शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
4
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
5
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
6
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
7
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
8
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
9
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
10
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
11
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
12
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
13
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
14
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
16
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
17
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
18
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
19
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
20
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे

नोटाबंदीमुळे बुडाले ओबीसींचे धंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 12:11 AM

नोटबंदीमुळे ओबीसींचे छोटे छोटे उद्योगधंदे बुडाले. त्यामुळे अनेक कुटुंब देशोधडीला लागली. काळा पैसा आला का ? दहशतवाद थांबला का ? हे ही झाले नाही, ते ही झाले नाही. या सरकारचं चाललं काय ? असा प्रश्न विचारत छगन भुजबळ यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.

ठळक मुद्देबीडमध्ये समता मेळावा : छगन भुजबळ यांची सरकारवर जोरदार टीका

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : सरकारच्या विरोधात बोललं तर दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांच्यासारखी हत्या केली जाते. मेक इन इंडियाचा बाऊ सरकारने केला आहे. दहशतवाद, काळा पैसा, भ्रष्टाचार रोखण्यासाठी मोदींनी नोटबंदी केली होती. मात्र, यातील एकही गोष्ट साध्य झाली नाही. परंतु नोटबंदीमुळे ओबीसींचे छोटे छोटे उद्योगधंदे बुडाले. त्यामुळे अनेक कुटुंब देशोधडीला लागली. काळा पैसा आला का ? दहशतवाद थांबला का ? हे ही झाले नाही, ते ही झाले नाही. या सरकारचं चाललं काय ? असा प्रश्न विचारत छगन भुजबळ यांनी भाजप सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.बीड येथे शनिवारी झालेल्या अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद बीड जिल्हा आयोजित समता मेळाव्यात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. जयदत्त क्षीरसागर, खा. समीर भुजबळ, माजी मंत्री प्रकाशदादा सोळंके, आ. सतीश चव्हाण, माजी आ. अमरसिंह पंडीत, आ. रामराव वडकुते, बापूसाहेब भुजबळ, आयोजक सुभाष राऊत, सय्यद सलीम, पृथ्वीराज साठे, उषा दराडे, राजेंद्र जगताप, रवींद्र क्षीरसागर, अक्षय मुंदडा, बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागर, पार्वती सिरसाट यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.भुजबळ म्हणाले, बीडमध्ये आल्यानंतर स्व. गोपीनाथ मुंडे यांची आठवण झाल्याशिवाय रहात नाही. पक्ष व पदाचा विचार न करता ते समतेच्या मागे उभे राहिले. ओबीसींना न्याय देण्यासाठी आम्ही खांद्याला खांदा लावत लढलो. याच बीडमधून आपण समता पर्वाची सुरुवात पुन्हा एकदा करीत असल्याचे ते म्हणाले.जयदत्त क्षीरसागर : पवारांच्या सभेला हजर रहाभुजबळांच्या नवीन पर्वाचा शुभारंभ बीडपासून होत आहे. त्यांनी संघर्षातूनही आपली वाटचाल सुरुच ठेवली आहे. हा तुरुंगवास हा सहन करावा लागला ? ज्या महाराष्ट्र सदनावरुन भुजबळांना आत जावे लागले त्यामध्ये बसून अमित शहा व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बैठका घेतात. महाराष्ट्र सदन अतिशय सुंदर असल्याच्या वलग्ना देखील त्यांच्याकडून केल्या जातात. मग भुजबळांना ही शिक्षा का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच समाजाला महात्मा फुले यांच्या विचारांची गरज असून, सामान्यांना आधार देण्यासाठी ज्योती-क्रांतीच्या विचाराकडे आपल्याला जावे लागेल असे ते म्हणाले. शरद पवार यांची १ आॅक्टोबर रोजी बीडमध्ये सभा होत आहे. जयदत्त क्षीरसागर यांनी आपल्या भाषणामध्ये शरद पवारांच्या सभेला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.२०१९ नंतर पुन्हानिवडणूक होणार नाही- धनंजय मुंडेमेळाव्यादरम्यान विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले, २०१९ च्या निवडणुकीत पुन्हा हे सरकार निवडून आले तर लोकशाहीला घातक आहे.पुढे निवडणुकाच घेतल्या जाणार नसल्याची भीती त्यांनी व्यक्त केली.त्यामुळे एकत्रित येऊन या जातीयवादी सरकारविरोधात लढण्याचे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.शेतकरी अडचणीतराज्यात शेतकरी अडचणीत आहे. दुष्काळाची परिस्थिती असताना देखील तीन हजार भरा, नसता रोहित्र बंद करु असे सांगितले जाते. या दुष्काळाच्या परिस्थितीत पैसे कोठून भरायचे हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. अद्यापही निम्म्यापेक्षा जास्त शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. राज्यात ऊसतोड कामगाराच्या मुलीवर बलात्कार होतो. शासनाकडून कठोर कारवाई केली जात नाही. पुढील काळात दुष्काळाचा मुकाबला करावा लागणार आहे. परंतु सरकारकडून मात्र सर्वांच्याच आशेवर पाणी फेरण्याचे काम केले जात असल्याची टीका भुजबळ यांनी केली.कार्यकर्त्यांचा गोंधळमेळाव्याच्या सुरुवातीला प्रमुख नेते व्यासपीठावर येताच कार्यकर्त्यांच्या एका गटाने जयदत्त क्षीरसागर यांच्या नावाच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. ही गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांनी थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु कार्यकर्त्यांनी बॅरीकेटस् तोडले. त्यानंतर क्षीरसागरांनी शांततेचे आवाहन केल्यानंतर कार्यकर्ते शांत बसले.

टॅग्स :BeedबीडChagan Bhujbalछगन भुजबळ