शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

सरकारच्या विरोधात बीडमध्ये राष्ट्रवादीचा ‘हल्लाबोल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 00:26 IST

बीड : राज्य व केंद्र सरकार सर्वत्रच अपयशी ठरत आहे. शेतकºयांना दिलेले एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही. शेतकºयांना ...

ठळक मुद्दे धारूर, अंबाजोगाई, शिरूर, परळीत आंदोलन

बीड : राज्य व केंद्र सरकार सर्वत्रच अपयशी ठरत आहे. शेतकºयांना दिलेले एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही. शेतकºयांना देशोधडीला लावण्याचे काम या सरकारने केले आहे. या सरकारच्या निषेधार्थ व विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्यावतीने सोमवारी शिरूर, परळी, अंबाजोगाई व धारूरमध्ये ‘हल्लाबोल’ आंदोलन करण्यात आले. यामध्ये शेतकरीही उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.शेतकºयांना सरसकट कर्जमाफी देऊन सातबारा कोरा करावा, परतीच्या पावसाने शेतीचे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करावेत, मागील वर्षी नुकसान झालेल्या शेतकºयांना भरपाई द्यावी, लोडशेडिंग बंद करावी, खरीप हंगामातील पीकविमा वाटप करावा, शेतीतील नादुरुस्त रोहित्र दुरूस्त करावे, शेतीमालाला हमी भाव द्या, खरेदी केंद्र सुरु करा, गुजरात राज्याच्या धर्तीवर कापसाला हमीभावावर पाचशे प्रति क्विंटल बोनस द्यावा, विषारी औषध फवारणीमुळे बळी पडलेल्या शेतमजुराच्या कुटुंबाला दहा लाख आर्थिक मदत द्यावी, केंद्र सरकारच्या गोवंश हत्या बंदी कायद्याच्या अंमलबजावणीमुळे शेतकºयांना त्यांच्या मालकीची भाकड जनावरे सांभाळणे अशक्य झाले आहे. ही जनावरे २५ हजार रुपये प्रति जनावरास किंमत देऊन खरेदी करावे किंवा भाकड जनावरांसाठी प्रति दिवस ६० रु. पशुखाद्याची सोय करावी, दुधाचे दर वाढवावेत, कापूस, तूर, सोयाबीनची खरेदी केंद्रे सुरु करावीत, नरेगा अंतर्गत जाचक अटी रद्द करून फळबाग योजना पुन्हा सुरु करावी, तुषार योजनेचे अनुदान मिळाले नाही, ते तातडीने अदा करावीत इ. मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.परळीत काढली पदयात्रापरळी : राष्ट्रवादी काँग्रेस परळी शहर व तालुका शाखेच्या वतीने सोमवारी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या आदेशावरून आंदोलन करण्यात आले.यावेळी संभाजी चौक ते तहसील कार्यालयावर पदयात्रा काढण्यात आली. घोषणाबाजीही झाली. त्यानंतर तहसीलदारांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.जि.प. सदस्य अजय मुंडे, तालुका अध्यक्ष अ‍ॅड. गोविंद फड, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, गटनेते वाल्मीक कराड , बालासाहेब देशमुख यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.अंबाजोगाईत सरकारविरोधी घोषणाबाजीअंबाजोगाई : शेतकºयांच्या प्रश्नांबाबत राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने अंबाजोगाईत हल्लाबोल आंदोलन केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातून निघालेले मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी माजी आमदार पृथ्वीराज साठे, पं.स.सभापती मीरा भताने, जि.प. सदस्य शंकर उबाळे, तालुकाध्यक्ष रणजीत लोमटे, गणेश देशमुख, बन्सीधर सिरसाट, राजपाल लोमटे, अमर देशमुख, उल्हास पांडे, बाळासाहेब देशमुख, कल्याण भिसे, विश्वंभर फड, शिवाजी सिरसाट, ज्ञानोबा जाधव, सुधाकर शिनगारे, राजाभाऊ शेप, गोविंदराव देशमुख, बाळासाहेब सोनवणे, विलास मोरे, सत्यजित सिरसाट, गौतम चाटे, प्रमोद भोसले, सोमनाथ धोत्रे, शिरीष मुकडे, अविनाश उगले, शिवाजी गायके, धर्मराज धुमाळ, विठ्ठल कोकरे, वसंत कदम, ताराचंद शिंदे, दत्ता शिंदे, विलास शिंदे, रमेश चव्हाण, विलास सोळुंके, स्वप्नील सोनवणे, आत्माराम माळी, विष्णू काळे, राजेश्वर चव्हाण, दत्ता यादव, नवनाथ अंबाड, हसन चाऊस, सूर्यकांत पवार, काकासाहेब जामदर यांच्यासह कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.शिरूरमध्ये घोषणांनी शहर दणाणलेशिरूर कासार : तालुका राष्ट्रवादीच्या वतीने बाळासाहेब आजबे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलवर मोर्चा काढून सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. घोषणांनी शहर दणाणून गेले. यामध्ये डॉ. शिवाजी राऊत, अ‍ॅड. चंपावती पानसंबळ, युवक प्रदेश उपाध्यक्ष महेबूब शेख, काकासाहेब शिंदे, किशोर हंबर्डे, जिल्हा उपाध्यक्ष संतोष जरांगे, तालुकाध्यक्ष विश्वास नागरगोजे, गोकुळ सवासे, विनोद पवार, किशोर जेधे, अक्षय जाधव, दादासाहेब पवार, सुभाष यमपुरे, युवराज नेटके, डॉ. पाचपुते, कदीर शेख, धर्मा जायभाये, गणेश चव्हाण, अप्पा येवले, संतोष गुजर, रवी आघाव, अमोल चव्हाण यांच्यासह तालुक्यातील शेतकरी सहभागी झालेबीडमधील मोर्चात सहभागी व्हाबीड : बीडमध्ये राष्ट्रवादीच्यावतीने बुधवारी आंदोलन करण्यात येणार आहे. याची सुरूवात शिवणी फाटा ते आंबेडकर पुतळा मोटारसायकल रॅलीने होत असून, आंबेडकर पुतळा ते शिवाजी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा निघणार आहे. आंदोलनात मोठ्या संख्येने शेतकरी, सर्वसामान्य जनता व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जि.प. सदस्य संदीप क्षीरसागर, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गंगाधर घुमरे यांनी केले आहे.