शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

गडावरून ‘राजकारण’ नाही - पंकजा मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:49 IST

मी भगवानगडाची लेक तर नारायणगडाची नात आहे, मंत्री म्हणून नव्हे तर नातीच्या मायेने इथे आले आहे. मी जोडलेले नाते, कधीच तोडत नाही. सत्ता आहे म्हणून नाही तर या गडाची नात म्हणून होत असलेला विकास पाहून आनंद होत आहे. हा विकास सर्वसामान्यांचा, भाविक, भक्तांचा विकास होय. गडावरुन जाती, पातीचे राजकारण करणार नाही आणि कोणीही करू नये, कारण त्यामुळे भाविकांच्या भक्तीलाच तडा जाईल, अशा शब्दात जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

ठळक मुद्देनारायणगडावरील विकासकामांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

बीड : मी भगवानगडाची लेक तर नारायणगडाची नात आहे, मंत्री म्हणून नव्हे तर नातीच्या मायेने इथे आले आहे. मी जोडलेले नाते, कधीच तोडत नाही. सत्ता आहे म्हणून नाही तर या गडाची नात म्हणून होत असलेला विकास पाहून आनंद होत आहे. हा विकास सर्वसामान्यांचा, भाविक, भक्तांचा विकास होय. गडावरुन जाती, पातीचे राजकारण करणार नाही आणि कोणीही करू नये, कारण त्यामुळे भाविकांच्या भक्तीलाच तडा जाईल, अशा शब्दात जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

नारायणगडावरील विकास कामांच्या भूमिपूजनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर मठाधिपती महंत शिवाजी महाराज, शिवस्मारक समिती, मुंबईचे अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे संयोजक आ. विनायक मेटे, माजीमंत्री सुरेश धस, जि.प. अध्यक्षा सविता गोल्हार, आ. भीमराव धोंडे, आ. लक्ष्मण पवार, आ.आर.टी. देशमुख, माजी आ. बदामराव पंडित, जि.प. उपाध्यक्षा जयश्री मस्के, राजेंद्र मस्के, अशोक हिंगे, मंदिर विश्वस्त माजी आ. राजेंद्र जगताप, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, सभापती संतोष हंगे आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक करताना गडाचे विश्वस्त माजी आ. राजेंद्र जगताप यांनी निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि मेटे यांचे आभार मानले. निवडणुकीत ठरल्याप्रमाणे इतर घटक पक्षांना मंत्रीपद मिळाले, परंतु आ. विनायक मेटे यांनाही मंत्रीपद द्यावे, अशी विनंती केली होती.मुख्यमंत्र्यांचे सहकार्य : विकास करणारपंकजा मुंडे म्हणाल्या, हा जिल्हा गडांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या गडांना मानणारा वारकरी संप्रदायही मोठा आहे. विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने गडांवर येणा-या भाविकांची संख्याही मोठी असते. या भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने शासनाने निधी उपलब्ध करुन दिला असून, यातून विविध विकास योजना पूर्ण केल्या जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बीड जिल्ह्याच्या विकासासाठी जे-जे प्रस्ताव मी घेऊन गेले त्यास त्यांनी मंजुरी दिली, असे यावेळी सांगितले.