शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

आई जिवानिशी गेली, वडील तुरुंगात; तीन भावंडे प्रेमाला पारखी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:32 IST

बीड : चारित्र्याचा संशय व कौटुंबिक कलहातून पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना शहरातील मोमीनपुरा भागातील मासूम कॉलनीत ११ ...

बीड : चारित्र्याचा संशय व कौटुंबिक कलहातून पत्नीचा गळा आवळून खून केल्याची घटना शहरातील मोमीनपुरा भागातील मासूम कॉलनीत ११ सप्टेंबर रोजी घडली होती. आई जिवानिशी गेली. तिच्या हत्येच्या आरोपाखाली पित्याला अटक झाली. त्यामुळे तीन निरागस भावंडे जन्मदात्याच्या प्रेमाला पारखी झाली.

मल्लिका याकूब शेख (वय ३८) असे मयत विवाहितेचे नाव असून, शेख याकूब शेख खुदबुद्दीन याने

११ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान गळा आवळून व उशीच्या साहाय्याने तोंड दाबून खून केला होता. त्यांच्यात सतत वाद होत. शिवाय शेख याकूब चारित्र्यावर संशय घेत होता. यातून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. या दाम्पत्यास तीन मुले आहेत. समीर (१०), रावसू (८) व हर्ष (६) अशी त्यांची नावे आहेत. त्यापैकी समीर आजी-आजोबांकडे राहायचा तर इतर दोघे आई-वडिलांसोबत असत. ११ रोजी सायंकाळी दोन भावंडे बाहेर खेळण्यास गेली होती. घरी पती- पत्नी दोघेच होते. मल्लिकाला संपवून याकूब याने घराला बाहेरुन कुलूप लावून थेट पेठ बीड ठाणे गाठून घटनाक्रम सांगितला. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. रात्री उशिरा मल्लिकाची बहीण शेख रिजवाना शेख नजीमुल्ला ऊर्फ बाबा (रा. मोहंमदीया कॉलनी) यांच्या तक्रारीवरुन पती शेख याकूबविरोधात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.

१२ रोजी शेख याकूबला न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती सहायक निरीक्षक सुभाष दासरवाड यांनी दिली.----

प्रेमाचा शेवट वाईट!

मयत मल्लिका व शेख याकूब यांनी आठ वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. याकूब बिगारी काम करायचा तर मल्लिका घरीच असायची. संशय व कौटुंबिक वादाचे पर्यवसान मल्लिकाच्या खुनात झाले. त्यामुळे तीन निरागस भावंडे आई-वडिलांना पोरकी झाली. आता ते तिघेही आजी-आजोबांच्या आश्रयाला आहेत. प्रेमाचा शेवट वाईट झाल्याने कुटुंब व नातेवाईक सुन्न झाले आहेत.