शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

वॉटर कप जिंकण्यासाठी नाळवंडीकरांनी आवळली श्रमदानाची वज्रमूठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 00:09 IST

दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता असणाऱ्या बीड तालुक्यातील नाळवंडी येथे यंदा कमी पावसामुळे पाणीपातळी कमालीची घटली आहे. पाली येथून शासकीय टॅँकरने पाणीपुरवठा होत आहे. टॅँकरच्या सात खेपा मंजूर आहेत, परंतु त्या पुरत नाहीत.

ठळक मुद्देसत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा : दुष्काळमुक्तीसाठी आबालवृद्धांसह हजारो हात सरसावले; दररोज सायंकाळी ग्रामस्थ करतात साडेतीन तास श्रमदान

बीड : दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता असणाऱ्या बीड तालुक्यातील नाळवंडी येथे यंदा कमी पावसामुळे पाणीपातळी कमालीची घटली आहे. पाली येथून शासकीय टॅँकरने पाणीपुरवठा होत आहे. टॅँकरच्या सात खेपा मंजूर आहेत, परंतु त्या पुरत नाहीत. अशा परिस्थितीत नाळवंडीकरांनी श्रमदानाची वज्रमूठ करीत सत्यमेव जयते वॉटर कप जिंकण्याचा संकल्प केला असून १६ दिवसांपासून श्रमदान सुरु आहे.जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांचे मार्गदर्शन लाभले आणि गावाची दिशाच बदलली. उप मुख्यकार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी, डॉ. सुनिल भोकरे, चंद्रशेखर केकाण, मधुकर वासनिक आदि अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष साथ दिली. गावाने योग्य कामाकडे आगेकूच केली. बघता बघता गावाच्या एकीतून स्मार्ट तालुक्याचा प्रथम किताबही पटकावला. दुष्काळाच्या असह्य झळा गाव सहन करत आहे.ही दुर्दैवी बाब गावातील युवकांच्या लक्षात आली. पाणी फाऊंडेशनची स्पर्धा ही संधी समजून गावाने सहभागी होण्याचा निर्धार केला.पाण्यासाठी गाव एकवटले.४८०० लोकसंख्येच्या नाळवंडीने दुष्काळमुक्तीच्या लढ्यात भाग घेतला. श्रमदानातून जलसंधारणाची व मनसंधारणाची कामे सुरू झाली. रात्रंदिवस शेकडो महिला, युवक, वयोवृद्ध घामाच्या धारा गाळून नाळवंडी दुष्काळ मुक्त, टँकरमुक्त करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. बीड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी शिनगारे, ग्रामविकास अधिकारी भाऊसाहेब मिसाळ, डॉ.आबुज, मुख्याध्यापक घुमरे, मारोती नगर येथील तांड्यावरील बंजारा समाजाकडून श्रमदान करण्यात आले. शेकडो बंजारा बांधव, महिलांनी श्रमदान करून नाळवंडी दुष्काळ मुक्त करण्यासाठी साथ दिली आहे.बांधबंदिस्ती, अनघड दगडांचा बांधबांधबंदिस्ती, अनघड दगडी बांध, चर खोदणे, जुन्या बंधाºयांची दुरुस्ती आदी विविध कामे करण्यात येत आहे.मौजवाडी, जरुड आणि नाळवंडी येथील नद्यांचा संगम येथे आहे. त्या आटल्या आहेत. त्यांचे खोलीकरण केले जाणार आहे. शोषखड्डे खोदले आहेत. वृक्षलागवडीसाठी खड्डे खोदून ठेवले जात आहेत.मानवलोकसह विविध सामाजिक संस्था, अधिकारी, ग्रामस्थ विविध माध्यमातून या कामी मदत करत आहेत. राज्याचे प्रथम बक्षीस जिकंण्याचा निर्धार नाळवंडीकरांनी केला आहे.

टॅग्स :BeedबीडWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धा