शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
2
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
3
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
4
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
5
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
6
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
7
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
8
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
9
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
10
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
11
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
12
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
13
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
14
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
15
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
16
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
17
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
18
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
19
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
20
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

आता पाणी आहे पण वीज नाही, माजलगावात ट्रान्सफार्मर बदलण्यासाठी महावितरणने शेतक-यांना दिली दीड महिन्याची वेटिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 12:16 IST

परतीच्या पावसाने माजलगांव धरण 100 टक्के भरले आहे. यासोबतच तालुक्यातील पाण्याचे सर्व स्त्रोत सुद्धा पूर्ण भरल्याने शेतकरी आनंदित होती. मात्र, नादुरुस्त ट्रान्सफार्मर बदलण्यासाठी महावितरणने दीड महिनाच्या कालावधी दिला आहे.

ठळक मुद्देनादुरुस्त ट्रान्सफार्मर बदलण्यासाठी महावितरणने दीड महिनाच्या कालावधी दिला आहे. अडचणीचा फायदा घेत महावितरणने वसुलीपोटी सूड उगविण्याचा चंग बांधल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

- पुरुषोत्तम करवा

माजलगांव ( बीड ) : परतीच्या पावसाने माजलगांव धरण 100 टक्के भरले आहे. यासोबतच तालुक्यातील पाण्याचे सर्व स्त्रोत सुद्धा पूर्ण भरल्याने शेतकरी आनंदित होती. मात्र, नादुरुस्त ट्रान्सफार्मर बदलण्यासाठी महावितरणने दीड महिनाच्या कालावधी दिला आहे. याच अडचणीचा फायदा घेत महावितरणने वसुलीपोटी सूड उगविण्याचा चंग बांधल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

माजलगाव उपविभागांतर्गत आजमितीला जवळपास ३० ते ४० शेतीपंपासाठी असणारे ट्रान्सफार्मर जळालेले आहेत. त्यात १५, २५, ६३ आणि १०० चे ट्रान्सफार्मर आहेत. साधारणत: ६३ चे ट्रान्सफार्मर हे जळण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. खरीपाचे पीक हे वेळेत पाऊस न पडल्यामुळे हातचे गेले. मात्र पुढील काळात परतीच्या पावसाने  तालुक्यात पाण्याची मुबलक प्रमाणात सुबत्ता झाल्यामुळे शेतकरी आता या पाण्यावर पीक घेवून गाडी रुळावर आणण्याचा प्रयत्न करीत असतानाच ‘ओव्हरलोडींग’मुळे ट्रान्सफार्मर जळण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत.  बड्या नेत्यांना, पुढा-यांना तसेच वशिला असणा-यांना व पैसे देणा-यांना हे अधिकारी लगेचच ट्रान्सफार्मरची व्यवस्था करीत आहेत. मात्र आम्ही मागील २० ते २५ दिवसांपासून खेटे घालत असून देखील आम्हाला ट्रान्सफार्मर मिळत नसल्याच्या प्रतिक्रि या शेतकरी व्यक्त करीत आहेत. सध्या माजलगाव उपविभागातील ४० ते ५० टक्के ट्रान्सफार्मर जळालेल्या अवस्थेत आहेत ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. 

ट्रान्सफार्मर दुरुस्तीसाठी औरंगाबाद व पंढरपूर या ठिकाणच्या एजन्सीला काम देण्यात आलेले आहे. या एजन्सींचे अंतर दूर पडत असल्याने ट्रान्सफार्मर मिळण्यास उशीर होत आहे त्यामुळे शेतक-यांना दोन-दोन महिने ट्रान्सफार्मर मिळण्यास अडचणी येत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. दुसरीकडे याकडे सत्ताधारी, विरोधकांसह पुढा-यांचेही दुर्लक्ष आहे.

अधिकारी देताहेत ओव्हरलोडींगचे कारण वास्तविक पाहता ट्रान्सफार्मर बसवितांनाच यावर किती लोड आहे त्यानुसार ट्रान्सफार्मर बसविला जातो. मात्र, आता शेतक-यांकडुन सातत्याने ट्रान्सफार्मर बसवण्याचा रेटा पाहता ओव्हरलोडींगमुळे ट्रान्सफार्मर जळत असल्याचे कारण देऊन महावितरणचे अधिकारी अंग झटकत आहेत. 

एजन्सी आणि महावितरणमध्ये वाद 

महावितरणचे अधिकारी एजन्सी लवकर ट्रान्सफार्मर देत नसल्याने एजन्सीवर खापर फोडत आहेत. तर एजन्सीधारक हे महावितरण आमचे पैसे वेळेवर देत नाहीत त्यामुळे आम्हाला मटेरियल खरेदीला अडचणी येत असल्याचे सांगुन हात वर करीत आहेत. एजन्सी आणि महावितरणच्या या वादात शेतकरी मात्र भरडला जात आहे. 

सर्वत्र पाण्याची उपलब्धता वाढल्यामुळे ओव्हरलोडींगमुळे ट्रान्सफार्मर जळत आहेत. तसेच ट्रान्सफार्मर एजन्सीच या बाहेरगावी असल्याने त्यांच्या उपलब्धतेला वेळ लागतो. परिस्थिती पूर्वपदावर येण्यास किमान एक ते दीड महिन्याचा कालावधी लागु शकतो.- प्रदिप निकम, उपविभागीय अभियंता, महावितरण माजलगांव