शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

नगरपालिकेचा माजलगावकरांच्या आरोग्याशी खेळ; दोन वर्षांपासून दुषित पाण्याच्या पुरवठ्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2020 14:37 IST

पाण्यात वापरण्यात येणाऱ्या तुरटीवर धुळीचे थर, पाल, उंदराच्या लेंड्याचा ढिग

ठळक मुद्देजलशुद्धीकरण केंद्रातूनच दुषित पाण्याचा पुरवठादोन वर्षांपासून माजलगावातील जलशुद्धीकरण केंद्र बंद

- पुरूषोत्तम करवा 

माजलगाव : जलशुद्धीकरण केंद्र दोन वर्षापासून बंद असल्याने शहरासह परिसरातील ११ खेड्यांना दुषित, शेवाळयुक्त, हिरवेगार पाणी पिण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. सद्यस्थितीत कोरोना महामारीमुळे भयभीत झालेले नागरीक आरोग्याची काळजी घेत असताना पालिका प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दुषित पाणी प्यावे लागतेय. अनेक वर्षापासून बंद असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शुद्ध करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या तुरटीवर धुळीचा थर चढला असून, त्यावर पाल, उंदराच्या लेंड्या साचलेल्या असून तीच तुरटी पिण्याच्या पाण्यात वापरून जनतेच्या आरोग्याशी खेळ खेळण्याचा प्रकार पालिका कर्मचाऱ्यांकडून होतोय. 

माजलगाव धरणाच्या बाजुलाच माजलगाव शहर व आजुबाजुच्या 11 खेडयाला पाणी पुरवठा करण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले आहे. मागील एक वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून हे जलशुद्धीकरण केंद्र नादुरुस्त असल्याने पाणी शुद्ध न करताच त्याचा पुरवठा करण्यात येत आहे. शहरासह इतर ११ गावांना थेट धरणातून येणारे पाणी नळाद्वारे देण्यात येत आहे. त्यात आता पावसाळा असल्याने माजलगाव धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. यामुळे मोठयाप्रमाणावर गाळ येत असल्यामुळे व जलशुद्धीकरण केंद्र बंद असल्याने पाणी शुध्द न करताच नळाद्वारे सोडण्यात येत आहे. यामुळे नळाद्वारे अशुद्ध पाणी पुरवठा होत आहे. 

जलशुद्धीकरण बंद असल्याने हे पाणी शुद्ध न करताच नळाद्वारे सोडल्याने नागरिकांना दूषित, हिरवेगार, गढुळ पाणी पिण्याची वेळ आली आहे. मूळ जलशुद्धीकरण केंद्र नादुरुस्त असून सध्या केवेळ पाण्यात तुरटी वापरण्यात येते तीही अत्यंत दुषित आहे. सदर ठिकाणी ठेवण्यात आलेली तुरटीवर धुळीचा थर साचलेला असून त्यावर पाल, उंदराच्या लेंड्या पडलेल्या आहेत. हिच तुरटी जलशुद्धीकरण केंद्रातील पाण्यात टाकण्यात येत असल्याने शहरासह ११ खेड्यातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेक वेळा अळ्या देखील पाण्यात निघत आहेत तर या पाण्याची दुर्गंधी  येत असल्याने नागरिक हया पाण्याचा केवळ सांडपाण्यासाढीच उपयोग करतांना दिसत आहेत. 

ज्याची परिस्थिती आहे तोच विकतचे पाणी घेत असून ज्यांची परिस्थिती नाही अशा लोकांना मात्र हे दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. परिणामी शहरासह परिसरातील नागरिक कोरोनासह जलजन्य आजाराने त्रस्त असून अनेकांना ताप, सर्दी, कावीळ, जुलाब सारखे आजार होत आहेत. त्यात कोरोना झाला की काय अशी भिती निर्माण होत आहे. ग्रामीण व खाजगी रुग्णालयात या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. साथ रोगाचे थैमान चालू असताना देखील नगरपालिका प्रशासनाला जाग येत नसल्याने  संताप व्यक्त केला जात आहे. 

ब्लिचिंग पावडरचे पोते पडून माजलगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाण्याच्या टाक्यामध्ये जलशुद्धीकरण केंद्र बंद असताना ब्लिचिंग पावडर टाकणे गरजेचे आहे. परंतु ब्लिचिंग पावडर असतांना ते टाकले जात नसल्याने दूषित पाण्यातून नागरिकांच्या आरोग्याशी पालिकेने खेळ चालवला आहे. कोणी एखाद्या वरिष्ठ अधिकारी पाहणी करण्यास आला असता त्याला ब्लिचिंग पावडरची थप्पी दाखवली जाते प्रत्येक्षात मात्र पाण्यात ब्लिचिंग पावडर वापरलेच जात नसून याची बिले मात्र उचलली जातात असे या ठिकाणी असलेल्या एका कर्मचाऱ्यांने सांगितले.

नगराध्यक्ष, पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्षशहराला पाणीपुरवठा करण्यात येणारे जलशुद्धीकरण केंद्र दोन वर्षापासून बंद असताना नगराध्यक्षासह एकही नगरसेवकांनी याबाबत आवाज उठवला नाही. सर्वजण पालिकेत आलेल्या निधीतून कामे करून स्वतःचे उखळ पांढरे करून घेण्यातच मश्गुल असून त्यांना नागरिकांच्या आरोग्याचे घेणेदेणे राहिले नसल्याच्या प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहेत.

जलशुद्धीकरण केंद्र दुरूस्ती करण्यासाठी काही दिवसांपूर्वीच ठराव घेण्यात आला होता.त्याचे टेंडर मागविण्यात आली असुन लवकरच जलशुद्धीकरण केंद्राचे काम पुर्ण करण्यात येईल.- विशाल भोसले , प्रभारी मुख्याधिकारी

टॅग्स :BeedबीडWaterपाणीMuncipal Corporationनगर पालिका