शहरं
Join us  
Trending Stories
1
अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात न्याय झाला; मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेप 
2
'सिस्टममध्ये मोठी गडबड, निवडणूक आयोगानेही तडजोड केली', राहुल गांधींनी अमेरिकेत मांडला महाराष्ट्र निवडणुकीचा मुद्दा
3
"ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही जनभावना’’, संजय राऊतांचं मोठं विधान, उद्धव ठाकरेंचा संदेशही सांगितला 
4
Astro Tips: स्वत:ची गाडी, बंगला हे प्रत्येकाचंच स्वप्नं; पण नशिबात ते नसेल तर उपाय कोणते? वाचा!
5
पत्नीने मिरची पावडर टाकली, नंतर चाकूने हल्ला केला; माजी डीजीपींच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा
6
LIC च्या 'या' स्कीममध्ये गुंतवणूक करून मुलीचं भविष्य करू शकता सुरक्षित, १२१ रुपये वाचवून जमेल लाखोंचा फंड
7
बीडची बिहारच्या दिशेनं वाटचाल, माजलगावात बिलाच्या कारणावरून ढाबा मालकाची हत्या
8
तुम्हालाही व्हॉट्सअपवर Hi, Hello चा मेसेज आलाय का? १५० रुपये मिळतील; पण नंतर काय कराल...
9
मनीषा डॉक्टरांच्या घरची मेंबर झाली; बघता बघता रुग्णालयात टॉपवर गेली, अटक केलेली महिला कोण?
10
पुणे-मुंबई महामार्गावर भीषण अपघात: ट्रकची ५ वाहनांना धडक; बाप-लेकीचा मृत्यू, १२ जण जखमी
11
चिनी कंपनीमुळे मस्क गुडघ्यावर? 'टेस्ला'ला वाचवण्यासाठी भारताकडे धाव, टाटासह ३ कंपन्यांकडे मागितली मदत
12
इकडे आड...! अमेरिकेसोबत व्यापारी करार केलात तर याद राखा; चीनची जगाला धमकी
13
पंतप्रधान जनधन योजनेनं आपलाच विक्रम मोडला, डिपॉझिटची रक्कम उच्चांकी स्तरावर; खातेधारकही वाढले
14
भारतात उभारलं जाणार जगातील पहिले अक्षय्य ऊर्जेवर चालणारे शहर? कशा असतील अत्याधुनिक सुविधा?
15
कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'या' चार मराठी सिनेमांची झाली निवड, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा
16
Maharashtra Politics :"दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा..."; सामनातून विरोधकांना डिवचले, संकेतही दिले
17
झारखंडच्या बोकारोमध्ये चकमक! सुरक्षा दलांनी ६ नक्षलवाद्यांना ठार केले
18
सरकारी टेलिकॉम कंपनी MTNL नं ₹८,३४६ कोटींचं कर्ज केलं डिफॉल्ट; 'या' ७ बँकांकडून घेतलंय लोन
19
वानखेडेवर १७ वर्षांच्या आयुष म्हात्रेची तुफानी फटकेबाजी, सामना पाहणाऱ्या भावाला आनंदाश्रू अनावर, व्हिडीओ होतोय व्हायरल 
20
राज्य सरकार हिंदीचा प्रचार का करतंय?; २२ शैक्षणिक संघटनांचा हिंदी सक्तीला विरोध

एक असाही घोटाळा; केवळ २७४ रूपये भरून ६४ कोटींचा पीकविमा उचलण्याचा डाव

By शिरीष शिंदे | Updated: September 25, 2023 18:20 IST

बीड जिल्ह्यात जवळपास ६० जणांनी अनधिकृतपणे १२०६४ हेक्टरचा पीकविमा उतरविला असल्याची बाब समोर आली आहे.

बीड : बीड तालुक्यात १६ हजार २२९ एकर, तर इतर तालुक्यांत १३ हजार ५८१ असा एकूण २९ हजार ८१० एकर म्हणजेच १२०६४ हेक्टरचा पीकविमा उतरविल्याचा गैरप्रकार नुकताच समोर आला आहे. ६० जणांनी वेगवेगळ्या ठिकाणी प्रती क्षेत्र एक रूपयाप्रमाणे २७४ रूपये भरून पिकांची नुकसानभरपाईपोटी ६४ कोटी लाटण्याचा त्यांचा डाव होता; परंतु हा घोटाळा वेळीच समोर आल्याने त्या बोगस लोकांचा डाव फसला. भारतीय कृषी विमा कंपनीच्या जिल्हा व्यवस्थापकांनी त्यांच्या मुंबईच्या कार्यालयास पत्र पाठवून अतिरिक्त किंवा बनावट विमा भरणाऱ्यांची नावे रद्द करण्याचे सांगितले आहे.

राज्यासह जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने व १ रुपया देऊन एका गटासाठी पीकविमा काढण्याची योजना यंदा पहिल्यांदाच राज्य शासनाने आणली. या दोन्ही कारणांमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी पीकविमा भरला होता. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी बीड जिल्ह्यातील जवळपास ३ लाख शेतकरी पीकविमा योजनेत सहभागी झाले होते. अवर्षण स्थिती उद्भवल्यास राज्य शासन व पीकविमा कंपनीकडून तत्काळ अग्रीम मिळेल, अशी अपेक्षा बोगस पीकविमा भरणाऱ्यांना असावी त्यामुळे त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात पीकविमा भरल्याचा संशय कृषी अधिकाऱ्यांसह विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना आहे. पीकविमा घोटाळ्याच्या चौकशीत १२०६४ हेक्टरचा पीकविमा उतरवला होता. बोगस विमा भरल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच कारवाईला सुरुवात झाली आहे.

१२ कोटींचा होता प्रीमियमसोयाबीन, कापूस, तूर यासाठी वेगवेगळा विमा भरणे आवश्यक होते. शेतकऱ्याचे क्षेत्र कितीही मोठे असले तरी एका पिकासाठी एका क्षेत्रावर केवळ एकच विमा भरावा लागत होता. अन्य क्षेत्रांसाठी विमा भरायचा असल्यास शेतकऱ्यास पुन्हा दुसरा विमा भरावा लागत होता. त्यासाठी केवळ १ रुपया शेतकऱ्यांकडून घेतला गेला; परंतु बीड जिल्ह्यात ६० जणांनी वेगवेगळे क्षेत्र दाखवून २७४ वेळा एक रूपयाप्रमाणे भरणा करून पीकविमा काढला होता. त्यापोटी शासनाला १२ कोटी रुपये प्रीमियम म्हणून विमा कंपनीला द्यावी लागणार होती.

वरिष्ठ स्तरावरून होणार कारवाईचा निर्णयबीड जिल्ह्यात जवळपास ६० जणांनी अनधिकृतपणे १२०६४ हेक्टरचा पीकविमा उतरविला असल्याची बाब समोर आली आहे. बोगस पीकविमा भरणाऱ्यांची यादी भारतीय कृषी विमा कंपनीचे जिल्हा व्यवस्थापक बाबासाहेब इनकर यांनी मुंबईच्या वरिष्ठ कार्यालयास पाठवली आहे. बोगस विमा भरणाऱ्यांची नावे रद्द होणार आहेत, हे निश्चित असले तरी त्यांच्यावर गुन्हे दाखल करायचे की नाही, याचा निर्णय विमा कंपनीच्या वरिष्ठस्तरावरून केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. बोगस लोकांमुळे खऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, असे मत व्यक्त होत आहे.

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाBeedबीडFarmerशेतकरी