रहदारीस मोठी अडचण निर्माण होत असल्याने ही अडचण कमी व्हावी यासाठी पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र पेरगूलवार यांनी शहरात विविध ठिकाणी पी-१ व पी-२ (सम-विषम तारीख) अशी पार्किंग व्यवस्था करण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यासाठी पहिल्या टप्प्यात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते शास्त्री चौक कोल्हेर वेसपर्यंत ही पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी सहा फलक लावण्यात आले असून, आज, शुक्रवारपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. वरील टप्पा यशस्वी झाल्यानंतर शहरातील इतर ठिकाणीही त्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
शहरातील सर्व व्यापारी, ग्राहक यांनी सम, विषम तारखेप्रमाणे आपापली वाहने पार्क करून प्रशासनास सहकार्य करावे. नाहीतर नियम मोडणाऱ्यास मोटार वाहन कायद्याप्रमाणे दंड आकारण्यात येईल, असे आवाहन पोलीस निरीक्षक रवींद्र पेरगूलवार, मुख्याधिकारी उमेश ढाकणे यांनी केले आहे.
150721\20210715_133820_14.jpg