शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
2
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
3
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
4
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
5
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
6
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
7
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
8
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
9
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
10
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
11
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
12
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
14
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
15
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
16
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
17
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय
18
Maharashtra Politics : पक्षात कोण नाराज आहे का? जयंत पाटलांनी दिलं उत्तर; चर्चांना दिला पूर्णविराम

उच्च शिक्षणामधून गुणवत्तापूर्ण नेतृत्व तयार होणे ही काळाची गरज - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:20 IST

बीड : आजच्या काळात गुणसंपन्न व कर्तबगार युवक घडण्यासाठी उच्च शिक्षणाला महत्त्व आहे. उच्च शिक्षणामधून विद्यार्थ्यांना नैतिक मूल्ये, विविध ...

बीड : आजच्या काळात गुणसंपन्न व कर्तबगार युवक घडण्यासाठी उच्च शिक्षणाला महत्त्व आहे. उच्च शिक्षणामधून विद्यार्थ्यांना नैतिक मूल्ये, विविध कौशल्ये प्राप्त होत असतात. युवकांनीही उच्च शिक्षण घेत असताना गंभीरपणे अभ्यास करून आपल्यामध्ये गुणवत्तापूर्ण नेतृत्व विकसित करावे, असे प्रतिपादन जी. एस. काॅमर्स काॅलेज, वर्धा येथील वाणिज्य विभागाचे प्राध्यापक डाॅ. योगेश पतिंगे यांनी केले.

बलभीम महाविद्यालयात वाणिज्य विभागाच्या वतीने २२ जुलै रोजी आयोजित ऑनलाइन कार्यक्रमात ते उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत सानप होते तर उपप्राचार्य डाॅ. संतोष उंदरे, उपप्राचार्य डाॅ. गणेश मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.

डाॅ. पतिंगे म्हणाले, वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये नेतृत्वगुण विकसित करत असताना व्यावसायिक कौशल्येही आत्मसात करावी; जेणेकरून उच्च शिक्षण झाल्यावर या कौशल्यांचा उपयोग त्यांना आपला उद्योग-व्यवसाय वाढीसाठी होईल. कोणत्याही क्षेत्रात प्रगती करायची असेल तर आपल्याकडे नेतृत्वक्षमता असणे गरजेचे आहे.

उपप्राचार्य डाॅ. गणेश मोहिते म्हणाले, विद्यार्थ्यांनी फक्त परीक्षार्थी न राहता ज्ञानार्थी बनावे. तसेच आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करावा. उच्च शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व प्रभावी बनून तो स्वयंपूर्ण बनायला हवा तरच शिक्षणाचे ध्येय साध्य होईल.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभागप्रमुख डाॅ. ईश्वर छानवाल यांनी केले. सूत्रसंचालन आएशा काझी हिने केले तर आभार रोहिणी बियाले या विद्यार्थिनीने मानले. या वेळी वाणिज्य विभागाचे प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.