शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
3
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
4
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
5
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
6
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
7
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
8
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
9
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
10
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
11
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
12
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
13
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
14
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
15
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
16
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
17
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
18
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
20
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 

राष्टहिताविरुद्ध वागणाऱ्यांना काय शिक्षा द्याल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 00:35 IST

जर कुणी राष्टÑहिताच्या विरुद्ध वागत असेल तर आपण त्यांना काय शिक्षा द्याल, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील जाहीर सभेत उपस्थितांना केला.

ठळक मुद्देपरळीत प्रचार सभा : नरेंद्र मोदी यांचा जनतेला सवाल; २०२२ पर्यंत शुद्ध पेयजल देण्याची ग्वाही

परळी (जि.बीड) : ३७० कलम रद्द करणे हा विषय आमच्यासाठी राजनीतीचा नसून देशभक्तीचा, राष्टÑहिताचा आहे. ही देशभावना आहे. त्यासाठी सर्वांनीच राष्टÑहित जोपासले पाहिजे. जर कुणी राष्टÑहिताच्या विरुद्ध वागत असेल तर आपण त्यांना काय शिक्षा द्याल, असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील जाहीर सभेत उपस्थितांना केला. मराठवाड्यातील दुष्काळी स्थितीवर कायमस्वरुपी उपाययोजना करून २०२२ पर्यंत सर्वांना शुद्ध पेयजल पुरविण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.बीड जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मोदी यांची गुरुवारी सकाळी वैद्यनाथ महाविद्यालयासमोरील जागेत जाहीर सभा घेण्यात आली. व्यासपीठावर राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, बीडच्या खासदार प्रीतम मुंडे, उमेदवार जयदत्त क्षीरसागर, रमेश आडसकर, नमिता मुंदडा, आ. सुरेश धस यांच्यासह बीड जिल्ह्यातील युतीचे सर्व उमेदवार उपस्थित होते.‘भारत माता की जय, जय शिव शंभो ’ अशी मोदी यांनी भाषणाची सुरु वात केली. बाबा वैद्यनाथांच्या पावनभूमीत व गोपीनाथ मुंडे यांच्या कर्मभूमीत, संतांच्या भूमीत आलो असल्याचे सांगून मोदी यांनी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे कौतुक केले. ते म्हणाले, आज मला दोन बाबांचे म्हणजे बाबा वैद्यनाथ आणि समोर असलेल्या विशाल जनताजनार्दनाचे दर्शन घडले. मी सोमनाथांच्या भूमीतला. काशी विश्वनाथांपासून ते बाबा वैद्यनाथांपर्यत सर्व महादेवांची आमच्यावर कृपा आहे. गोपीनाथराव मुंडे, प्रमोद महाजन हे माझे मित्र. आज ते हयात नसले तरी त्यांचा आशीर्वाद देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्या पाठीशी आहे. त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पंकजा यांचे कार्य प्रशंसनीय आहे. बीड जिल्ह्याने मागील निवडणुकीत अनमोल साथ दिली. या निवडणुकीत विक्रमी विजय होईल. मराठवाड्यात पाण्याचे संकट आहे. दुष्काळ हटविण्यासाठी शासनाचे प्रयत्न चालू आहेत. २०२२ पर्यंत घराघरात शुद्ध पाणी शासन पुरविणार आहे, शेतकऱ्यांच्या खात्यात थेट अनुदान जमा होत आहे. विविध ४०० योजनांचे साडेआठ लाख करोड रु पये लाभार्थीच्या खात्यात जमा शासन करीत आहे. थेट पैसे मिळत असल्यामुळे ढापाढापी होत नाही. सरकारने गरिबांना मोफत उपचार, घर, वीज, गॅस सिलेंडर दिले आहे. केंद्र्र सरकार जल जीवन मिशन योजनेअंतर्गत येणाºया पाच वर्षात घराघरात पाणी पोहोचविणार आहे. पाण्यासाठी साडेतीन लाख कोटी रु पये खर्च केले जाणार आहेत, अशी माहितीही नरेंद्र मोदी यांनी दिली. गोपीनाथराव मुंडे यांचे परळी- बीड -नगर रेल्वेचे व ऊसतोड कामगार महामंडळाचे स्वप्न पूर्ण होत आहे. वॉटर ग्रीड प्रकल्पामुळे वाहून जाणारे पाणी वळविण्यात येत आहे. यामुळे बीड जिल्ह्यात उद्योग येऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध केल्या जातील, असे ते म्हणाले.लोकशाहीचा उत्सव दिवाळीसारखा साजरा करानिवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव आहे. तो दिवाळीसारखा साजरा करा. दोन दिवस सुटी आली असली तरीही वाजतगाजत मतदान करा, आपला पवित्र हक्क बजावा. हा योग कधी तरी येत असतो, असे मोदी म्हणाले.महिलांनो, पुरुषांपेक्षा जास्त मतदान करा !या सभेस महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यात महिला बचत गटांचाही समावेश होता. बचत गटांच्या कार्याची मोदी यांनी प्रशंसा केली. यापूर्वी महिलांच्या मतदानाचे प्रमाण पुरुषांपेक्षा कमी होते. लोकसभेला बरोबरीत आले आणि आता या निवडणुकीत पुरुषांपेक्षा जास्त मतदान झाले पाहिजे, असे आवाहन त्यांनी महिलांना केले. महिलांचे मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांच्याकडून वदवून घेतले. या मतदानाच्या आकडेवारीची माहिती मी मागवून घेईन, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019parli-acपरळीNarendra Modiनरेंद्र मोदीPankaja Mundeपंकजा मुंडे