शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

ना प्रवासाचा इतिहास ना बाहेरील संपर्क; मग परळीच्या महिलेला कोरोनाचा संसर्ग कोठून झाला ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 16:03 IST

आरोग्य व प्रशासकीय यंत्रणेसमोर तपासाचे आव्हान

ठळक मुद्देबीड जिल्ह्यात सध्या एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६७ झाली आहे.

- संजय खाकरे

परळी : परळी येथील महिला औरंगाबादमध्ये उपचारासाठी गेल्यावर कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. परंतु महिलेस कसलाही प्रवास इतिहास नाही किंवा घरातच राहिल्याने नातेवाईकांशिवाय इतरांच्या संपर्कातही नाही. मग या महिलेला कोरोनाची लागण कशी व कोठून झाली ? असा प्रश्न आहे. याचा शोध घेण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर आहे. शनिवारी दिवसभर या महिलेलच्या संपर्कातील लोकांचा शोध घेण्याचे काम सुरू होते. सध्या या महिलेवर औरंगाबादमध्ये उपचार सुरू आहेत.

बीड जिल्ह्यात सध्या एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ६७ झाली आहे. यातील ५३ कोरोनामुक्त झालेले असून एकाचा मृत्यू झालेला आहे. बीड जिल्ह्यात १२ तर औरंगाबादमध्ये एक महिला उपचार घेत आहे. आतापर्यंतचे पिंपळा, धारूर व परळीची महिला वगळता सर्वच रुग्ण हे मुंबईहून आलेले आहेत. शुक्रवारी बीड जिल्ह्यात एक तर परळीची महिला औरंगाबादमध्ये पॉझिटिव्ह आढळली होती. या महिलेला किडनीचा आजार आहे. ती नातेवाईकांसह ३ जून रोजी लातूर येथील एका खाजगी रुग्णालयात गेली होती. परंतु तेथील डॉक्टरांनी औरंगाबादला जाण्याचा सल्ला दिला. त्याप्रमाणे ते घरी आले. ४ जून रोजी सकाळी उठून ते औरंगाबादला गेले. तेथे तिचा स्वॅब घेतला आणि शुक्रवारी सायंकाळी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली.

दरम्यान, ही महिला आजारी आणि त्यातच लॉकडाऊन असल्याने मागील महिनाभरापासून घरातून बाहेर पडलेली नाही. तसेच मुलगा व मुलगी यांच्याशिवाय इतरांच्या संपर्कातही आलेली नाही. त्यामुळे तिला कोरोनाचा संसर्ग कोठून झाला, असा प्रश्न आहे. याचा शोध घेणे आरोग्य विभागाकडून सुरू आहे. तिच्या नातेवाईकांसह संपर्कातील इतर लोकांचे स्वॅब घेण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. याचा तपास लावण्याचे आव्हान आता आरोग्य विभागासमोर आहे.

कंटेनमेंट झोन अन् सर्वेक्षण सुरूपरळी शहरातील भिमनगर हा भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केला आहे. ९ पथकांमार्फत तेथील सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. तसेच कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे कामही सुरू असल्याचे परळीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ.लक्ष्मण मोरे यांनी सांगितले.

असा होऊ शकतो संसर्गकोरोनाबाधित महिलेचा मुलगा व मुलगी यांची गॅस एजन्सी आहे. तेथे बाहेरून लोक येतात. ते लोक या दोघांच्या आणि हे दोघे या महिलेलच्या संपर्कात आल्याने संसर्ग होऊ शकतो. किंवा लातूर व औरंगाबादमध्ये गेल्यावर संसर्ग झाल्याचा संशय आहे. आता मुलगा व मुलीचाही स्वॅब घेण्यात येणार आहे. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तरच याला दुजोरा मिळेल, अन्यथा आणखी गुंतागुंत होऊन बसणार आहे. ती सोडवून कोरोना संसर्ग कसा झाला? याचा शोध घेण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर असणार आहे. 

कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम सुरूपरळीच्या बाधित रुग्णाचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम सुरूच आहे. हाय रिस्क व लो रिस्क असे विभाजन केले असून त्यांचे स्वॅब घेतले जातील. तिला संसर्ग कसा झाला? हे आताच सांगणे कठीण आहे. शोध घेण्याचे काम सुरूच आहे. तसेच परिसरात कंटेनमेंट झोन करून सर्वेक्षण करण्यात येत आहे.- डॉ.आर.बी.पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, बीड

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBeedबीडCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस