शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
3
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
5
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
6
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
7
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
8
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
9
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
10
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
11
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
12
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
13
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
14
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
15
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
16
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
17
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
18
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
19
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
20
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला

आता पाणी आहे पण वीज नाही, माजलगावात ट्रान्सफार्मर बदलण्यासाठी महावितरणने शेतक-यांना दिली दीड महिन्याची वेटिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 12:16 IST

परतीच्या पावसाने माजलगांव धरण 100 टक्के भरले आहे. यासोबतच तालुक्यातील पाण्याचे सर्व स्त्रोत सुद्धा पूर्ण भरल्याने शेतकरी आनंदित होती. मात्र, नादुरुस्त ट्रान्सफार्मर बदलण्यासाठी महावितरणने दीड महिनाच्या कालावधी दिला आहे.

ठळक मुद्देनादुरुस्त ट्रान्सफार्मर बदलण्यासाठी महावितरणने दीड महिनाच्या कालावधी दिला आहे. अडचणीचा फायदा घेत महावितरणने वसुलीपोटी सूड उगविण्याचा चंग बांधल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

- पुरुषोत्तम करवा

माजलगांव ( बीड ) : परतीच्या पावसाने माजलगांव धरण 100 टक्के भरले आहे. यासोबतच तालुक्यातील पाण्याचे सर्व स्त्रोत सुद्धा पूर्ण भरल्याने शेतकरी आनंदित होती. मात्र, नादुरुस्त ट्रान्सफार्मर बदलण्यासाठी महावितरणने दीड महिनाच्या कालावधी दिला आहे. याच अडचणीचा फायदा घेत महावितरणने वसुलीपोटी सूड उगविण्याचा चंग बांधल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

माजलगाव उपविभागांतर्गत आजमितीला जवळपास ३० ते ४० शेतीपंपासाठी असणारे ट्रान्सफार्मर जळालेले आहेत. त्यात १५, २५, ६३ आणि १०० चे ट्रान्सफार्मर आहेत. साधारणत: ६३ चे ट्रान्सफार्मर हे जळण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. खरीपाचे पीक हे वेळेत पाऊस न पडल्यामुळे हातचे गेले. मात्र पुढील काळात परतीच्या पावसाने  तालुक्यात पाण्याची मुबलक प्रमाणात सुबत्ता झाल्यामुळे शेतकरी आता या पाण्यावर पीक घेवून गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न करीत असतानाच ‘ओव्हरलोडींग’मुळे ट्रान्सफार्मर जळण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत.  बड्या नेत्यांना, पुढा-यांना तसेच वशिला असणा-यांना व पैसे देणा-यांना हे अधिकारी लगेचच ट्रान्सफार्मरची व्यवस्था करीत आहेत. मात्र आम्ही मागील २० ते २५ दिवसांपासून खेटे घालत असून देखील आम्हाला ट्रान्सफार्मर मिळत नसल्याच्या प्रतिक्रि या शेतकरी व्यक्त करीत आहेत. सध्या माजलगाव उपविभागातील ४० ते ५० टक्के ट्रान्सफार्मर जळालेल्या अवस्थेत आहेत ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. 

ट्रान्सफार्मर दुरुस्तीसाठी औरंगाबाद व पंढरपूर या ठिकाणच्या एजन्सीला काम देण्यात आलेले आहे. या एजन्सींचे अंतर दूर पडत असल्याने ट्रान्सफार्मर मिळण्यास उशीर होत आहे त्यामुळे शेतक-यांना दोन-दोन महिने ट्रान्सफार्मर मिळण्यास अडचणी येत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. दुसरीकडे याकडे सत्ताधारी, विरोधकांसह पुढा-यांचेही दुर्लक्ष आहे.

अधिकारी देताहेत ओव्हरलोडींगचे कारण वास्तविक पाहता ट्रान्सफार्मर बसवितांनाच यावर किती लोड आहे त्यानुसार ट्रान्सफार्मर बसविला जातो. मात्र, आता शेतक-यांकडुन सातत्याने ट्रान्सफार्मर बसवण्याचा रेटा पाहता ओव्हरलोडींगमुळे ट्रान्सफार्मर जळत असल्याचे कारण देऊन महावितरणचे अधिकारी अंग झटकत आहेत. 

एजन्सी आणि महावितरणमध्ये वाद 

महावितरणचे अधिकारी एजन्सी लवकर ट्रान्सफार्मर देत नसल्याने एजन्सीवर खापर फोडत आहेत. तर एजन्सीधारक हे महावितरण आमचे पैसे वेळेवर देत नाहीत त्यामुळे आम्हाला मटेरियल खरेदीला अडचणी येत असल्याचे सांगुन हात वर करीत आहेत. एजन्सी आणि महावितरणच्या या वादात शेतकरी मात्र भरडला जात आहे. 

सर्वत्र पाण्याची उपलब्धता वाढल्यामुळे ओव्हरलोडींगमुळे ट्रान्सफार्मर जळत आहेत. तसेच ट्रान्सफार्मर एजन्सीच या बाहेरगावी असल्याने त्यांच्या उपलब्धतेला वेळ लागतो. परिस्थिती पूर्वपदावर येण्यास किमान एक ते दीड महिन्याचा कालावधी लागु शकतो.- प्रदिप निकम, उपविभागीय अभियंता, महावितरण माजलगांव