शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यास सरकार तयार, तारीखही ठरली; केंद्रीय मंत्री रिजिजूंची माहिती
2
“आमचे मन साफ आहे, महाराष्ट्र हितासाठी...”; मनसे-उद्धवसेना युतीवर आदित्य ठाकरेंचे सूचक विधान
3
'सिंधूच्या प्रत्येक थेंबावर आमचा हक्क आहे', पाक पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची मुक्ताफळे
4
काल पक्षावर बोलले, आज काढून टाकले; संजय राऊतांचा एक फोन अन् सुधाकर बडगुजर यांची हकालपट्टी
5
१० हजारांच्या SIP द्वारे ५ वर्षात १२ लाख! चौपट नफा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड योजना
6
5G फोन पाच हजारांत! भारतात नवी कंपनी आपले स्मार्टफोन घेऊन येतेय; फोन नवा असणार, पण पार्ट जुने... 
7
परकीय गुंतवणूकीच्या आघाडीवर सरकारचा मोठा निर्णय, चीन-पाकिस्तानसह अनेक देशांवर होणार परिणाम
8
Rani Baug: "राणीच्या बागेतील पेंग्विनच्या पिल्लांचं नाव बदलता येणार नाही", प्रशासनाकडून स्पष्टीकरण
9
तडकाफडकी ठाकरे गटातून हकालपट्टी, सुधाकर बडगुजर यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
IPL 2025 चॅम्पियन RCB चा 'खुली बस परेड' प्लॅन फिस्कटला; या गोष्टीची भीती ठरलं त्यामागचं कारण
11
PF च्या ७ लाखांच्या विम्यासाठी UAN-आधार लिंक अनिवार्य; सक्रीय करण्यासाठी 'इतके' दिवस बाकी!
12
ज्योती मल्होत्राशी बोलला, पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला! युट्यूबर जसबीर सिंहने काय काय केलं?
13
रशियाच्या तुलनेत युक्रेनची ताकद वाढणार, ब्रिटन 1 लाख ड्रोन देणार; जर्मनीनंही केलीय मोठी घोषणा
14
या गावचे लोक रोज तिकीट काढतात, पण प्रवास करत नाहीत; स्टेशनवर रेल्वेही येते, पण...
15
“RSS सरसंघचालक मोहन भागवत यांनी ‘नरकातला स्वर्ग’ वाचायला हवे”; संजय राऊत पुस्तक पाठवणार
16
टॉयलेटचा दरवाजा उघडताच घाबरून पळाला तरुण, कुटुंबाने तपासताच बसला मोठा धक्का!
17
1948 मध्ये PoK, 1996 मध्ये पाकला मोस्ट फेवर्ड नेशन...BJPने काँग्रेसच्या शरणागतींचा पाढा वाचला
18
'हास्यजत्रा'मधील हे दोन अभिनेते करतात फ्लर्ट, प्राजक्ता माळी म्हणाली- "मित्र आहोत हे सांगितलं तरीही.."
19
आधार कार्ड मोफत अपडेट करण्याची अखेरची संधी, 'या' तारखेपर्यंत करू शकता ऑनलाइन अपडेट
20
भारतीय मुस्लिमांबद्दल खोटं पसरवण्याचा प्रयत्न; सत्य सांगून पत्रकाराने भुट्टोंची बोलती बंद केली

सांडवा फोडण्यावर अधिकारी ठाम, ग्रामस्थांचा मात्र विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:28 IST

धारूर : आरणवाडी साठवण तलावानजीक एमएसआरडीने केलेला पर्यायी रस्ता पाण्यात जात असल्याने पाटबंधारे विभागाने तलावातील पाणी साठा कमी ...

धारूर : आरणवाडी साठवण तलावानजीक एमएसआरडीने केलेला पर्यायी रस्ता पाण्यात जात असल्याने पाटबंधारे विभागाने तलावातील पाणी साठा कमी करण्यासाठी सांडवा फोडण्याचे ठरविले. मात्र, या तलावाखालील पाच गावच्या लोकांनी विरोध केला. इतर पर्यायी मार्ग काढून पाणी कमी करावे, मात्र सांडवा फोडू नये अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली. दरम्यान, शनिवारी या तलावास महसूल व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. मात्र निर्णय होऊ शकला नाही.

अनेक वर्षांपासून रखडलेला आरणवाडी साठवण तलाव यावर्षी तब्बल सतरा वर्षांनंतर पूर्ण झाला. या तलावात यंदा चांगल्या पावसामुळे ९० टक्केपेक्षा जास्त पाणीसाठा झाला. तलावाच्या बाजूने खामगाव-पंढरपूर हा राष्ट्रीय महामार्गाचा पर्यायी रस्ता करण्यात आला. मात्र हे काम एमएसआरडीने संथगतीने व अर्धवट केले. उंचीही वाढवली नाही. दरम्यान, तलावात पाणी साठा वाढल्याचे लक्षात आल्यानंतर पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी तलावात ८५ टक्केपेक्षा जास्त पाणी साठा ठेवणे धोकादायक असल्यामुळे सांडवा फोडण्याचा घाट घातला. मात्र, त्यास चोरांबा, आरणवाडी, थेटेगव्हाण, ढगेवाडी, पहाडीपारगाव येथील नागरिकांनी विरोध केला. त्यामुळे शनिवारी उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, तहसीलदार वंदना शिडोळकर, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता यू. व्ही. वानखेडे, उपअभियंता हत्ते, नायब तहसीलदार रामेश्वर स्वामी यांनी तलावावर जाऊन परिस्थिती पाहिली व ग्रामस्थांशी चर्चा केली. मात्र, कुठलाही तोडगा निघाला नाही. यावेळी बाजार समितीचे सभापती सुनील शिनगारे, बालासाहेब चव्हाण, सदाशिव शिनगारे, भागवत शिनगारे, लहू फुटाणे, बंजरंग माने, सुरेश अंडील आदींसह नागरिक उपस्थित होते.

एमएसआरडी अभियंत्याची तहसीलदारांना अरेरावी

तलावाचा सांडवा फोडण्याच्या हालचाली सुरू असताना शनिवारी सकाळी तहसीलदारांनी तलाव आणि रस्ता कामाची पाहणी केली. त्यानंतर एमएसआरडीच्या उप अभियंत्यांना चौकशीसाठी फोन केला असता त्यांनी तहसीलदारांशी उद्धट वर्तणूक केली. या प्रकरणी पाहणी अहवाल व नागरिकांचे म्हणणे जिल्हाधिकाऱ्यांना पुढील कार्यवाहीसाठी पाठविल्याचे सूत्रांनी सांगितले.

जलसमाधी घेऊ, पण सांडवा फोडू देणार नाही

आरणवाडी साठवण तलावाच्या शेजारील रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम झाकण्यासाठी सांडवा फोडण्याचा घाट घातला जात आहे. या परिसराचे अनेक वर्षांचे स्वप्न आता पूर्ण झाले आहे. सांडवा फोडणे गरजेचे नाही. प्रसंगी जलसमाधी घेऊ पण आम्ही सांडवा फोडू देणार नाहीत, असे चोरांबा येथील शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब चव्हाण म्हणाले.