शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
3
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
5
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
6
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
7
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
8
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
9
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
10
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
11
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
12
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
13
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
14
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
15
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
16
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
17
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
18
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
19
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
20
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

‘संशयाने नव्हे तर विश्वासानेच पुढे जावे लागेल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 23:33 IST

भारतीय समाज हा विविधतेने जगणारा आहे. देशाचे, समाजाचे आंतरिक ऐक्य टिकवायचे असेल तर या विविधता जपत संशयाने नव्हे तर एकमेकांप्रती विश्वासानेच पुढे जावे लागेल असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, इतिहास संशोधक डॉ. आ. ह. साळुंखे यांनी केले.

ठळक मुद्देगौरव सोहळा: ज्येष्ठ विचारवंत, इतिहास संशोधक आ.ह.साळुंखे यांचा बीडमध्ये अमृत महोत्सवी सत्कार

बीड : भारतीय समाज हा विविधतेने जगणारा आहे. देशाचे, समाजाचे आंतरिक ऐक्य टिकवायचे असेल तर या विविधता जपत संशयाने नव्हे तर एकमेकांप्रती विश्वासानेच पुढे जावे लागेल असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, इतिहास संशोधक डॉ. आ. ह. साळुंखे यांनी केले. बीडकरांच्या वतीने डॉ. आ. ह. साळुंखेंचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने गौरव करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.आ. ह. म्हणाले, भारतीय समाजाचे आंतरिक ऐक्य टिकवायचे असेल तर एकमेकांचा आदर करणारी, संवाद साधू शकणारी प्रवृत्ती जपली पाहिजे, टिकवली पाहिजे. हीच आपली खरी संस्कृती आहे. त्यातूनच भारतीय समाज पुढे जाईल. सर्व महामानवांनी याच प्रेरणा दिल्यात. सामाजिक जीवनात संशयाने नव्हे तर विश्वासाने, द्वेषाने नव्हे तर स्नेहाने जोडणे आवश्यक. चार्वाक, बुध्द, तुकाराम, ज्ञानेश्वर, फुले, शाहू, आंबेडकर यांच्याकडून हे शिकत आलोय. हाच आपला खरा वारसाय. म्हणून आपण संघर्षाच्या मार्गाने जायचे की स्नेहाच्या, हे ठरवावे लागेल असे आ. ह. म्हणाले.चार्वाकांनी स्वातंत्र्य हाच मोक्ष असे सांगितले. म्हणूनच स्वतंत्रपणे विचार करण्याची मानसिकता रुजली पाहिजे. स्त्रियांच्या मनात धर्माच्या आणि परंपरेच्या नावावर एक भीती पेरली आहे, त्यातून निर्भयतेचे पीक कसे येईल? म्हणून माणसाने आपला स्वातंत्र्याचा अधिकार वापरणे मला नेहमी महत्वाचे वाटले आहे. वर्षानुवर्षे पिढयनपिढया काही लोकांनी धर्म, निती सांगितली. ज्ञानाची, संपत्तीची साधनं स्वत:च्या हातात ठेवली आणि इतरांनी डोके चालवू नये, फक्त कष्ट करावेत असे सांगितले. समाजातील ९०% लोकांच्या बाबतीत हेच झाल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक बी. बी. जाधव, तर डॉ.बाळासाहेब पिंगळे यांनी मानपत्राचे वाचन केले. सूत्रसंचालन संजय मालाणी यांनी केले. आभार मोहन जाधव यांनी मानले.जिज्ञासा टोकाची हवीजागतिकीकरणाबद्दल अनेक आक्षेप आहेतच पण जागतिकीकरणाने तरुणाईसाठी जगाची दारे उघडली आहेत, मात्र त्यासाठी व्यासंग आणि जिज्ञासा तितकीच टोकाची असावी लागते. जिज्ञासा असेपर्यंतच माणूस जिवंत असतो असेही त्यांनीसांगितले. यावेळी नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Beedबीडcultureसांस्कृतिक