शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
3
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
4
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
5
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
6
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
7
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
8
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
9
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
10
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
11
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
12
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
13
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
14
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
15
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
16
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
17
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
18
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
19
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
20
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार

नूतन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मांनी घेतला पदभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:38 IST

बीड : न्यायालयाच्या आदेशानंतर बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांची बदली करण्यात आली. या रिक्त जागी हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य ...

बीड : न्यायालयाच्या आदेशानंतर बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांची बदली करण्यात आली. या रिक्त जागी हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली. १२ ऑगस्टला त्यांनी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला असून, जगताप यांना निरोप देण्यात आला.

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेवर मोठा ताण आलेला होता. तत्कालीन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार, तसेच आरोग्य विभागासोबत मिळून रुग्णांना चांगल्या व प्रभावी सुविधा मिळतील यासाठी प्रयत्न केले होते. तसेच ऑक्सिजनचा तुटवडा हा गंभीर विषय बनला असताना, शासनाकडे पाठपुरावा करून ऑक्सिजनसाठी बीड जिल्हा स्वयंपूर्ण होईल अशी यंत्रणा उभारण्यात तत्कालीन जिल्हाधिकारी जगताप यांचा मोठा वाटा आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून अनेक त्याचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सुसज्ज उभा करण्यासंदर्भातदेखील जगताप यांनी विविध उपाययोजना केल्या आहेत.

गुरुवारी नूतन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

नूतन जिल्हाधिकाऱ्यांपुढे आव्हान

कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे बीड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्याचे मोठे आव्हान नवीन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्यापुढे असणार आहे. रुग्ण वाढले तर बेडची कमतरता न भासू देणे, ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा करणे, तसेच आरोग्य यंत्रणेतील सुविधा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आव्हान असणार आहे. तसेच जिल्ह्यातील विविध प्रश्न व त्यामधील राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपाला बळी न पडता सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे निर्णय घेण्याचेदेखील आव्हान असणार आहे.

कारवाईची टांगती तलवार

प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली कामे वेळेत करण्यासाठी नवीन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा हे आग्रही असतात. तसेच कामात कुचराई करणाऱ्यांची गय ते करीत नसल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, ज्या कारणासाठी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांची बदली करण्यात आली त्या २०११ ते २०१९ या कालावधीतील कथित मनरेगा घोटाळा प्रकरणात अनेकांवर कारवाईची टांगती तलवार असणार आहे. त्यांमुळे अनेकांचे धाबे दणाणले असून, बचावासाठी वरिष्ठ नेत्यांकडे धाव घेत आहेत.

120821\12_2_bed_14_12082021_14.jpg

नवीन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांचे स्वागत करताना तत्कालीन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप