शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी पगारात होणार इतकी वाढ? कोणाला मिळणार फायदा?
5
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
6
"Help Me! गर्लफ्रेंडसोबत फिरायला जायचंय..."; बॉयफ्रेंडने लावले UPI स्कॅनर असलेले पोस्टर
7
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
8
Mumbai: कबुतरांना दाणे टाकताना रोखलं, वृद्ध व्यक्तीसह त्यांच्या मुलावर लोखंडी रॉडने हल्ला!
9
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
10
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
11
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
12
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
13
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
14
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
15
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
16
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
17
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
18
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
19
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
20
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'

नूतन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मांनी घेतला पदभार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:38 IST

बीड : न्यायालयाच्या आदेशानंतर बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांची बदली करण्यात आली. या रिक्त जागी हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य ...

बीड : न्यायालयाच्या आदेशानंतर बीडचे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांची बदली करण्यात आली. या रिक्त जागी हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली. १२ ऑगस्टला त्यांनी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला असून, जगताप यांना निरोप देण्यात आला.

जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या चिंताजनक आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेवर मोठा ताण आलेला होता. तत्कालीन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी जिल्हा परिषदेचे सीईओ अजित कुंभार, तसेच आरोग्य विभागासोबत मिळून रुग्णांना चांगल्या व प्रभावी सुविधा मिळतील यासाठी प्रयत्न केले होते. तसेच ऑक्सिजनचा तुटवडा हा गंभीर विषय बनला असताना, शासनाकडे पाठपुरावा करून ऑक्सिजनसाठी बीड जिल्हा स्वयंपूर्ण होईल अशी यंत्रणा उभारण्यात तत्कालीन जिल्हाधिकारी जगताप यांचा मोठा वाटा आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून अनेक त्याचा सामना करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सुसज्ज उभा करण्यासंदर्भातदेखील जगताप यांनी विविध उपाययोजना केल्या आहेत.

गुरुवारी नूतन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी तत्कालीन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

नूतन जिल्हाधिकाऱ्यांपुढे आव्हान

कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे बीड जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा बळकट करण्याचे मोठे आव्हान नवीन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्यापुढे असणार आहे. रुग्ण वाढले तर बेडची कमतरता न भासू देणे, ऑक्सिजनचा सुरळीत पुरवठा करणे, तसेच आरोग्य यंत्रणेतील सुविधा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आव्हान असणार आहे. तसेच जिल्ह्यातील विविध प्रश्न व त्यामधील राजकीय नेत्यांच्या हस्तक्षेपाला बळी न पडता सर्वसामान्य नागरिकांच्या हिताचे निर्णय घेण्याचेदेखील आव्हान असणार आहे.

कारवाईची टांगती तलवार

प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपली कामे वेळेत करण्यासाठी नवीन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा हे आग्रही असतात. तसेच कामात कुचराई करणाऱ्यांची गय ते करीत नसल्याची सूत्रांची माहिती आहे. दरम्यान, ज्या कारणासाठी तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांची बदली करण्यात आली त्या २०११ ते २०१९ या कालावधीतील कथित मनरेगा घोटाळा प्रकरणात अनेकांवर कारवाईची टांगती तलवार असणार आहे. त्यांमुळे अनेकांचे धाबे दणाणले असून, बचावासाठी वरिष्ठ नेत्यांकडे धाव घेत आहेत.

120821\12_2_bed_14_12082021_14.jpg

नवीन जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांचे स्वागत करताना तत्कालीन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप