शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

वय वाढवून ठाण मांडलेल्या ‘त्या’ संचालकांसह ९० अधिकाऱ्यांना डच्चू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2022 05:45 IST

राजकारण्यांच्या आशीर्वादाने निवृत्तीचे वय केले होते ६२

- सोमनाथ खताळ लोकमत न्यूज नेटवर्क   बीड : राजकारण्यांना हाताशी धरून सेवानिवृत्तीचे वय ५८ वरून ६२ केलेल्या ९० अधिकाऱ्यांना आता ३१ मे रोजी डच्चू दिला जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि शासनाच्या नव्या नियमानुसार ६० वर्षांवरील प्रत्येक अधिकारी घरी जाणार आहे. यात संचालक, अपर संचालक, सहसंचालक, उपसंचालक अशा महत्त्वाच्या पदावरील अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. 

आरोग्य विभागात सेवानिवृत्तीचे वय हे ५८ वर्षे आहे. परंतु, काही बड्या अधिकाऱ्यांनी राजकीय नेत्यांना हाताशी धरून २०१५ मध्ये हे वय ५८ वरून ६० केले. नंतर २०१९ मध्ये ६० चे ६२ केले. नंतर २०२१ मध्ये ६२ वर्षांचा हा निर्णय कायम राहिला. यामुळे पदोन्नतीस पात्र असतानाही इतर अधिकाऱ्यांना संधी मिळाली नाही. बीडच्या सहा वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या वयवाढीला विरोध करीत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. यात न्यायालयानेही हे चुकीचे असल्याचे सांगितले. मॅटनेही यावर असाच निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयानेही पाच महिन्यांपूर्वी उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य असल्याचे सांगत रिक्त पदांबाबत शासनाचे कान टोचले होते. परंतु, तरीही सचिवांसह इतर अधिकाऱ्यांनी याची तत्काळ अंमलबजावणी केली नाही. पुन्हा एक नियम बनवून ५८ वर्षांवरील अधिकाऱ्यांना अभय दिले होते.

‘लोकमत’ने उठविला आवाजवय वाढवून ठाण मांडलेल्या ठराविक अधिकाऱ्यांमुळे राज्यातील शेकडो अधिकाऱ्यांना पात्र असतानाही पदोन्नती मिळत नव्हती. याबाबत ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला होता. ‘लोकमत’ने आवाज उठविल्यानेच ठाण मांडलेले अधिकारी घरी जाणार आहेत. त्यामुळे डॉक्टरांमधून ‘लोकमत’बद्दल कृतज्ञता व्यक्त केली जात आहे.   

२०२३ पासून ५८ वर्षांची अंमलबजावणी३१ मे २०२२ रोजी ६० वर्षांवरील सर्व अधिकारी निवृत्त होतील. तसेच ५८ वर्षांवरील अधिकारी हे ३१ मे २०२३ ला निवृत्त होतील. जून २०२३ पासून निवृत्तीचे वय हे ५८ ठेवण्याचा नियम शासनाने केला आहे. परंतु, हा केवळ अधिकाऱ्यांसाठीच का, इतर कर्मचाऱ्यांना का नाही? असा सवाल केला जात आहे.  

३१ मे रोजी जवळपास ९० अधिकारी निवृत्त होतील. त्यांच्या जागेवर कोणाला नियुक्त करायचे, हे शासन ठरवेल. -डॉ. साधना तायडे, संचालक आरोग्य सेवा, मुंबई