शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

केवळ एका महिलेचा उष्माघाताने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2019 00:34 IST

जिल्ह्यात आतापर्यंत सात लोकांचा मृत्यू हा उष्माघाताने झाल्याच्या अफवा पसरल्या. या सर्व मयतांची माहिती घेऊन आरोग्य विभागाने चौकशी केली. सर्व वैज्ञानिक अहवाल प्राप्त केले. या चौकशी अंती केवळ एकाच महिलेचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देआरोग्य विभागाचा अहवाल : पाच जणांच्या मृत्यूचे कारण वेगवेगळे

बीड : जिल्ह्यात आतापर्यंत सात लोकांचा मृत्यू हा उष्माघाताने झाल्याच्या अफवा पसरल्या. या सर्व मयतांची माहिती घेऊन आरोग्य विभागाने चौकशी केली. सर्व वैज्ञानिक अहवाल प्राप्त केले. या चौकशी अंती केवळ एकाच महिलेचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचे समोर आले आहे. इतर पाच मृत्यूंची कारणे वेगवेगळी असल्याचे अहवालावरुन स्पष्ट झाले.सुमता देविदास बेडके (५० रा.राजापूर ता.गेवराई) असे उष्माघाताने मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. दरम्यान, यावर्षी जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. त्यातच मार्च, एप्रिल महिन्यात कडक ऊन जाणवले. पारा ४५ अंशांच्यावर गेला होता. त्यामुळे अंगाची लाही लाही होत होती. याच उन्हाच्या त्रासामुळे सहा लोकांचा मृत्यू झाल्याच्या अफवा पसरल्या.यामध्ये शिवराज संदीपानराव खरसाडे (३० रा.पाचेगाव ता.गेवराई), चंद्रकांत मारूती हिरवे (४० रा.माळीवेस बीड), परमेश्वर दादाराव वाघ (४४ रा.कदमवाडी ता.बीड), विक्रम भीमराव गायकवाड (३८ रा.बनसारोळा ता केज), दत्तात्रय सुदाम चव्हाण (१६ बीड सांगवी ता.आष्टी) यांचा समावेश आहे. खरसाडे यांचे शवविच्छेदन करून व्हिसेरा राखीव ठेवला आहे. तर हिरवे आणि वाघ यांचा मृत्यू हृदयात रक्ताच्या गाठीने पुरेशा रक्त पुरवठ्याअभावी, गायकवाड यांचा लिव्हरवर सूज आल्याने तर चव्हाण याचा हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राधाकृष्ण पवार, प्रभारी अतिरिक्ति जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय कदम यांच्या मार्गदर्शनखाली प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या प्रकरणांची चौकशी केली आहे.

टॅग्स :BeedबीडWomenमहिलाDeathमृत्यू