शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

२ वर्षात २९ पैकी केवळ ६ हजार नळ जोडण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 22:57 IST

शहरात ११४ कोटी रूपयांची अमृत पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. याचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून केले जात आहे. याच योजनेंतर्गत शहरात नवीन नळ जोडण्या दिल्या जात आहेत.

ठळक मुद्देअमृत पाणीपुरवठा योजना : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून संथ गतीने काम

बीड : शहरात ११४ कोटी रूपयांची अमृत पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. याचे काम महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून केले जात आहे. याच योजनेंतर्गत शहरात नवीन नळ जोडण्या दिल्या जात आहेत. आतापर्यंत दोन वर्षांत २९ हजारांपैकी केवळ ५ हजार ९५० कनेक्शनच देण्यात आले आहेत. यावरून हे काम संथ गतीने सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.अमृत पाणी पुरवठा योजनेस १९ एप्रिल २०१७ रोजी प्रशासकीय मान्यता मिळाली. ११४ कोटी ६३ लाख रूपयांची ही योजना आहे. या निधीत केंद्र शासनाचा ५० आणि राज्य व नगर पालिकेचा २५ टक्के वाटा आहे. या कामाचा जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत झालेल्या नवीन जलवाहिनीला नवीन नळ जोडण्या दिल्या जात आहेत. परंतु याचे काम मजिप्रा कडून संथ गतीने सुरू आहे. सुरूवातीला दोन वर्षांत हे काम करण्याचे आदेश होते. नंतर याला एक वर्षांची मुदतवाढ देऊनही कामात गती आलेली नाही. मागील दोन ते अडीच वर्षांत केवळ ६ हजारच नळ जोडण्या देण्यात आल्या आहेत. अद्यापही २३ हजार नळ जोडण्या देणे बाकी आहेत.दरम्यान, पालिकेकडून वारंवार पत्र देऊन कामाच्या गतीबाबत कळविलेले आहे. तसेच जिल्हाधिकारी व आयुक्तांसोबतही यावर चर्चा झालेली आहे. परंतु कारवाईत सुधारणा झालेली नाही. शुक्रवारीही याच कामाबाबत जिल्हाधिकाऱ्यांसोबत मुख्य अभियंता व नगर पालिका अधिकाऱ्यांची बैठक झाल्याचे सांगण्यात आले आहे. यात मजिप्राच्या अधिकाºयांना कामाच्या संथ गतीबाबत चांगलेच धारेवर धरले होते. १५ दिवसांत अहवाल सादर करण्याच्या सुचनाही जिल्हाधिक-यांनी केल्या आहेत.१० वेळा संपर्क करूनही प्रतिसाद नाहीयाबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अभियंता अमोल पाटील यांच्याशी १० वेळा भ्रमणध्वणीवरून संपर्क केला. परंतु त्यांनी एकदाही प्रतिसाद दिला नाही. तसेच उप अभियंता गौरव चक्के यांनाही तीन वेळा संपर्क केला, त्यांचा फोन लागला नाही. त्यामुळे मजिप्राची बाजू समजली नाही. यापूर्वीही संपर्क केल्यानंतर येथील अधिका-यांकडून बाजू मांडण्यास टाळाटाळ केली होती.

जिल्हाधिकारी यांच्यासोबत मजिप्रा अधिका-यांची बैठक झाली आहे. काम संथ गतीने सुरू असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. जिल्हाधिकारी यांनी त्यांच्याकडून अहवाल मागविला आहे. काम गतीने करून पूर्ण करण्याबाबत वारंवार पाठपुरावा करण्यात आलेला आहे. परंतु मजिप्राकडून याला प्रतिसाद दिला जात नाही.- डॉ.भारतभूषण क्षीरसागरनगराध्यक्ष, नगर परिषद बीड

टॅग्स :Beedबीडwater transportजलवाहतूक