शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

गावचे नाव ‘खडक’वाडी; पण प्रेरणादायी संस्काराची पंढरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:25 IST

एका टेकडीवरील अगदी खडकावर वसलेल्या या खडकवाडीचे हे छायाचित्र. छाया : अनिल गायकवाड अनिल गायकवाड कुसळंब ...

एका टेकडीवरील अगदी खडकावर वसलेल्या या खडकवाडीचे हे छायाचित्र. छाया : अनिल गायकवाड

अनिल गायकवाड

कुसळंब (जि.बीड) : ‘नावात काय असतं, असं म्हटलं जातं; किंबहुना अगदी त्याच अनुषंगाने गावाचं नाव खडकवाडी असलं तरी या भूमीतून शेकडो तरुण विविध क्षेत्रांत आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवीत राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध प्रशासनातील क्षेत्रात उत्तुंग कार्य करीत या भूमीचा नावलौकिक वाढवीत आहेत. अगदी खडकावर वसलेल्या या खडकवाडीच्या तरुणांनी शेती क्षेत्र अत्यंत कमी असल्याने व त्यामुळे ऊसतोडीशिवाय पर्याय नसल्याने स्वतःला अभ्यासात गाडून घेतले आणि या भूमीचा नावलौकिक वाढविला.

बीड- कल्याण महामार्गावरील खडकवाडी (ता. पाटोदा) हे छोटेसे टुमदार गाव. एका टेकडीवर वसलेले आहे. गावाला अल्प क्षेत्र असल्याने ऊसतोडीशिवाय त्यांना पर्याय नव्हता आणि म्हणून येथील तरुणांनी लहानपणापासूनच प्रचंड कष्ट घेत शाळा-महाविद्यालयात शिकून प्रशासनातल्या विविध क्षेत्रांत जाऊन गावचा इतिहास बदलला!

आजपर्यंत या गावातील तरुणांनी शिपायापासून ते कलेक्टरपर्यंत मजल मारली आहे. गावचे भूमिपुत्र निवृत्त जिल्हाधिकारी बी.डी. सानप यांनी कानिफनाथांच्या आशीर्वादाने गावचा झेंडा महाराष्ट्राच्या क्षितिजावर नेऊन पोहोचविला. शिक्षक, प्राध्यापक, सैनिक, पोलीस, बांधकाम, कृषी शिक्षण, आदींसह आरोग्य, तसेच विविध क्षेत्रांत येथील तरुण महाराष्ट्रभर आणि देशात कार्यरत आहेत. उपजीविकेचे साधन नसल्याने त्यांना अभ्यासाशिवाय पर्याय नव्हता आणि हीच गरज त्यांना यशापर्यंत नेऊ शकली.

दूधविक्री न करण्याची परंपरा!

गावामध्ये दूध-दही विक्री न करण्याची परंपरा आहे. विविध जाती, धर्म, पंथ गुण्यागोविंदाने नांदतात. सात ग्रामपंचायत सदस्य असलेल्या या स्थानिक स्वराज्य संस्थेने २७ एकर गावच्या जागेमध्ये कंपाउंड करून उत्कृष्ट विविध फळझाडांची वनराई खडकावर फुलविली आहे! एमआरईजीएसच्या माध्यमातून चार हजार वृक्षांची लागवड केली. यात साडेसहाशे झाडांची डाळिंबाची लागवड, तसेच चिंच, आवळा, आंबा, सीताफळ, लिंबोणी आदी फळांची झाडेही गावची शोभा वाढवीत आहेत. यंदा येथूनच चार टन डाळिंबाची विक्री झाली आहे!

प्रा. संजय सानप

(माजी सरपंच, खडकवाडी)

‘कानिफनाथ’ देवस्थान गावचे श्रद्धास्थान!

कानिफनाथांचे सुंदर भव्यदिव्य मंदिर गावच्या टेकडीवर उभारले असून, गावच्या वैभवात भर घालत आहे. श्रावण महिन्यात सप्ताह होतो. नोव्हेंबरमध्ये प्राणप्रतिष्ठा असते. गावात माडी बांधत नाहीत. बैलांना नाल ठोकत नाहीत, तसेच सिंगांना सेंबीही नसते, तसेच घरात सनलाही मारला जात नाही. या काही गावच्या प्रथा आहेत.

२००२ मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार करून भव्य मंदिर उभारणी करण्यात आली आहे. यावेळी हभप निगमानंद महाराज मायंबा आणि गावचे भूमिपुत्र तत्कालीन जिल्हाधिकारी बी.डी. सानप, तसेच रामकृष्ण बांगर आदींसह मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा संपन्न झाला होता.

वृक्ष लागवड अन् अभ्यासिका!

कानिफनाथ मंदिरालगत प्रचंड मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करण्यात आली असून, मंदिरालगत अभ्यासासाठी विद्यार्थ्यांना अभ्यासिकागृह बांधण्यात आले आहे. महंत हभप लक्ष्मण महाराज फड यांच्या मार्गदर्शनातून अध्यात्म विचारांचा सुंदर आविष्कार आणि संस्काररूपी लोकशिक्षणाचा प्रसार केला जात आहे. २००२ मध्ये मंदिराच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमापासून येथील कित्येक वर्षांपासून बोकड कापण्याची अर्थात कंदुरीचा प्रकार बंद केला आहे.