शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

माजलगावात १०० ऐवजी ७८ फुटांचा रस्ता; नियम डावलून कशी तरी कामे करण्याचा कंपनीचा सपाटा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 16:19 IST

हा रस्ता १०० फुटांचा न होता केवळ ७८ फुटांचाच होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

माजलगाव (बीड ) :  शहरातील मुख्य रस्त्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. हा रस्ता १०० फुटांचा न होता केवळ ७८ फुटांचाच होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. सध्या या सिमेंट रस्त्याच्या झालेल्या कामावर पाणी  टाकले जात नसल्याने व काम सुरू झाल्यापासून कोणताही अधिकारी नियंत्रणासाठी  फिरकला नसल्याने दर्जाबाबत नागरिक संभ्रमात आहेत. 

अधिकारी कामाच्या दर्जाबाबत सर्व काही कंपनीवर सोपवून जालना येथूनच उंटावरून शेळ्या हाकू  लागले आहेत. काम चांगले होत आहे किंवा नाही  व हा रस्ता किती फुटाचा होणार, या बाबत नागरिक विविध शंका उपस्थित करू लागले आहेत. खामगाव-पंढरपूर मार्गावरील माजलगाव-केज या टप्प्यापैकी शहरातील सिमेंट रस्त्याचे काम महिन्यापासून सुरू आहे. हे काम सुरु  झाले तेव्हा पत्रकार व काही सामाजिक संघटनांनी हे काम अडवून नियमानुसार १०० फुटांचे करावे, अशी मागणी केल्यानंतर येथील आ. आर. टी. देशमुख यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर नागपूर येथे आ.आर.टी.देशमुख यांनी पालकमंत्री पंकजा मुंडे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन याबाबतची माहिती दिली होती.  त्यावरून मुख्यमंत्र्यांनी याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कानावर ही बाब घातली होती. या नंतर हा रस्ता १०० फुटांचाच होणार असे वाटत होते.

सध्या शहरातील एका बाजूचे काम पूर्ण झाले अजून दुसरी बाजू सुरू करत असताना नाल्यांचे काम बुधवारपासून सुरू  करण्यात आले. शहरातील या रस्त्याचे काम सुरू झाल्यापासूनच सिमेंटीकरणाचे काम झाल्यानंतर किमान दोन आठवडे तरी बारदाना टाकून पाणी मारणे आवश्यक असताना तसे दिसत नाही. आता कसेकरी काम उरकण्यासाठी कंपनीचा खटाटोप सुरू आहे. 

काम झाल्यानंतर पाणी टाकले जात नाहीसंबंधित रस्त्याची संपूर्ण जबाबदारी पुढील ६ वर्षे कंपनीकडे आहे त्यामुळे क्युरिंगअभावी रस्ता फुटला तर फुटू द्या, असे बेजबाबदार वक्तव्य कार्यकारी अभियंता विक्र म जाधव यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केले. सदर रस्त्यावर पाण्याची क्युरिंग न केल्याने या रस्त्यावरून वाहने गेल्यास  रस्त्यावरील धूळ अनेकांच्या डोळ्यात जात असल्याने डोळ्यांचे आजार जडत आहेत.

सिमेंट रस्त्याच्या क्युरिंगवरून दोन अधिकाऱ्यांत मतभिन्नताया रस्त्याच्या रु ंदी व क्युरिंगबाबत रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता विक्र म जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, सिमेंट रस्त्याचे काम झाल्यानंतर किमान दोन आठवडे तरी रस्त्यावर पाणी मारून क्युरिंग करणे आवश्यक आहे जर पाणी मारले जात नसेल तर संबंधित कंपनीला क्युरिंगबाबत सूचना करण्यात येईल, असे सांगितले व हा रस्ता १०० फुटाचाच होणार, असे लेखी आश्वासन कार्यकारी अभियंता जाधव यांनी रस्त्याच्या रूंदीबाबत उपोषणार्थींना दिले होते. तर दुसरीकडे मात्र याच कामावर असणारे शाखा अभियंता अतुल कोटेचा यांना विचारणा केली असता ते म्हणाले, रस्त्याची रु ंदी केवळ ७८ फुटांचीच असून १०० फुटांच्या आतमधील अतिक्र मण होत असल्याचे सांगत क्युरिंगबाबत ते म्हणाले, रस्त्याचे काम सुरू असतानाच मशीनमध्येच रसायनांचा वापर केल्यामुळे त्यास पुन्हा पाणी मारण्याची आवश्यकता नसते, असे सांगितल्याने रस्त्याच्या क्युरिंगबाबत अधिकाऱ्यांमध्ये मतभिन्नता दिसत आहे 

टॅग्स :Beedबीडroad safetyरस्ते सुरक्षाhighwayमहामार्ग