शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

शेतीची खातेफोड होऊन वेगळे झाले तरी मिळणार नाही लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2019 23:40 IST

केंद्र शासनाने यावर्षीचा अर्थसंकल्प मांडला त्यावेळी अल्पभूधारक शेतकºयांना प्रतिवर्षी ६ हजार रुपये देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला गेला होता.

ठळक मुद्देप्रधानमंत्री किसान सन्मान योजना : प्रत्यक्ष दोन हेक्टर शेती असणाऱ्यांनाच लाभ; २० फेब्रुवारीपर्यंत माहिती अपलोड करण्याच्या सूचना

प्रभात बुडूख ।लोकमत न्यूज नेटवर्कबीड : केंद्र शासनाने यावर्षीचा अर्थसंकल्प मांडला त्यावेळी अल्पभूधारक शेतकºयांना प्रतिवर्षी ६ हजार रुपये देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला गेला होता. या योजनेचा मोठा गाजावाजा करण्यात आला होता. मात्र, या योजनेचा लाभ देण्यासाठी शेतीची खातेफोड झालेली असेल तरीदेखील संपूर्ण कुटुंब गृहित धरले जाणार असल्यामुळे अनेक शेतकºयांना या योजनेपासून वंचित राहवे लागणार आहे. सर्व कागदपत्रे देऊन देखील लाभ मिळणार नसल्यामुळे शेतकºयांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.बीड जिल्ह्यात जवळपास ६ लाख ५१ हजार ७८३ शेतकरी संख्या आहे. त्यापैकी जवळपास ५.५० लाख अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी आहेत. मात्र, यापैकी फक्त दोन ते अडीच लाख जणांनाच या योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती आहे. येत्या २० फेब्रुवारीपर्यंत युद्धपातळीवर काम करुन पात्र अल्पभूधारक शेतकºयांची माहिती पीएम किसान पोर्टलवर अपलोड करण्याच्या सूचना पत्राद्वारे कृषी सचिवांनी जिल्हा प्रशासनास दिल्या आहेत. त्यामुळे रविवार व छत्रपती शिवाजी महाराज जयंती या शासकीय सुटीच्या दिवशी देखील संबंधित अधिकारी कर्मचाºयांना काम करावे लागणार आहे.पीएम-किसान योजनेच्या माध्यमातून दिलेल्या तारखेच्या आत अल्पभूधारक शेतकºयांची माहिती अपलोड करण्यासाठी तलाठी, ग्रामसेवक व इतर काही कर्मचाºयांना या योजनेच्या कामात सहभागी करुन घेतले आहे. अल्पभूधारक शेतकºयांची नावे सॉफ्टवेअरमध्ये टाकल्यानंतर एकाच कुटुंबातील नावांचे वर्गीकरण होणार आहे. त्यानंतर त्या कुटुंबाचे शेतीचे क्षेत्र दोन हेक्टरपेक्षा जास्त होत असेल तर या योजनेचा लाभ त्या कुटुंबाला मिळणार नसल्याची माहिती आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अल्पभूधारक शेतकºयांची संख्या जरी ५.५० लाख असली तरीदेखील लाभ मात्र फक्त दोन ते अडीच लाख शेतकºयांना होणार आहे. त्यामुळे शेतकºयांमधून योजनेविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे.विभक्त कुटुंब पद्धती.... अनेक शेतकरी कुटुंब हे विभक्त झालेले आहेत, त्यांनी शेतजमिनीची खातेफोड करुन प्रत्येकजण वैयक्तिक शेतीची वहिती करत आहेत. मात्र, तरी देखील या योजनेसाठी खातेफोड झालेले असताना कुटुंबाची एकत्रित शेती ही दोन हेक्टरपेक्षा अधिक दिसत असल्यामुळे पात्र असून देखील लाभ मिळणार नाही, त्यामुळे ज्या शेतकºयांच्या नावे दोन हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्र आहे त्यांना सरसकट योजना लागू करण्याची मागणी शेतकºयांमधून होत आहे.२४ फेब्रुवारीला योजनेचा शुभारंभ ... योजनेचा शुभारंभ येत्या २४ तारखेपासून करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. २० फेब्रुवारी पर्यंत सर्व जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबाची माहिती अपलोड करण्यात येणार आहे. शासकीय सुटी रद्द करुन संबंधीत अधिकारी,कर्मचाºयांनी कार्यालयात हजर राहून माहिती अपलोड करण्याच्या वरिष्ठांकडून देण्यात आलेल्या आहेत.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्र