शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
3
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
4
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
5
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
6
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
7
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
8
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
9
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
10
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
11
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
12
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
13
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
14
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
15
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
16
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
17
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
18
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
19
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
20
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले

पीककर्ज वाटपात बीड जिल्ह्यातील बँकांचा हलगर्जीपणा; २१४२ कोटींचे उद्दिष्टे असताना केवळ ६१.३४ कोटींचेच केले वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 16:49 IST

शासनाचे आदेश असताना देखील पीक कर्ज वटपात बँका हलगर्जीपणा करत असल्याचे समोर आले आहे.

ठळक मुद्देकर्ज वाटपात दिरंगाई करणाऱ्या बँकांना जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत.

बीड : खरीप हंगाम पेरणी, लागवडीला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. मात्र पीक कर्जाविना शेतकऱ्यांचे हाल होताना दिसत आहेत. शासनाचे आदेश असताना देखील पीक कर्ज वटपात बँका हलगर्जीपणा करत असल्याचे समोर आले आहे. कर्ज वाटपात दिरंगाई करणाऱ्या बँकांना जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहेत.

शेतकरी आत्महत्येला आळा घालण्यासाठी व शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाकडून विविध योजना राबवल्याचे दाखले शासन नेहमीच देत असते. मात्र, शासनाच्या कर्जवाटप योजनेस जिल्ह्यातील सर्व बँकांनी हरताळ फासल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील १८ बँकांना २ हजार १४२ कोटी रूपयांचे खरीप कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. मात्र, यामध्ये बँकांनी कर्ज वाटप न केल्यामुळे खरीप लागवडीच्या तोंडावर शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे हतबल झालेले शेतकरी जिल्हा प्रशासनाकडे बँकांविरोधात तक्रारी करू लागले आहेत.

बीड जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांना कर्ज वाटपासाठी अनुकूल आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी एम. डी. सिंह व निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी हे वेळोवेळी बँक अधिकाऱ्यांशी बैठकीच्या माध्यमातून कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आदेश देत आहेत. मात्र, प्रशासनाच्या आदेशाला बँकांकडून केराची टोपली दाखवली गेल्याने जिल्हा प्रशासन देखील बँकांपुढे हतबल झाले आहे.  ज्या बँका पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यासाठी शासनाकडे अहवाल पाठवण्याचे संकेत जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.

बँकांचे अधिकारी आरबीआयच्या परिपत्रकाची पायमल्ली करीत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी वैधानिक अधिकाराचा वापर करुन जिल्ह्यातील बँक अधिकाऱ्यांवर संघटित गुन्हेगारी कायद्यान्वये फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी शेतकरी संघटनेचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी केली आहे. बँकांची मुजोरी अशीच सुरु राहिली तरी जिल्हाभर आंदोलन करु, असा इशाराही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिला आहे.

१८ बँकामार्फत केले जाणार कर्जवाटपजिल्ह्यातील प्रमुख १८ बँकांना २ हजार १४२ कोटी रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. मात्र, त्यापैकी फक्त ६१ कोटी रूपये बँकांनी वाटप केले आहे.शेतकरी हवालदिल खरीप पेरणीच्या तोंडावर पीक कर्जासाठी सामान्य शेतकऱ्यांना बँकांचे खेटे घालावे लागत आहेत. मात्र, बँकाकडून कुठलाही प्रतिसाद न दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे

कर्जवाटपाच्या संदर्भात दिलेल्या आदेशाला बँकांच्या अधिकाऱ्यांकडून योग्य प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे येत्या १८ तारखेला बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे.- एम. डी. सिंहजिल्हाधिकारी, बीड

 

टॅग्स :Beed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीडFarmerशेतकरीbankबँक