शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
तुमचे अधिकारी वृत्तपत्र वाचत नाहीत का? देशाची प्रतिमा मलिन होतेय; भटक्या कुत्र्यांवरून भडकले कोर्ट
3
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
4
सरन्यायाधीश बूटफेक प्रकरण: वकिलावर कारवाई करणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्टीकरण
5
तातडीने सुनावणीस नकार, पण दोन मागण्या मान्य; मराठा-ओबीसी आरक्षण वादात ओबीसी संघटनेला कोर्टाचा दिलासा
6
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
7
शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी
8
राम जन्मभूमी मंदिराचे काम पूर्ण, २५ नोव्हेंबरला भव्य सोहळा, ६ ते ८ हजार निमंत्रित येणार
9
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
10
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
11
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
12
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
13
विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी काय केले? तपशील सादर करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश
14
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
15
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
16
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
17
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
18
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
19
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
20
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा

गडावरून ‘राजकारण’ नाही - पंकजा मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:49 IST

मी भगवानगडाची लेक तर नारायणगडाची नात आहे, मंत्री म्हणून नव्हे तर नातीच्या मायेने इथे आले आहे. मी जोडलेले नाते, कधीच तोडत नाही. सत्ता आहे म्हणून नाही तर या गडाची नात म्हणून होत असलेला विकास पाहून आनंद होत आहे. हा विकास सर्वसामान्यांचा, भाविक, भक्तांचा विकास होय. गडावरुन जाती, पातीचे राजकारण करणार नाही आणि कोणीही करू नये, कारण त्यामुळे भाविकांच्या भक्तीलाच तडा जाईल, अशा शब्दात जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

ठळक मुद्देनारायणगडावरील विकासकामांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

बीड : मी भगवानगडाची लेक तर नारायणगडाची नात आहे, मंत्री म्हणून नव्हे तर नातीच्या मायेने इथे आले आहे. मी जोडलेले नाते, कधीच तोडत नाही. सत्ता आहे म्हणून नाही तर या गडाची नात म्हणून होत असलेला विकास पाहून आनंद होत आहे. हा विकास सर्वसामान्यांचा, भाविक, भक्तांचा विकास होय. गडावरुन जाती, पातीचे राजकारण करणार नाही आणि कोणीही करू नये, कारण त्यामुळे भाविकांच्या भक्तीलाच तडा जाईल, अशा शब्दात जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

नारायणगडावरील विकास कामांच्या भूमिपूजनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर मठाधिपती महंत शिवाजी महाराज, शिवस्मारक समिती, मुंबईचे अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे संयोजक आ. विनायक मेटे, माजीमंत्री सुरेश धस, जि.प. अध्यक्षा सविता गोल्हार, आ. भीमराव धोंडे, आ. लक्ष्मण पवार, आ.आर.टी. देशमुख, माजी आ. बदामराव पंडित, जि.प. उपाध्यक्षा जयश्री मस्के, राजेंद्र मस्के, अशोक हिंगे, मंदिर विश्वस्त माजी आ. राजेंद्र जगताप, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, सभापती संतोष हंगे आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक करताना गडाचे विश्वस्त माजी आ. राजेंद्र जगताप यांनी निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि मेटे यांचे आभार मानले. निवडणुकीत ठरल्याप्रमाणे इतर घटक पक्षांना मंत्रीपद मिळाले, परंतु आ. विनायक मेटे यांनाही मंत्रीपद द्यावे, अशी विनंती केली होती.मुख्यमंत्र्यांचे सहकार्य : विकास करणारपंकजा मुंडे म्हणाल्या, हा जिल्हा गडांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या गडांना मानणारा वारकरी संप्रदायही मोठा आहे. विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने गडांवर येणा-या भाविकांची संख्याही मोठी असते. या भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने शासनाने निधी उपलब्ध करुन दिला असून, यातून विविध विकास योजना पूर्ण केल्या जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बीड जिल्ह्याच्या विकासासाठी जे-जे प्रस्ताव मी घेऊन गेले त्यास त्यांनी मंजुरी दिली, असे यावेळी सांगितले.