शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
3
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
4
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
5
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
6
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
7
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
8
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
9
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
10
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
11
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?
12
नासाला तगडे आव्हान; ISRO आणि रशियाची ROSCOSMOS एकत्र आली, 'या' मोहिमेवर करणार काम...
13
Nagpur Politics: भाजपची पकड 'मजबूत', १२० जागांचा आकडा आधीच जाहीर; ठाकरेंच्या नेतृत्वाची पुन्हा 'परीक्षा'
14
'नमामि गंगे'चा जगाला आदर्श; 'स्टॉकहोम वॉटर वीक'मध्ये नदी संवर्धनासाठी भारताचे कौतुक
15
'भारताने रशियाचे तेल घेणे बंद केले नाही तर...', ट्रम्प यांच्या सल्लागाराने भारत सरकारला आणखी टॅरिफ वॉरची धमकी दिली
16
Navi Mumbai Traffic: मराठा मोर्चा नवी मुंबईच्या वेशीवर, वाहतुकीत मोठे बदल; कोणते रस्ते बंद, कोणते खुले?
17
संजय गायकवाडांच्या आमदारकीचं काय होणार? ठाकरेंच्या नेत्याने ठोठावले उच्च न्यायालयाचे दार
18
पत्नीचा संताप अनावर झाला, पतीच्या तोंडावर फेकली उकळती चहा; नेमकं झालं तरी काय?
19
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
20
निक्की भाटी प्रकरणात वृद्ध शेजाऱ्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, 'निक्की जळत होती तेव्हा विपिन...'

उच्च शिक्षणामधून गुणवत्तापूर्ण नेतृत्व तयार होणे ही काळाची गरज - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:20 IST

बीड : आजच्या काळात गुणसंपन्न व कर्तबगार युवक घडण्यासाठी उच्च शिक्षणाला महत्त्व आहे. उच्च शिक्षणामधून विद्यार्थ्यांना नैतिक मूल्ये, विविध ...

बीड : आजच्या काळात गुणसंपन्न व कर्तबगार युवक घडण्यासाठी उच्च शिक्षणाला महत्त्व आहे. उच्च शिक्षणामधून विद्यार्थ्यांना नैतिक मूल्ये, विविध कौशल्ये प्राप्त होत असतात. युवकांनीही उच्च शिक्षण घेत असताना गंभीरपणे अभ्यास करून आपल्यामध्ये गुणवत्तापूर्ण नेतृत्व विकसित करावे, असे प्रतिपादन जी. एस. काॅमर्स काॅलेज, वर्धा येथील वाणिज्य विभागाचे प्राध्यापक डाॅ. योगेश पतिंगे यांनी केले.

बलभीम महाविद्यालयात वाणिज्य विभागाच्या वतीने २२ जुलै रोजी आयोजित ऑनलाइन कार्यक्रमात ते उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत सानप होते तर उपप्राचार्य डाॅ. संतोष उंदरे, उपप्राचार्य डाॅ. गणेश मोहिते यांची प्रमुख उपस्थिती होती.

डाॅ. पतिंगे म्हणाले, वाणिज्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये नेतृत्वगुण विकसित करत असताना व्यावसायिक कौशल्येही आत्मसात करावी; जेणेकरून उच्च शिक्षण झाल्यावर या कौशल्यांचा उपयोग त्यांना आपला उद्योग-व्यवसाय वाढीसाठी होईल. कोणत्याही क्षेत्रात प्रगती करायची असेल तर आपल्याकडे नेतृत्वक्षमता असणे गरजेचे आहे.

उपप्राचार्य डाॅ. गणेश मोहिते म्हणाले, विद्यार्थ्यांनी फक्त परीक्षार्थी न राहता ज्ञानार्थी बनावे. तसेच आपल्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करावा. उच्च शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व प्रभावी बनून तो स्वयंपूर्ण बनायला हवा तरच शिक्षणाचे ध्येय साध्य होईल.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक वाणिज्य विभागप्रमुख डाॅ. ईश्वर छानवाल यांनी केले. सूत्रसंचालन आएशा काझी हिने केले तर आभार रोहिणी बियाले या विद्यार्थिनीने मानले. या वेळी वाणिज्य विभागाचे प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.