शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

लग्नानंतर १३ व्या दिवशीच नवविवाहितने ठोकली धूम; रोकड अन् दागिनेही केले लंपास

By सोमनाथ खताळ | Updated: May 17, 2023 19:15 IST

वडिलांनी मुलीला नांदविण्यासाठी पाठविणार नाहीत, असे सांगितल्याने फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले

बीड : विवाह संस्थेच्या माध्यमातून विवाह केल्यानंतर अवघे १३ दिवस संसार केला. पती व सासू शेतात जाताच या नवविवाहितेने मुंबईला धुम ठोकली. यावेळी दोघांच्या अंगावरील चार तोळे सोने आणि घरात ठेवलेले रोख ७० हजार रूपयेही लंपास केले. ही घटना डिसेंबर २०२२ मध्ये बीडमध्ये घडली. १६ मे रोजी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात पत्नीसह चौघांविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

नितीन किरण उबाळे (वय ३२ रा.बीड) यांना भारत मेट्रोमनी विवाह संस्थेकडून वारंवार फोन येत होते. त्यामुळे त्यांनी १५ जून २०२२ रोजी अडीच हजार रूपये शुल्क भरून नोंदणी केली. त्यांना आशा नावाच्या मुलीचा नंबर आणि बायोडाटा देण्यात आला. दोघांचे फोनवर बोलून ओळख झाली. त्यानंतर ९ डिसेंबर २०२२ रोजी आळंदी येथे दोघांचा विवाह झाला. त्यानंतर दोघेही बीड शहरातील राष्ट्रवादी भवनसमोर किरायाच्या घरात राहू लागले. २२ डिसेंबर २०२२ रोजी नितीन व त्यांची आई शेतात कापूस वेचण्यासाठी गेले होते. याचवेळी आशाचे आई, वडील व भाऊ बीडला आले. कोणालाही कल्पना न देताच तिला मुंबईला माहेरी घेऊन गेले. शेतातून परत आल्यावर नितीनला आशा घरात दिसली नाही. त्यामुळे त्याने कॉल केला असता तिच्या वडिलांनी उचलला. आता आम्ही आमच्या मुलीला नांदविण्यासाठी बीडला पाठविणार नाहीत, असे सांगितले. यावर नितीन यांना आपली फसवूणक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी शिवाजीनगर पोलिस ठाणे गाठून फिर्याद दिली. याप्रकरणी पत्नी आशा नितीन उबाळे, सासरा थोराजी गंगथडे, सासू सविता गंगथडे व मेहुणा शिवाजी गंगथडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

अगोदर २ लाख नंतर दागिने घेऊन पसारविवाह करण्यापूर्वी आशाच्या वडिलांनी नितीनकडून दोन लाख रूपये घेतले होते. विवाह झाल्यानंतर आशाने घरातील रोख ७० हजार रूपये आणि नितीन व स्वता:च्या अंगावरील जवळपास चार तोळे सोने घेऊन ती पसार झाली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीड