शहरं
Join us  
Trending Stories
1
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
2
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
3
Maharashtra Municipal Election: मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
4
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
5
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
6
Numerology: 'या' जन्मतारखेच्या मुलींमध्ये असतो कमालीचा आत्मविश्वास आणि सौंदर्याचा अहंकारही 
7
सोने-चांदी पुन्हा महागले! खरेदी करण्यापूर्वी २२ कॅरेट आणि २४ कॅरेटचे दर पाहा; आणखी भाव वाढणार?
8
Corona Vaccine : कोरोना लसीमुळे तरुणांचा होतो अचानक मृत्यू? AIIMS आणि ICMR च्या रिसर्चमधून मोठा खुलासा
9
'पप्पा बाहेरून घरात आले आणि आम्हा सगळ्यांना...'; कुटुंब उद्ध्वस्त, वाचलेल्या दोन चिमुकल्यांनी काय सांगितलं?
10
अजब निकालाची गजब चर्चा! केवळ १ मताने जिंकली सून; विजयाचे श्रेय सासऱ्यांना गेले, असं काय घडले?
11
२० वर्षे लहान असलेल्या सारासोबत रणवीरचा रोमान्स का? 'धुरंधर पार्ट २'मध्ये उलगडणार सर्वात मोठं गूढ
12
लाडक्या बहिणींचा हफ्ता ते शेतकऱ्यांची कर्जमाफी; Aaditya Thackeray यांचा सरकारवर हल्लाबोल
13
नव्या एमजी हेक्टरची किंमत कंपनीने २ लाखांनी केली कमी! फीचर्स अपग्रेड, सेफ्टी हाय-टेक... पहा...
14
"ही कोणाची कृपा, दान किंवा भीक नाही", रामदास आठवलेंचा अजित पवारांना 'त्या' विधानावरून इशारा
15
Ram Vilas Vedanti: श्रीराम जन्मभूमी आंदोलनाचे प्रमुख रामविलास वेदांती यांचे निधन; सीएम योगींनी वाहिली श्रद्धांजली
16
"माझा मुलगा खूप..."; सिडनीत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्याच्या आईचा धक्कादायक दावा
17
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
18
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
19
Mumbai-Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
20
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
Daily Top 2Weekly Top 5

गडावरून ‘राजकारण’ नाही - पंकजा मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 00:49 IST

मी भगवानगडाची लेक तर नारायणगडाची नात आहे, मंत्री म्हणून नव्हे तर नातीच्या मायेने इथे आले आहे. मी जोडलेले नाते, कधीच तोडत नाही. सत्ता आहे म्हणून नाही तर या गडाची नात म्हणून होत असलेला विकास पाहून आनंद होत आहे. हा विकास सर्वसामान्यांचा, भाविक, भक्तांचा विकास होय. गडावरुन जाती, पातीचे राजकारण करणार नाही आणि कोणीही करू नये, कारण त्यामुळे भाविकांच्या भक्तीलाच तडा जाईल, अशा शब्दात जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

ठळक मुद्देनारायणगडावरील विकासकामांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन

बीड : मी भगवानगडाची लेक तर नारायणगडाची नात आहे, मंत्री म्हणून नव्हे तर नातीच्या मायेने इथे आले आहे. मी जोडलेले नाते, कधीच तोडत नाही. सत्ता आहे म्हणून नाही तर या गडाची नात म्हणून होत असलेला विकास पाहून आनंद होत आहे. हा विकास सर्वसामान्यांचा, भाविक, भक्तांचा विकास होय. गडावरुन जाती, पातीचे राजकारण करणार नाही आणि कोणीही करू नये, कारण त्यामुळे भाविकांच्या भक्तीलाच तडा जाईल, अशा शब्दात जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

नारायणगडावरील विकास कामांच्या भूमिपूजनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर मठाधिपती महंत शिवाजी महाराज, शिवस्मारक समिती, मुंबईचे अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे संयोजक आ. विनायक मेटे, माजीमंत्री सुरेश धस, जि.प. अध्यक्षा सविता गोल्हार, आ. भीमराव धोंडे, आ. लक्ष्मण पवार, आ.आर.टी. देशमुख, माजी आ. बदामराव पंडित, जि.प. उपाध्यक्षा जयश्री मस्के, राजेंद्र मस्के, अशोक हिंगे, मंदिर विश्वस्त माजी आ. राजेंद्र जगताप, विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, सभापती संतोष हंगे आदी उपस्थित होते.

प्रास्ताविक करताना गडाचे विश्वस्त माजी आ. राजेंद्र जगताप यांनी निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि मेटे यांचे आभार मानले. निवडणुकीत ठरल्याप्रमाणे इतर घटक पक्षांना मंत्रीपद मिळाले, परंतु आ. विनायक मेटे यांनाही मंत्रीपद द्यावे, अशी विनंती केली होती.मुख्यमंत्र्यांचे सहकार्य : विकास करणारपंकजा मुंडे म्हणाल्या, हा जिल्हा गडांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या गडांना मानणारा वारकरी संप्रदायही मोठा आहे. विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने गडांवर येणा-या भाविकांची संख्याही मोठी असते. या भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने शासनाने निधी उपलब्ध करुन दिला असून, यातून विविध विकास योजना पूर्ण केल्या जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही बीड जिल्ह्याच्या विकासासाठी जे-जे प्रस्ताव मी घेऊन गेले त्यास त्यांनी मंजुरी दिली, असे यावेळी सांगितले.