शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
4
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
5
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
6
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
7
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
8
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
9
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
10
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
11
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
12
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
13
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
14
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
15
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
16
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
17
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
18
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
19
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
20
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
Daily Top 2Weekly Top 5

वॉटर कप जिंकण्यासाठी नाळवंडीकरांनी आवळली श्रमदानाची वज्रमूठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 00:09 IST

दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता असणाऱ्या बीड तालुक्यातील नाळवंडी येथे यंदा कमी पावसामुळे पाणीपातळी कमालीची घटली आहे. पाली येथून शासकीय टॅँकरने पाणीपुरवठा होत आहे. टॅँकरच्या सात खेपा मंजूर आहेत, परंतु त्या पुरत नाहीत.

ठळक मुद्देसत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा : दुष्काळमुक्तीसाठी आबालवृद्धांसह हजारो हात सरसावले; दररोज सायंकाळी ग्रामस्थ करतात साडेतीन तास श्रमदान

बीड : दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता असणाऱ्या बीड तालुक्यातील नाळवंडी येथे यंदा कमी पावसामुळे पाणीपातळी कमालीची घटली आहे. पाली येथून शासकीय टॅँकरने पाणीपुरवठा होत आहे. टॅँकरच्या सात खेपा मंजूर आहेत, परंतु त्या पुरत नाहीत. अशा परिस्थितीत नाळवंडीकरांनी श्रमदानाची वज्रमूठ करीत सत्यमेव जयते वॉटर कप जिंकण्याचा संकल्प केला असून १६ दिवसांपासून श्रमदान सुरु आहे.जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांचे मार्गदर्शन लाभले आणि गावाची दिशाच बदलली. उप मुख्यकार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी, डॉ. सुनिल भोकरे, चंद्रशेखर केकाण, मधुकर वासनिक आदि अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष साथ दिली. गावाने योग्य कामाकडे आगेकूच केली. बघता बघता गावाच्या एकीतून स्मार्ट तालुक्याचा प्रथम किताबही पटकावला. दुष्काळाच्या असह्य झळा गाव सहन करत आहे.ही दुर्दैवी बाब गावातील युवकांच्या लक्षात आली. पाणी फाऊंडेशनची स्पर्धा ही संधी समजून गावाने सहभागी होण्याचा निर्धार केला.पाण्यासाठी गाव एकवटले.४८०० लोकसंख्येच्या नाळवंडीने दुष्काळमुक्तीच्या लढ्यात भाग घेतला. श्रमदानातून जलसंधारणाची व मनसंधारणाची कामे सुरू झाली. रात्रंदिवस शेकडो महिला, युवक, वयोवृद्ध घामाच्या धारा गाळून नाळवंडी दुष्काळ मुक्त, टँकरमुक्त करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. बीड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शिनगारे, ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब मिसाळ, डॉ.आबुज, मुख्याध्यापक घुमरे, मारोती नगर येथील तांड्यावरील बंजारा समाजाकडून श्रमदान करण्यात आले. शेकडो बंजारा बांधव, महिलांनी श्रमदान करून नाळवंडी दुष्काळ मुक्त करण्यासाठी साथ दिली आहे.बांधबंदिस्ती, अनघड दगडांचा बांधबांधबंदिस्ती, अनघड दगडी बांध, चर खोदणे, जुन्या बंधाºयांची दुरुस्ती आदी विविध कामे करण्यात येत आहे.मौजवाडी, जरुड आणि नाळवंडी येथील नद्यांचा संगम येथे आहे. त्या आटल्या आहेत. त्यांचे खोलीकरण केले जाणार आहे. शोषखड्डे खोदले आहेत. वृक्षलागवडीसाठी खड्डे खोदून ठेवले जात आहेत.मानवलोकसह विविध सामाजिक संस्था, अधिकारी, ग्रामस्थ विविध माध्यमातून या कामी मदत करत आहेत. राज्याचे प्रथम बक्षीस जिकंण्याचा निर्धार नाळवंडीकरांनी केला आहे.

टॅग्स :BeedबीडWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा