शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

‘संशयाने नव्हे तर विश्वासानेच पुढे जावे लागेल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 23:33 IST

भारतीय समाज हा विविधतेने जगणारा आहे. देशाचे, समाजाचे आंतरिक ऐक्य टिकवायचे असेल तर या विविधता जपत संशयाने नव्हे तर एकमेकांप्रती विश्वासानेच पुढे जावे लागेल असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, इतिहास संशोधक डॉ. आ. ह. साळुंखे यांनी केले.

ठळक मुद्देगौरव सोहळा: ज्येष्ठ विचारवंत, इतिहास संशोधक आ.ह.साळुंखे यांचा बीडमध्ये अमृत महोत्सवी सत्कार

बीड : भारतीय समाज हा विविधतेने जगणारा आहे. देशाचे, समाजाचे आंतरिक ऐक्य टिकवायचे असेल तर या विविधता जपत संशयाने नव्हे तर एकमेकांप्रती विश्वासानेच पुढे जावे लागेल असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, इतिहास संशोधक डॉ. आ. ह. साळुंखे यांनी केले. बीडकरांच्या वतीने डॉ. आ. ह. साळुंखेंचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने गौरव करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.आ. ह. म्हणाले, भारतीय समाजाचे आंतरिक ऐक्य टिकवायचे असेल तर एकमेकांचा आदर करणारी, संवाद साधू शकणारी प्रवृत्ती जपली पाहिजे, टिकवली पाहिजे. हीच आपली खरी संस्कृती आहे. त्यातूनच भारतीय समाज पुढे जाईल. सर्व महामानवांनी याच प्रेरणा दिल्यात. सामाजिक जीवनात संशयाने नव्हे तर विश्वासाने, द्वेषाने नव्हे तर स्नेहाने जोडणे आवश्यक. चार्वाक, बुध्द, तुकाराम, ज्ञानेश्वर, फुले, शाहू, आंबेडकर यांच्याकडून हे शिकत आलोय. हाच आपला खरा वारसाय. म्हणून आपण संघर्षाच्या मार्गाने जायचे की स्नेहाच्या, हे ठरवावे लागेल असे आ. ह. म्हणाले.चार्वाकांनी स्वातंत्र्य हाच मोक्ष असे सांगितले. म्हणूनच स्वतंत्रपणे विचार करण्याची मानसिकता रुजली पाहिजे. स्त्रियांच्या मनात धर्माच्या आणि परंपरेच्या नावावर एक भीती पेरली आहे, त्यातून निर्भयतेचे पीक कसे येईल? म्हणून माणसाने आपला स्वातंत्र्याचा अधिकार वापरणे मला नेहमी महत्वाचे वाटले आहे. वर्षानुवर्षे पिढयनपिढया काही लोकांनी धर्म, निती सांगितली. ज्ञानाची, संपत्तीची साधनं स्वत:च्या हातात ठेवली आणि इतरांनी डोके चालवू नये, फक्त कष्ट करावेत असे सांगितले. समाजातील ९०% लोकांच्या बाबतीत हेच झाल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक बी. बी. जाधव, तर डॉ.बाळासाहेब पिंगळे यांनी मानपत्राचे वाचन केले. सूत्रसंचालन संजय मालाणी यांनी केले. आभार मोहन जाधव यांनी मानले.जिज्ञासा टोकाची हवीजागतिकीकरणाबद्दल अनेक आक्षेप आहेतच पण जागतिकीकरणाने तरुणाईसाठी जगाची दारे उघडली आहेत, मात्र त्यासाठी व्यासंग आणि जिज्ञासा तितकीच टोकाची असावी लागते. जिज्ञासा असेपर्यंतच माणूस जिवंत असतो असेही त्यांनीसांगितले. यावेळी नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Beedबीडcultureसांस्कृतिक