शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

केवळ एका महिलेचा उष्माघाताने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 00:34 IST

जिल्ह्यात आतापर्यंत सात लोकांचा मृत्यू हा उष्माघाताने झाल्याच्या अफवा पसरल्या. या सर्व मयतांची माहिती घेऊन आरोग्य विभागाने चौकशी केली. सर्व वैज्ञानिक अहवाल प्राप्त केले. या चौकशी अंती केवळ एकाच महिलेचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देआरोग्य विभागाचा अहवाल : पाच जणांच्या मृत्यूचे कारण वेगवेगळे

बीड : जिल्ह्यात आतापर्यंत सात लोकांचा मृत्यू हा उष्माघाताने झाल्याच्या अफवा पसरल्या. या सर्व मयतांची माहिती घेऊन आरोग्य विभागाने चौकशी केली. सर्व वैज्ञानिक अहवाल प्राप्त केले. या चौकशी अंती केवळ एकाच महिलेचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचे समोर आले आहे. इतर पाच मृत्यूंची कारणे वेगवेगळी असल्याचे अहवालावरुन स्पष्ट झाले.सुमता देविदास बेडके (५० रा.राजापूर ता.गेवराई) असे उष्माघाताने मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. दरम्यान, यावर्षी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यातच मार्च, एप्रिल महिन्यात कडक ऊन जाणवले. पारा ४५ अंशांच्यावर गेला होता. त्यामुळे अंगाची लाही लाही होत होती. याच उन्हाच्या त्रासामुळे सहा लोकांचा मृत्यू झाल्याच्या अफवा पसरल्या.यामध्ये शिवराज संदीपानराव खरसाडे (३० रा.पाचेगाव ता.गेवराई), चंद्रकांत मारूती हिरवे (४० रा.माळीवेस बीड), परमेश्वर दादाराव वाघ (४४ रा.कदमवाडी ता.बीड), विक्रम भीमराव गायकवाड (३८ रा.बनसारोळा ता केज), दत्तात्रय सुदाम चव्हाण (१६ बीड सांगवी ता.आष्टी) यांचा समावेश आहे. खरसाडे यांचे शवविच्छेदन करून व्हिसेरा राखीव ठेवला आहे. तर हिरवे आणि वाघ यांचा मृत्यू हृदयात रक्ताच्या गाठीने पुरेशा रक्त पुरवठ्याअभावी, गायकवाड यांचा लिव्हरवर सूज आल्याने तर चव्हाण याचा हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकृष्ण पवार, प्रभारी अतिरिक्ति जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय कदम यांच्या मार्गदर्शनखाली प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या प्रकरणांची चौकशी केली आहे.

टॅग्स :BeedबीडWomenमहिलाDeathमृत्यू