शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्ज वाटपात बीड जिल्ह्यातील बँकांचा हलगर्जीपणा; २१४२ कोटींचे उद्दिष्टे असताना केवळ ६१.३४ कोटींचेच केले वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 16:49 IST

शासनाचे आदेश असताना देखील पीक कर्ज वटपात बँका हलगर्जीपणा करत असल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देकर्ज वाटपात दिरंगाई करणाऱ्या बँकांना जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत.

बीड : खरीप हंगाम पेरणी, लागवडीला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. मात्र पीक कर्जाविना शेतकऱ्यांचे हाल होताना दिसत आहेत. शासनाचे आदेश असताना देखील पीक कर्ज वटपात बँका हलगर्जीपणा करत असल्याचे समोर आले आहे. कर्ज वाटपात दिरंगाई करणाऱ्या बँकांना जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत.

शेतकरी आत्महत्येला आळा घालण्यासाठी व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबवल्याचे दाखले शासन नेहमीच देत असते. मात्र, शासनाच्या कर्जवाटप योजनेस जिल्ह्यातील सर्व बँकांनी हरताळ फासल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील १८ बँकांना २ हजार १४२ कोटी रूपयांचे खरीप कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. मात्र, यामध्ये बँकांनी कर्ज वाटप न केल्यामुळे खरीप लागवडीच्या तोंडावर शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे हतबल झालेले शेतकरी जिल्हा प्रशासनाकडे बँकांविरोधात तक्रारी करू लागले आहेत.

बीड जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना कर्ज वाटपासाठी अनुकूल आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी एम. डी. सिंह व निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी हे वेळोवेळी बँक अधिकाऱ्यांशी बैठकीच्या माध्यमातून कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आदेश देत आहेत. मात्र, प्रशासनाच्या आदेशाला बँकांकडून केराची टोपली दाखवली गेल्याने जिल्हा प्रशासन देखील बँकांपुढे हतबल झाले आहे.  ज्या बँका पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी शासनाकडे अहवाल पाठवण्याचे संकेत जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

बँकांचे अधिकारी आरबीआयच्या परिपत्रकाची पायमल्ली करीत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी वैधानिक अधिकाराचा वापर करुन जिल्ह्यातील बँक अधिकाऱ्यांवर संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शेतकरी संघटनेचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी केली आहे. बँकांची मुजोरी अशीच सुरु राहिली तरी जिल्हाभर आंदोलन करु, असा इशाराही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला आहे.

१८ बँकामार्फत केले जाणार कर्जवाटपजिल्ह्यातील प्रमुख १८ बँकांना २ हजार १४२ कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. मात्र, त्यापैकी फक्त ६१ कोटी रूपये बँकांनी वाटप केले आहे.शेतकरी हवालदिल खरीप पेरणीच्या तोंडावर पीक कर्जासाठी सामान्य शेतकऱ्यांना बँकांचे खेटे घालावे लागत आहेत. मात्र, बँकाकडून कुठलाही प्रतिसाद न दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे

कर्जवाटपाच्या संदर्भात दिलेल्या आदेशाला बँकांच्या अधिकाऱ्यांकडून योग्य प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे येत्या १८ तारखेला बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे.- एम. डी. सिंहजिल्हाधिकारी, बीड

 

टॅग्स :Beed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीडFarmerशेतकरीbankबँक