शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
3
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
6
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
7
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
8
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
9
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
10
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
11
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
12
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
13
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
14
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
15
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
16
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
17
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
18
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
19
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
20
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन

‘संशयाने नव्हे तर विश्वासानेच पुढे जावे लागेल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 23:33 IST

भारतीय समाज हा विविधतेने जगणारा आहे. देशाचे, समाजाचे आंतरिक ऐक्य टिकवायचे असेल तर या विविधता जपत संशयाने नव्हे तर एकमेकांप्रती विश्वासानेच पुढे जावे लागेल असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, इतिहास संशोधक डॉ. आ. ह. साळुंखे यांनी केले.

ठळक मुद्देगौरव सोहळा: ज्येष्ठ विचारवंत, इतिहास संशोधक आ.ह.साळुंखे यांचा बीडमध्ये अमृत महोत्सवी सत्कार

बीड : भारतीय समाज हा विविधतेने जगणारा आहे. देशाचे, समाजाचे आंतरिक ऐक्य टिकवायचे असेल तर या विविधता जपत संशयाने नव्हे तर एकमेकांप्रती विश्वासानेच पुढे जावे लागेल असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, इतिहास संशोधक डॉ. आ. ह. साळुंखे यांनी केले. बीडकरांच्या वतीने डॉ. आ. ह. साळुंखेंचा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने गौरव करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.आ. ह. म्हणाले, भारतीय समाजाचे आंतरिक ऐक्य टिकवायचे असेल तर एकमेकांचा आदर करणारी, संवाद साधू शकणारी प्रवृत्ती जपली पाहिजे, टिकवली पाहिजे. हीच आपली खरी संस्कृती आहे. त्यातूनच भारतीय समाज पुढे जाईल. सर्व महामानवांनी याच प्रेरणा दिल्यात. सामाजिक जीवनात संशयाने नव्हे तर विश्वासाने, द्वेषाने नव्हे तर स्नेहाने जोडणे आवश्यक. चार्वाक, बुध्द, तुकाराम, ज्ञानेश्वर, फुले, शाहू, आंबेडकर यांच्याकडून हे शिकत आलोय. हाच आपला खरा वारसाय. म्हणून आपण संघर्षाच्या मार्गाने जायचे की स्नेहाच्या, हे ठरवावे लागेल असे आ. ह. म्हणाले.चार्वाकांनी स्वातंत्र्य हाच मोक्ष असे सांगितले. म्हणूनच स्वतंत्रपणे विचार करण्याची मानसिकता रुजली पाहिजे. स्त्रियांच्या मनात धर्माच्या आणि परंपरेच्या नावावर एक भीती पेरली आहे, त्यातून निर्भयतेचे पीक कसे येईल? म्हणून माणसाने आपला स्वातंत्र्याचा अधिकार वापरणे मला नेहमी महत्वाचे वाटले आहे. वर्षानुवर्षे पिढयनपिढया काही लोकांनी धर्म, निती सांगितली. ज्ञानाची, संपत्तीची साधनं स्वत:च्या हातात ठेवली आणि इतरांनी डोके चालवू नये, फक्त कष्ट करावेत असे सांगितले. समाजातील ९०% लोकांच्या बाबतीत हेच झाल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक बी. बी. जाधव, तर डॉ.बाळासाहेब पिंगळे यांनी मानपत्राचे वाचन केले. सूत्रसंचालन संजय मालाणी यांनी केले. आभार मोहन जाधव यांनी मानले.जिज्ञासा टोकाची हवीजागतिकीकरणाबद्दल अनेक आक्षेप आहेतच पण जागतिकीकरणाने तरुणाईसाठी जगाची दारे उघडली आहेत, मात्र त्यासाठी व्यासंग आणि जिज्ञासा तितकीच टोकाची असावी लागते. जिज्ञासा असेपर्यंतच माणूस जिवंत असतो असेही त्यांनीसांगितले. यावेळी नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Beedबीडcultureसांस्कृतिक